महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
दुटप्पी भूमिका ; महाराष्ट्रातील जनता मुर्ख नाही…!!

- १५ओबीसी आणि ३ मुस्लिम संसदेत पाठवू म्हटल्या बरोबर वंचित बहूजन आघाडी सोबतची चर्चा बंद करणारे सरंजाम म्हणतात आम्हाला संविधान वाचवायचे आहे. लोकशाही वाचवायची आहे…???
- आपल्या कुटुंबातच सत्ता राहिली पाहिजे म्हणून एका एका जागेसाठी भांडणारे म्हणतात संविधान वाचवायचे आहे. लोकशाही वाचवायची आहे….???
- घराणेशाही अधिक मजबूत करण्यासाठी एकाच मतदारसंघात ननंद भावजयी लढतात, संपूर्ण घराणं मतदारसंघात फिरवतात आणि वरुन म्हणतात लोकशाही वाचवायची आहे संविधान वाचवायचे आहे….???
- नेत्यांच्या मुली मुलांना, आणि पत्नीला तिकीट जाहीर करून राजरोसपणे म्हणतात की, लोकशाही वाचवायची आहे, संविधान वाचवायचे आहे….???
- सासरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि सुन भाजपचे तिकीटावर लढतेय तरीही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतेय संविधान वाचवायचे आहे आणि लोकशाही वाचवायची आहे…???
- एक भाऊ सेक्युलर पक्षात, दुसरा भाऊ पुरोगामी पक्षात आणि मावसभाऊ हिंदुत्ववादी पक्षाचे तिकीट घेऊन लढतोय तरीही मविआ मधील लोक म्हणतात आम्हाला संविधान वाचवायचे आहे आणि लोकशाही वाचवायची आहे…???
- मिडिया हातात आहे म्हणून मविआ ने कितीही ढोंग करतो म्हटले तरी जनता मुर्ख नाही, संविधान वाचविण्याच्या बुरख्या आडून तुम्ही घराणेशाही अधिक घट्ट करण्याची धडपड करीत आहात हे जनतेला आता कळून चुकले आहे…!!
- अतिशय अटीतटीच्या आणि आणिबाणीच्या काळात संविधान धोक्यात असतांनाच्या काळात मविआ धूर्तपणे घराणेशाही अधिक घट्ट करण्यासाठी प्रयत्न करतेय हा महाराष्ट्रातील जनतेशी मोठा द्रोह आहे…!!
- महाराष्ट्रात संविधानवादी मोठा वर्ग आहे, आंबेडकरवादी, ओबीसी, अल्पसंख्याक, आदिवासी, दलित या मोठ्या वर्गाला संविधानाने हक्क आणि अधिकार मिळवून दिले आहेत, त्यांना संविधान वाचविण्याची नितांत गरज आहे आणि मविआ या मोठ्या वर्गाशी द्रोह करीत आहे…!!
*संविधान वाचविण्याची नितांत गरज असतांना तुम्ही काय करीत आहात.???
असा प्रश्न उद्या तुम्हाला ऊभा महाराष्ट्र विचारेल हेही लक्षात घ्या….!!
जयभीम..
@.. भास्कर भोजने.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत