महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

“ ब्रम्हामनाने पायाने बांधलेली गाठ बहुजनांना हाताने सुटणार नाही.” – प्रा. डॉ. आर. जे. इंगोले

                          महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाजाला प्रबोधन करीत असतांना एका ठिकाणी म्हणतात, “ ब्रह्मामण हुशार असतात; परंतु बुद्धिमान नसतात.” आणि या वाक्याचे स्पष्टीकरण देतांना पुढे असे म्हणतात की, हुशार असतात म्हणजे त्यांच्या हुशारीचा वापर ते फक्त ब्रह्मामण समाजाच्या प्रगतीसाठी करतात आणि त्यात पुन्हा ब्रह्मामण समाज म्हणजे फक्त पुरुषासाठी करतात म्हणजे ब्रह्मामण स्त्रियांना सुद्धा त्यांनी अनेक जाचक अटी लावल्या की, ज्यामुळे त्या अनेक शतके त्यांची प्रगती करू शकल्या नाहीत. सतीची चाल , शिक्षण बंदी सारख्या प्रथा अनेक वर्ष चालू होत्या. सती प्रथा त्याकाळात असतांना स्त्रियांची काय अवस्था होत असेल त्यांच्या मनाची याचा विचार करून सुद्धा खूप वेदना होतात तर त्यांनी कसे भोगले असेल. आणि बुद्धिमान माणसे ही आपल्या बुद्धीचा वापर संपूर्ण समाजासाठी करतांना दिसतात यात आपले सर्व समाजसुधारक आणि महापुरुष आहेत. फक्त तो नंतर आपला दोष आहे की, आपण त्यांना आपल्या जाती आणि धर्मात विभागले आहे. 
                   “ब्रह्मामणाने पायाने बांधलेली गाठ आपल्या बहुजन सामाजाला हाताने सुटणार नाही.” हे वाक्य मी जेष्ठ राजकीय विश्लेषक मा. राजू परुळेकर यांच्या एका मुलाखतीत ऐकले होते आणि ते मला खूप अर्थपूर्ण वाटले आणि म्हणून त्यावर आपण सामाजिक विश्लेषण करावे असे मला वाटले.  म्हणजे याचा अर्थ असा आहे की, जे ब्रह्मामण आणि विशेष करून आर.एस.एस. चे ब्रह्मामण हे जे एखादे षडयंत्र करतात ते आपल्या बहुजन समाजाला समजायलाच बरेच वर्ष लागतात आणि ते सुद्धा सर्वांना समजत नाही तर जे बहुजन फार विचार आणि चिंतन करतात अशाच बहुजन समाजाला हे समजू शकते पण इतर बहुजनांना हे कधीच कळणार नाही. आणि बहुजन समाजात आपण ब्रह्मामण सोडून इतरांचा समावेश करतो पण त्यात बौद्ध धम्म माणणरे येत नाहीत म्हणजे या गाठ न सुटणारे आहेत त्यात येत नाहीत कारण 1956 ला हिंदू धर्म सोडल्यामुळे पुढील काळात ब्रह्मामणाचा हस्तक्षेप बौद्ध धम्मात येत नाही आणि त्यामुळे इतर बहुजन समाजाला मात्र हे लागू पडते. ब्रह्मामण समाजाने जर एखादे षड्यंत्र टाकले तर ते सर्वात अगोदर बौद्ध समाज ओळखतो आणि त्यामुळे त्यांचा राग बौद्ध अनुयायावर जास्त असतो ते म्हणतात ना की, या जगात देव , आत्मा ,स्वर्ग –नर्क  नाही हे फक्त दोनच समाजाला माहीत आहे एक ब्रह्मामण आणि दुसरे बौद्ध मग त्यात बौद्ध समाज लोकांना देव नाही, आत्मा नाही ,स्वर्ग –नर्क नाही हे सांगून जागृत करतात आणि ब्रह्मामण त्यांना त्यामध्ये अडकवतात. बहुजनांना मानसिक गुलाम करण्यासाठी हे सर्व चालले असते. 
                                  या काल्पनिक गोष्टीमध्येच ब्रह्मामण समाजाचे अस्तित्व आहे. नाही तर ब्रह्मामण केंव्हाच आपल्या डोक्यातून हद्दपार झाला असता आणि सर्व बहुजन समाज पुढे प्रगती पथावर गेला असता पण ब्रह्मामण यांनी जे सांगितले आहे त्यावर कोणी शंका घेण्याची हिंमत करीत नाही कारण ती एक मानसिक गुलामगिरी आहे. आणि हे सर्वात मोठे कारण आहे की, बहुजन ही गाठ सोडू शकत नाही म्हणजे षडयंत्र समजू शकत नाही. म्हणजे ब्रह्मामण आपले काहीतरी भले करणार आहे याच समजुतीत आजपर्यंत बहुजन समाज आहे. परंतु हे आर.एस.एस. वाले माणसाला माणूस समजत नाहीत तर एक वस्तु समजतात आणि यांचा कहर एवढा असतो की, जर त्यांच्या कार्यात कोणी ब्रह्मामण आडवा आला तर त्याला सुद्धा संपवतात हा इतिहास आहे तर मग बहुजन समाजाचे काय होणार आहे हे आपणास समजले असेल. म्हणजे नरेंद्र दाभोळकर प्रकरण आपणास माहीत आहे आणि त्यामुळे आपण इतर बहुजन कसे सहज संपविले जातात हे समजू शकतो. आजपर्यंत आपले बहुजन महापुरुष कसे संपविले यात जात नाही म्हणजे लेखाचा विस्तार जास्त होईल. म्हणजे भारताच्या इतिहासात पेरियार यांच्या इतके स्पष्ट आणि परखड ब्रह्मामण विरोध आणि यांचे षडयंत्र इतर कोणी सांगितले असे मला वाटत नाही. ते एका ठिकाणी म्हणतात की, “ जो कहते है कि शिक्षा आणि नौकरीयोमे आरक्षण 10 वर्षो के लिए था , कया ओ ये जानते है कि, ब्रह्मा ने सिर्फ दो पिढीयो तक ही ब्रह्मामण होने का नियम बनाया था ! उसके बाद खुद को ब्रह्मामण कहनेवालो को जुते से पिटने का नियम बनाया था ? (संदर्भ : ऋग्वेद खंड -७ , श्लोक ८५६ . पंडित वी.एस. पेरियार ) म्हणजे मला वाटते या श्लोकाचा विचार केला तर आपण बहुजन समाजाने आता तरी यांच्या नादी लागू नये म्हणजे यांनी जे सांगितले ते एकदा आपल्या बुद्धीने तपासून घ्यावे आणि मग स्वीकारावे आणि जेंव्हा आपण हे तपासणार त्यावेळी त्यामध्ये कांहीच तथ्य नाही हे आपल्या लक्षात येईल. 
                            २००५ यावर्षी जिजाऊ जन्मस्थान सिंदखेड राजा याठिकाणी मराठा सेवा संघाने शिवधर्म स्थापन करून त्याप्रमाणे आपण आपले जीवन व्यतीत करण्याचा संकल्प केला होता आणि मग त्यातून अनेक तरुण या विचाराने पुढे आले आणि त्यांनी निदान स्वत: च्या जीवनात तसे परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांचे प्रबोधन सुद्धा केले त्याचे नेतृत्व मा. पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांचे होते आणि त्यामुळे महाराष्ट्रात तरी पुरोगामी विचार करणारी एक मोठी फळी तयार झाली हे याचे मोठे फलित आहे. १२ जानेवारीला दरवर्षी ते वर्धापन दिन साजरा करतात अनेक तरुण व्याख्याते तयार झाले लेखक तयार झाले त्यांनी प्रभावी साहित्य निर्माण केले त्यात औरंगाबाद येथील डॉ. बालाजी जाधव यांचे योगदान सुद्धा मोठे आहे सध्या ते एका नविन रूपात म्हणजे कीर्तनकार करताना विशेष म्हणजे संत तुकाराम यांचे अभंग जे लोकांना ज्ञात नव्हते म्हणजे लोकांपुढे आले नाही त्याचा प्रचार करीत आहेत. हे सुद्धा एक मोठे काम आहे. कारण आपल्या महपुरूषांचे कार्य आणि विचार आजपर्यंत लपवून ठेवले गेले आणि त्यामुळे आपण भलत्याच लोकांना महत्व देत गेलो आज मात्र आपले बहुजन विद्वान त्यांना समाजा समोर आणत आहेत त्यात डॉ. बालाजी जाधव महाराज हे एक नांव आहे. आता हे षडयंत्र समजण्यासाठी आपल्याला एकच करावे लागेल कि, प्रत्येक घटनेची चिकित्सा करावी लागेल. कारण हे ब्रह्मामण आपल्याला धर्माच्या नांवाखाली अनेक फालतू गोष्टी सांगतात त्या आपण ओळखल्या पाहिजेत. साधे उदाहरण आहे नारायण नागबली एक विधी जो आपल्या बहुजन समाजाची आर्थिक फसवणूक करण्यासाठी सुरू केला मग हा विधी एवढा महत्वाचा असेल तर मग त्याचा उल्लेख अगोदर हिंदू धर्म ग्रंथात का नाही ? आणि ५० वर्षापूर्वी हा विधी का नव्हता ?आताच याचे स्तोम का सुरू झाले. याचा साधा विचार आपले बहुजन तरुण करीत नाहीत अशा अनेक प्रथा आहेत पण त्याची आपण चिकित्सा केली पाहिजे. महात्मा फुले म्हणाले होते कि, शिक्षण आपण का घेतो तर सत्य काय आहे हे आपण तपासून पाहण्यासाठी आणि मग आपण हे शिक्षण घेत असतांना याचा विचार केला पाहिजे. आपण कोणतेही शिक्षण घेताना आपले महापुरुष काय विचार देऊन गेले याचे चिंतन केले पाहिजे. 
         आपण बहुजन काय करतो कि, आपले प्रयत्न सोडून देव आपल्याला काहीतरी देईल म्हणजे अपेक्षित उद्दीष्ट साध्य होईल अशी भाबडी अशा ठेवतो पण तसे कधीच होणार नाही. आपल्याला एका षडयंत्रात अडकविले जात आहे. आपले बहुजन तरुण हातात धागे-दोरे बांधतात , पायी यात्रा करतात , अनेक देवस्थानाला जाऊन नवस बोलतात , उपवास धरतात , हातात अनेक खोटया ग्रहाच्या अंगठया घालतात दररोज देवाची तास न तास पूजा करतात पण हे आपल्याला कोण करायला सांगतो याचा विचार करीत नाहीत आणि तुमचे कोणतेही ध्येय असेल तर ते साध्य करण्यासाठी एकच महत्वाचे आहे ते मात्र फार कमी  करतो आणि ते म्हणजे आपले प्रयत्न आणि मग शेवटी मी अनेक असे तरुण पाहिले आहेत कि, ते हे सर्व करून काहीच होत नाही आणि मग शेवटी एखादा व्यवसाय करतात. आणि खूप साधी गोष्ट आहे आपले बहुजणांचे कोणतेही महापुरुष बघा त्यांनी कोणत्या भाषणात किंवा एखाद्या त्यांच्या ग्रंथात असे कुठे सांगितले आहे का आपण अशा विधी आणि वर्तन केले पाहिजे तर कुठेच नाही सांगितले तर मग हे काय आपल्या महापुरुषापेक्षा विद्वान आहेत का ? याचा विचार आपला तरुण करीत नाही. आपण दैववादी नाही तर प्रयत्नवादी बनले पाहीजे. आज महाराष्ट्रात असे अनेक उदाहरणे आहेत कि, जे अत्यंत प्रतिकूल परिस्थितून पुढे आले आणि जीवनात मोठे यश मिळवले त्यांनी हे सर्व विधी आणि वर्तन केले होते का ? तर नाही त्यांनी शिक्षण आणि त्यासाठी मोठे कष्ट घेतले आणि आज ते समाजात एक आदर्श म्हणून पुढे आले आहेत. मा. तुकाराम मुंढे , मा. विश्वास नांगरे पाटील , मा. राजेंद्र भारुड , मा. भरत आंधळे , मा. अंसार शेख अशी कितीतरी नांवे आहेत ते फक्त आणि फक्त कष्टाने पुढे आले आहेत कोणतेही कर्मकांड करून नाही. 
                                       एका ठिकाणी असे वाचण्यात आले होते कि, “ दुनिया मे जितनी भी तरक्की या परिवर्तन हुए है | उनके पिछे केवल नास्तिक का हाथ है | आस्तिक तो सिर्फ भगवान के भरोसे बैठे है ||” याचा अर्थ आपल्याला जे देवाच्य नादी लावले जाते कारण आपण आपली वैचारिक प्रगती करू नये कारण जर वैचारिक प्रगती झाली तर मग आपण विचार करणार , चिकित्सा करणार आणि महात्मा फुले यांनी सांगितलेले सत्य शोधणार आणि सत्यशोधक तयार होणार आणि मग याचीच यांना भीती असते. कारण आपण सत्यशोधक बनलो कि,यांचे अस्तित्व संपते. आणि मग यांनी बांधलेली गाठ (षडयंत्र ) आपण सुद्धा पायानेच सोडू शकतो. फार सोपे आहे आपण जेवढे प्रयत्न या कर्मकांडासाठी करतो ना तेवढेच प्रयत्न आपल्या शिक्षणासाठी करायचे आहेत झाले काम आणि त्यामुळे हे आपल्याला म्हणजे आपल्या गरीब समाजाला धान्य मोफत देतील पण शिक्षण महाग करतील. याचे कारण यांना आपल्याला फक्त जीवंत ठेवायचे आहे मतदान देण्यासाठी.  विकास प्रगती ये  सब झुठ है असा कधी विकास होत नाही कि, शिक्षण महाग करायचे आणि प्रगती करा. जगात जे देश पुढे गेलेत त्याचे गुपित शिक्षण आहे आणि म्हणून शिक्षण महर्षी कर्मवीर भाउराव पाटील म्हणाले होते कि, “ माझ्या दाढीत जेवढे केस आहेत तेवढे बहुजन तरुण मला शिक्षित करायचे आहेत.” पहा आपल्या महापुरुषांचे ध्येय किती उच्च होते आणि निस्वार्थ होते. म्हणजे वस्तीगृहातील मुलांना जेवण नाही म्हणून आपले मंगळसूत्र विकणार्‍या कर्मवीरांच्या सहचारिणी कुठे आणि आज संस्था चालविणारे कुठे ? यांनी तर शिक्षण इतके महाग केले आहे कि, आपले बहुजन समाज आज चांगले शिक्षण घेऊच शकत नाही आणि दुसर्‍या बाजूला सरकार आणि त्यांचे निर्णय हे आपल्या समाजाला पुन्हा मागच्या काळात घेऊन जात आहेत.  आणि आपण पुन्हा त्यांचेच कार्यकर्ते म्हणून जोरात काम करीत आहोत हे सुद्धा मोठे षडयंत्रच आहे.  म्हणजे या राजकारणी लोकांची मुले बाहेर देशात शिक्षण घेतात आणि इथे आपण यांचे झेंडे घेऊन फिरत आहोत. आणि आपले बहुजन लोकप्रतींनिधी निवडून येतात आणि पुन्हा सरकार आले कि, त्यांना पुन्हा हुशार ब्रह्मामण मुख्यमंत्री पाहिजे. बघा म्हणजे आमदार आपले जास्त आणि मुख्यमंत्री मात्र ब्रह्मामण का तर तो हुशार आहे. आपले बहुजन तरुण रात्र रात्र अभ्यास करीत आहेत आणि यांनी आर.एस.एस. ची मुले म्हणजे ब्रह्मामणांची मुले मागच्या दाराने म्हणजे ही एक नविन पद्धत आणली आहे Lateral Entry मधून मोठ मोठया निर्णय घेण्याच्या जागेवर बसविले आहेत. आता हे सुद्धा आपल्याला समजले नसते पण काही आपले बहुजन तरुण आहेत त्यांनी हे शोधून काढले आहे. 
                 आपल्याला सांगितले जाते की, उत्तम शेती , मध्यम व्यापार आणि कनिष्ट नौकरी आणि जास्त नौकरी करणारे ब्रह्मामण आहेत म्हणजे हे सुद्धा एक षडयंत्र आहे.  आपण शेती करा आणि आत्महत्या करा हे देशात आणि परदेशात नौकरी करून त्यांचे जीवन सुखात घालवतात. जर शेती उत्तम आहे तर मग ब्रह्मामण शेती का करीत नाहीत ते आपल्याला अनेक यज्ञ , याग करायला लावतील आणि हे मात्र कोणताच विधी करणार नाहीत मग त्यांना कसा कोप होत नाही ईशवराचा ? याचा आपण विचार करीत नाही. तसे पाहिले तर आपणास विचार करण्याची संधीच दिली जात नाही आपल्याकडे एवढे सण आणि उत्सव आहेत की, आपल्याला वेळच मिळत नाही आणि त्याला हे संस्कार म्हणतात आणि आपल्याला ते खरेच वाटते. कारण आपल्याला विचार न करता विश्वास ठेवायची सवय असते. म्हणजे आर.एस.एस. चे काम किंवा अजेंडा आपल्या विरोधात असतो पण तो राबवायला आपलेच बहुजन तरुण असतात आणि हे जगात फक्त भारतातच होऊ शकते. म्हणजे उदाहरण द्यायचे तर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला ज्याने जिजाऊची बदनामी करणार्‍या जेम्स लेन याला मदत केली आणि स्वत: सुद्धा बदनामी केली.  पण आपले सर्व बहुजन आमदार सर्वात जास्त असतांना कोणीच याला विरोध केला नाही कारण त्याना त्यांची आमदारकी जास्त महत्वाची वाटली. आणि बघा किती आमदार असतील ब्रह्मामण  समाजाचे तर फार कमी म्हणजे त्यांचा प्रभाव काहीच पडणार नाही. पण आपलेच भटाळलेले आमदार शांत बसले आणि दिला पुरस्कार  याला म्हणतात मानसिक गुलामगिरी आणि ती आपल्या लक्षात येत नाही. कारण आपण यांच्या कोणत्याच निर्णयाची चिकित्सा करीत नाही. आपले सर्व महापुरुष यांच्यापासून लांब होते म्हणून आपण सुद्धा लांब राहिले पाहिजे. पण आपल्या बहुजन समाजात गुरु संस्कृती फार वाढली आहे म्हणजे जन्मापासून मृत्यू पर्यन्त आपल्याला कोणतेही कार्य करतांना गुरु पाहिजे म्हणजे गुरुला विचारल्याशिवाय आपण अन्न खात नाही आणि पाणी सुद्धा पित नाही अशी आपली अवस्था आहे. आताच मी एका ठिकाणी मृत्यू झालेल्या घरी गेलो होतो म्हणजे सांत्वन करण्यासाठी जातात, एक पद्धत आहे. तर ते दहावा तेरावा कसा करावा आणि काही अडचण असेल तर गुरुला विचारा असा सल्ला एकजण देत होता. आणि मला ऐकतांना खूप वाईट वाटले की, इतकी वर्ष झाले पण यांची मानसिक गुलामगिरी गेलेली नाही. आणि असे दृश्य पाहिले की, पुरोगामी माणूस थोडा निराश होतो पण काम तर करावेच लागेल. ती आपली जबाबदारी आहे. 
               देशात एखादा इव्हेंट कधी आणि का करायचा याचा विचार खूप नियोजनपूर्वक केला जातो.  पण आपले बहुजन याला सहज घेतात. यालाच षडयंत्र म्हणतात. म्हणजे बाबरी मास्जित 6 डिसेंबरलाच का पाडली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. म्हणजे या दोन समाजात तेढ निर्माण झाली पाहिजे.  आता राम मंदिर उद्घाटन 2024 लाच का ? तर यावर्षी लोकसभा आणि कांही राज्यात विधानसभा निवडणुका आहेत आणि लोकसभा जास्त महत्वाच्या आहेत. पण आपले लोक याला सहज घेतात ते एवढे सहज नसते. हे जेंव्हा बहुजन समाजाला समजेल तेंव्हा यांची कोणतीच चाल यशस्वी होणार नाही. म्हणजे जो राम रामायणानुसार राज्य सोडून 14 वर्ष वनवासात गेला आणि हे त्याच्या नांवाने सत्ता मिळवत आहेत. यावरून किती रामभक्त आहेत याची कल्पना आपल्याला येईल. यांचे षडयंत्र समजण्यासाठी तशा प्रकारचे विचार वाचावे आणि ऐकावे लागतात. आणि त्यावर चिंतन करावे लागते पण इथे आपल्या सामान्य माणसाला वेळ कुठे आहे ? ते तर फुकट रेशन मिळते यावर चर्चा करतात आणि हे सरकारचे मोठे उपकार आहेत असे अनेक लोक आता म्हणायला लागले आहेत. पण लोकांना साधे अन्न मिळत नाही हे सरकारचे अपयश आहे हे लोकांना समजत नाही. आपल्या जाती आणि धर्माच्या नादी लावून मोठमोठे कायदे आपल्या विरोधात पास केले जात आहेत.  हे आपण समजून घेतले पाहिजे. तपास यंत्रणाचा गैरवापर करून विरोधी पक्ष संपवून टाकायचा हेच मुळात लोकशाही विरोधी आहे आणि आमच्याकडचे उच्च शिक्षित लोक मोदी सरकार म्हणतात. पण मोदी सरकार किंवा कोणताही व्यक्ती सरकार कसे होईल ? हा प्रश्न लोकांना पडत नाही जेंव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या नांवे सरकार म्हणतो तेंव्हा आपण हुकूमशाहीचे समर्थन करीत असतो. आणि  असे लोक आमच्या वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहेत ते काय शिकवत असतील लोकशाही ? हाचा मोठा प्रश आहे आणि समस्या सुद्धा आहे. कोंग्रेसमुक्त भारत ही भाजपाची घोषणा सुद्धा लोकशाही विरोधी आहे. हे आपल्याला संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तेंव्हाच सांगितले आहे की, सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधी पक्ष सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे तो सत्ताधारी पक्षाच्या कामावर नियंत्रण ठेवतो आणि त्यांना चुकीचे निर्णय घेण्यापासून परावृत्त करतो. शेवटी एकच म्हणावे वाटते,

हम न नास्तिक है न आस्तिक है , हम तो केवल वास्तविक है ….. जो अच्छा लगे उसे ग्रहण करो , जो बुरा लगे उसका त्याग करो , फिर चाहे ओ विचार हो , कर्म हो , मनुष्य हो या शर्म हो … |

                                                                                           प्रा. डॉ. आर. जे. इंगोले 
                                                                                चांदवड , नाशिक ( मोबा: 9423180876 )

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!