देवेंद्र फडणवीस व राम सातपुतेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करून कारवाई व्हावी – प्रदेश कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार

सोलापूर येथील मोची समाजाला कोरोना काळातील गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन व प्रलोभन.
सोलापूर : देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झालेली असतात सोलापूर येथे एका विशिष्ट जातीला गुन्हे मागे घेण्यात येतील असे प्रलोभन दाखवून आचारसंहितेचा भंग करण्यात आला आहे अशी तक्रार निवडणूक आयोगा कडे लेखी स्वरूपात दाखल झालेली आहे. सविस्तर वृत्त असे की, तीन वर्षांपूर्वी करोना काळात मोची समाजाच्या समुदायाविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्हा मागे घेण्यासाठी सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला आणि फडणवीस यांनीही हा दखलपात्र गुन्हा लगेच शंभर टक्के मागे घेण्याचे आश्वासन दिले. घडलेला हा प्रकार म्हणजे लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू असताना विशिष्ट समाजाच्या मतदारांना प्रलोभन दाखविण्याचा प्रकार असल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि राम सातपुते यांच्या विरोधात कारवाईसाठी प्रदेश काँग्रेस पक्षाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. अनुसूचित जातीत मोडणाऱ्या मोची समाजातील करण म्हेत्रे (वय ३२) या युवक काँग्रेसच्या स्थानिक नेत्याचा मे २०२१ मध्ये करोनाची लागण होऊन मृत्यू झाला होता. त्यावेळी सार्वत्रिक टाळेबंदीसह साथ रोग प्रतिबंधक कायद्याचा कडेकोट अंमल असता त्याचे उल्लंघन करून मृत म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेत शेकडोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता. त्यामुळे खळबळ माजली होती. त्यावेळी पोलिसांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात १०७ जणांविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल झाला होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत