वंचित आघाडीचं धोरण स्पष्ट आहे…!! – भास्कर भोजने.

भाजपला पराभूत करायचं आहे, संविधान आणि लोकशाही वाचवायची आहे…!!
१) सर्वात अगोदर वंचित बहूजन आघाडीने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राजे शाहूंना पाठिंबा दिला आहे…!!
कारण…
अ) कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये शिवसेना भाजपचा खासदार निवडून आला होता.
२०२४ मध्ये विद्यमान खासदार एकनाथ शिंदे गटाकडे आहे आणि त्यांच्या सोबत भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट आहे म्हणजे महायुतीचा खासदार पराभूत करण्यासाठी तिथं कॉंग्रेस पक्षाच्या छत्रपती शाहू यांना वंचित बहूजन आघाडीने पाठिंबा दिला आहे…!!
ब) फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात शाहू महाराजांच्या वंशजांला आंबेडकर यांच्या वंशजांने पाठिंबा देऊन शाहू आंबेडकर विचारांचा वारसा आणि शाहू आंबेडकर घराण्यातील मैत्रीभाव जपला आहे…!!
कुठलाही लपंडाव नाही आणि म्हणूनच मग छत्रपती शाहू महाराज आणि राजे संभाजी यांनी बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार मानले आहेत…!!
२) नागपूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहूजन आघाडीने कॉंग्रेस पक्षाच्या विकास ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे…!!
कारण….
अ) नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी विद्यमान खासदार आहेत तिथं भाजपला पराभूत करायचे आहे…!!
ब) कॉंग्रेस पक्षाचे विकास ठाकरे हे ओबीसी आहेत, वंचित बहूजन आघाडीचे राजकारण ओबीसी बहुजनांच्या न्याय हक्कासाठी आहे, त्याला अनुलक्षून हा पाठिंबा आहे…!!
क) नागपूर हा आरएसएसचा गड आहे आणि भाजपचा उमेदवार हा आरएसएसचा संघीय विचाराचा आहे म्हणून त्या संघ विचारधारेला पराभूत करण्यासाठी नागपूर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आहे…!!
आणि म्हणून नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विकास ठाकरे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आहेत…!!
३) सांगली लोकसभा मतदारसंघात पाठिंबा दिला आहे…!!
कारण….
अ) सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रकाश शेंडगे हे ओबीसी बहुजन पक्षाचे उमेदवार आहेत वंचित समुहातील धनगर समाजाचे आहेत….!!
ब) सांगली लोकसभा मतदारसंघात वंचित बहूजन आघाडीला २०१९ मध्ये ३ लाखापेक्षा जास्त मते होती ती ताकद प्रकाश शेंडगे यांच्या पाठिमागे लावली तर भाजपला सहज पराभूत करता येते…!!
आणि म्हणून प्रकाश शेंडगे यांनी अतिशय कृतज्ञतापूर्वक बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार मानले आहेत…!!
४) बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाठिंबा दिला आहे…!!
कारण….
अ) सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देऊन भाजप प्रणित महायुतीचा उमेदवार पराभूत करण्यासाठी पाठिंबा दिला आहे…!!
ब) सुप्रिया सुळे यांना सलग तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे असा वैचारिक खासदार भाजपचे वाभाडे काढण्यासाठी संसदेत असावा ही स्पष्ट भुमिका आहे…!!
क) भाजपच्या हुकूमशहा विरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देऊन भाजप पुढे लोटांगण घालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नामोहरम करण्यासाठी पाठिंबा दिला आहे…!!
आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी कृतज्ञतापूर्वक बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार मानले आहेत…!
ज्या चार ठिकाणी वंचित बहूजन आघाडीने कॉंग्रेस किंवा ओबीसी बहुजन पक्षाला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आहे तिथं भाजपचे प्राबल्य आहे आणि विद्यमान खासदार सुद्धा भाजपचेच आहेत. पाठिंबा भाजपला पराभूत करण्यासाठी भाजप विरोधी सक्षम उमेदवाराला दिला आहे…!!
वंचित बहूजन आघाडी जिथं जसे शक्य आहे तिथं भाजपला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाला, ओबीसी बहुजन पक्षाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत आहे आणि भाजपला पराभूत करण्यासाठी सकारात्मक भुमिका घेत आहे…!!
एका एका जागेसाठी भांडणारे मविआ आणि महायुती मधील सत्तापिपासु नेते लोभी नेतृत्व आणि इतर पक्षाला पाठिंबा देऊन विचारधारा जपणारे, संविधान वाचविण्यासाठी त्याग करणारे,इतरांना मोठं करण्याची दानतं दाखविणारे दानशूर नेतृत्व हा ठळक फरक महाराष्ट्रातील जनता बघतेय…!!
उमेदवारी अर्ज भरण्याची दुसऱ्या टप्प्यातील तारीख निघून गेल्यावरही अद्याप मविआ मधील तीन पक्षांची जागेची भांडणे थांबली नाहीत तर मग मविआ वंचित बहूजन आघाडीला जागा कधी आणि कोणत्या देणार..??? आणि मविआ मध्ये वंचित बहूजन आघाडीला मविआ कधी सामावून घेणारं..????
मविआ आणि महायुती सोबतं असणाऱ्या सर्वच छोट्या पक्षांची महायुती आणि मविआ ने फरपट केली आहे…!!
हे सरंजामी मनोवृत्तीच्या राजकीय पक्षांचे मोठे षडयंत्र आहे…!!
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या तोंडाला मविआ ने पाने पुसली आहेत, तीच गत संभाजी ब्रिगेड ची आहे, तीच गत समाजवादी पार्टी ची आहे.तीच गत रामदास आठवले,तीच गत जोगेंद्र कवाडे,तीच गत बच्चू कडू यांची सुद्धा आहे, महादेव जानकर यांचा रासप हा पक्ष नामशेष केलाआहे,महादेव जानकर घड्याळ घेऊन लढतं आहेत,त्याच प्रकारे वंचित बहूजन आघाडीला सुद्धा ताटकळत ठेवण्याची मविआ ची भूमिका होती…!!
ज्यांचा दृष्टिकोन साफ आहे, ज्यांची वैचारिक बांधिलकी संविधानाशी आहे. ज्यांना फुले आंबेडकर विचारधारा अभिप्रेत आहे त्यांना वंचित बहूजन आघाडीची भुमिका योग्य आणि स्पष्ट दिसतेय…!!
ज्यांना कावीळ झाला आहे त्यांना पिवळंच दिसतयं…!!
ज्यांचा दृष्टीकोन कलुषित आहे, त्यांच्या मनात शंका उपस्थित होतात…!!
ज्यांच्या मनात काळबेरं आहे त्यांना काळबेरं दिसतेय…!!
जे मुळातच शंकेखोर वृतीचे असतात त्यांना प्रत्येक कृतीमध्ये शंका येते…!!
ज्यांचा दृष्टीकोन सरळ आणि मानवतावादी असतो त्यांना मानवतावादी कृती पटकन लक्षात येते, आणि भावते सुद्धा…!!
ज्याचा त्याचा दृष्टीकोन कसा आहे त्यावर त्याची विचार करण्याची क्षमता अवलंबून असते…!!
जयभीम.
भास्कर भोजने.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत