कुलगुरु सभ्य, उच्च सुशिक्षित व सुसभ्य,सुसांस्कृतिक नागरिक असावा?

प्रा.मुकुंद दखणे,

कुलगुरू, अर्थात विद्यापीठीय शिक्षण हे देशातील भावी नागरिक व राष्ट्रीय भवितव्य घडविण्याचे महान कार्य करीत असते.परंतु,विद्यापीठासारख्या
पवित्र क्षेत्रात भ्रष्ट आचार, धार्मिक कर्मकांड व असामाजिक,अराष्ट्रीय प्रशासकीय कार्य ह्या दुःखद, वेदना देणार्या आहेत.
वास्तविकतः विद्यापीठे या स्वायत्त संस्था असून, कुलगुरूचे शैक्षणिक आणि सामाजिक स्थान मोठे आहे. ते स्थान कायम राखण्याचा आणि या स्थानाला, पदाला न्युनत्व येणार नाही, याची काळजी कुलगुरूना घेणे अत्यावश्यक आहे.भ्रष्ट मार्गानेच जर कुलगुरूची नियुक्ती, राजकीय दृष्टिकोनातून झाली असेल,? तर असा कुलगुरू पदाची गरीमा कशी कायम राखणार?हा खरा प्रश्न आहे.
म्हणूनच,
कुलगुरू महोदयांनी, स्वतःहून नोकरशाहीच्या पंक्तीत बसण्यापेक्षा,विद्यापीठ एक स्वायत्त संस्था म्हणून,कोणत्याही राजकीय दबावाला व भ्रष्टाचाराला बळी न पडता, कुलगुरूंनी शिक्षण क्षेत्रात संशोधनात्मक व सुसांस्कृतिक शैक्षणिक वातावरण निर्माण करून, विद्यापीठाच्या दर्जा बरोबर च राष्ट्राचाही सामाजिक, आर्थिक व राजकीय,व सुसांस्कृतिक दर्जा
कसा आंतरराष्ट्रीय टाॅप चा ठेवता येईल?[उदा. बुद्ध कालीन विद्यापीठे,नालंदा तक्षशीला,वगैरे ]असा प्रयत्न करावा.
माझ्या अल्प ज्ञानानुसार
नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू,विरूद्ध राजपाल प्रकरणातील, उच्च न्यायालयाचा निर्णय हे स्पष्ट करतो की,
विद्यापीठात अशाच सुसभ्य, उच्च सुशिक्षित नागरिकाची नियुक्ती केली जाते?
प्रा.मुकुंद दखणे,
यवतमाळ 9373011954.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत