बकवास गप्पांचा निषेध करा..!

निर्जीव भिंतीला कुठल्याही इंधनाशिवाय – पेट्रोल, डिझेल शिवाय चालवण्याचे तंत्रज्ञान भारतात होते तर ते आता कुठे आहे? पेट्रोल डिझेल फारच महाग झाले आहे म्हणून म्हटले !
राईट बंधुनी विमानाचा शोध लावला. सर्व जगाला ते तंत्रज्ञान दिले,
जेम्स वॅट ने रेल्वेचा शोध लावला. ते तंत्रज्ञान त्यांनी सार्या जगाला दिले,
मार्कोनीने रेडिओचा शोध लावला. सारं जग त्याचा आनंद घेत आहे,
मग जर संत ज्ञानेश्वरांनी निर्जीव भिंत चालवली. ते तंत्रज्ञान त्यांनी भारतीयांना कां नाही दिले?
जर दिले असते तर आज भारतात सर्वत्र चालणा-या भिंती दिसल्या असत्या.
रेड्याला वेद शिकवणारे तंत्रज्ञान माणसांना दिले असते, तर आज रेड्यांची संख्या कमी झाली असती.
कां नाही दिले?
जेवढे शोध पाश्चिमात्यांनी लावले ते त्यांनी जगाला मोठ्या मनाने दिले.
बेलने टेलीफोनचा शोध लावला जगाला संवाद करायला लावले.
मार्टीन कुपरने मोबाईलचा शोध लावला. सारं जग वेडं झालंय त्याने.
आपल्या भारतीय लोकांनी शोध लावले नाही असे नाही !
मोक्ष, आत्मा, परमात्मा, कर्मकांड, सतीप्रथा, विधवा विवाहबंदी, समुद्रप्रवास बंदी, शिक्षणबंदी, शोषण, अस्पृश्यता, जातीभेद आणि थोतांड गप्पा. हे भारतीयांचे शोध….!
आपल्या भारतीय सनातनींनी आपल्या भारतीयांनाच काही चांगलं नाही दिलं, तर ते जगांला काय चांगलं देणार ?
हनुमानाला जर पर्वत उचलायचे तंत्रज्ञान होते ते भारतीयांना का नाही शिकवले? आज आपली पोरं १० किलो दळण आणायचं म्हटले तर तोंड वाकडं करतात.
म्हणे शिवरायांना देवीने तलवार दिली..
जर या देशातील देव -देव्या अशा तलवारी वाटत होते व अशा तलवारीत सामर्थ्य असते आणि त्या तलवारी सा-यां भारतात त्या वेळी वाटल्या असत्या, तर औरंगजेब केंव्हाच पळुन गेला असता व आक्रमणेही झालीच नसती. प्रत्यक्षांत विजापुर वरून अफ़जलखान तुळजापुरला गेलेलाच नाही. कारण प्रतापगड च्या रस्त्यांवर तुळजापुर पडतच नाही. वाटेत पंढरपुर पडत होते पण अफ़जलखानाने पंढरपुराला नासधुस केल्याचा कुठेच उल्लेख नाही. छत्रपती शिवरायांनी अफ़जल खानाच्या वधांनंतर त्याची कबर बांधली पण गद्दार कृष्णाजी भास्कर कुलकर्णीची नाही बांधली..
कसल्या तलवारी अन् कसल्या आल्यांत रिद्धी सिद्धी?
आपली अस्त्रे पहा पवनांस्त्र, सर्पांस्त्र, ब्रम्हांस्त्र, वरुणांस्त्र कुठं आहेत हि अस्त्रे? जर खरचं असती तर भारतात एकही परकिय नावांलाही दिसला नसता.
सुदर्शन चक्र तंत्रज्ञान कुठं आहे?
अस्त्रं शस्त्रं सोडा, साधी वस्त्रं सुद्धा नव्हती भारतीयांना अंगावर घालायला. म्हणुन तर हजारो आक्रमणे भारतांवर झाली आणि भारत सतत गुलाम होत राहीला.
भारतात आज जी अस्त्रे शस्त्रांत्रे आहेत ती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर -१९४७ नंतरच बनलेली आहेत.
आधीची अस्रे व ते तंत्रज्ञान कुठं गायब झाली काय माहीत?
गाथा पाण्यात बुडवल्यावर सुध्दा भिजली नाही ते तंत्रज्ञान कुठं आहे?
गाथा बुडवणा-या नालायकांना मात्र काही शिक्षा झाली नाही.
द्रोपदीला वस्त्र पुरवले ते श्री कृष्णाचे तंत्रज्ञान कुठं आहे? ते असते तर २ हजार वर्षे लाखो भारतीयांना व गांधीजींना आयुष्यभर उघडे राहण्याची गरज पडली नसती.
तर, तरुणांनो सत्य जाणुन घ्या ! सत्याचा स्विकार करा ! थोतांडाचा धिक्कार करा ! आणी वास्तवात जगा !
चमत्कारांनी भरलेल्या पुराणातील काल्पनीक जगात जगु नका व राहु नका !
न आपल्याकडे शस्रें होती ना अस्त्रें होती.
पुर्वीच्या काळी ना हिमत होती न एकता होती .
हिंमत आली, हिंमत दिली भारत स्वतंत्र झाल्यानंतर, भारतात संविधान लागु झाल्यानंतर , लोकशाही आल्या नंतर, सर्व भारतीयांना संधी मिळु लागल्यानंतर..!
आणी सर्वात महात्वाचे अमेरीकेने ज्या महामानवाला सिम्बोल ऑफ नॉलेज ची पदवी दिली त्या महामानवाने हा हिंदु धर्मच सोडून दिला……….?
“बकवास गप्पांचा निषेध करा,
विज्ञानाचा स्विकार करा..!”
जयभीम इंडीया.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत