महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

आरक्षणाचे उपोषण आवरले

तानसेन ननावरे


गेल्या सात महिन्या पासून सुरु असलेल्या उपोषण आंदोलनाचा समारोप करुन मनोज जारंगे वैधकीय उपचारा साठी संभाजी नगरात दाखल झाले आहे
मराठा समाजाला १० टक्के स्वंन्त्रार आरक्षणाचा कायदा राज्यपाल जारी करणार आहे
सगेसोयरेची अधिसूचना निघाली आहे त्यावर साडेसहा लाख हरकती नोंदविल्या गेल्या आहे त्या प्रत्येक हरकतीची छाननी सुरु आहे
अश्या पधतीने मराठा आणि कुणबी आरक्षणाचा मुद्दा अंतिम टप्प्यात आला असताना मनोज जारंगे यांनी अतिशय नाट्यमय रित्या अचानक आंदोलनाचा विचका करणारा निर्णय व वक्त्यव का केले याची चर्चा केली जात आहे त्यानी फडणवीसवर केलेले आरोप बालिश तथा खोटे आहे हे फडणवीसांचे दुश्मन देखील मान्य करतील माझा बळी घेईल मला गोळी घालतील सलाईन मधून विष देईल आणि म्हणून मी फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जात आहे घाल मला गोळी असा कांगावा करीत फडणवीस व त्यांच्या जातीला त्यांच्या कुटुंबाला अश्लील अर्वाच्च शिव्या दिल्या यावरुन जारंगे याचे मानसिक संतुलन बिघडल्याचा संशय बळावत गेला
लागलीच अण्णासाहेब पाटील यांची आठवण झाली मराठा आरक्षणाच्या मागणीचे जनक अण्णासाहेब पाटील यांनी विराट मोर्चा काढला व त्याच रात्री स्वतःचे पिस्तुलाने मस्तकात गोळी मारुन आत्महत्त्या केली
नंतर शशिकांत जगताप यांनी मराठा महासंघ स्थापन करुन मराठा आरक्षनाची मागणी लढा केला त्यात त्याना यश आले नाही
वसंतदादां पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी मागणी केली असता त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली राजकीय विजनवास स्वीकारावा लागला
त्या नंतर वीस पंचवीस वर्ष मराठा आरक्षणाचा मुद्दा थंड बासनात पडला
कोपर्डी घटनेचा निषेध म्हणून जे ५६ मराठा क्रांती मोर्चे निघाले त्या मोर्चात मराठा आरक्षण मागणीने जोर धरला फडणवीस सरकारने मराठ्याना १३ टक्के आरक्षण दिले ते हायकोर्टात टिकले परंतु सर्वोच्च कोर्टाने फेटाळले कोर्टात कायदेशीर लढाईची वेळ आली फडणवीसांची सत्ता गेली उद्भव ठाकरे मुख्यमंत्री झाले अर्वोच्च कोर्टाने आरक्षण फेटाळले
उद्भव ठाकरे नंतर एकनाथ शिंदे आले शिंदे सरकारने अहोरात्र काम केले मनोज जारंगे यांची हरेक मागणी मान्य केली कुणबी नोंदी असलेल्याना ओबीसी मधून व मराठ्याना१० टक्के स्वंतत्र आरक्षण दिले
परंतु सुरवाती पासून आडमुठी भूमिका घेणारे जारंगे नाराज होते त्यांच्या नाराजीचे कारणे काय असावीत एक तर श्रेय त्याना मिळत नव्हते
२० फेब्रुवारी पर्यंत शांत व त्यांच्या सोबत असलेले त्यांचे सहकारी भागीदारअसलेले अजय महाराज बावसकर वाळेकर बोलू लागले पोल खोलू लागले शरद पवार राजेश टोपे कनेक्शन ओपन होवू लागले त्या मुळे जारंगे कुणा कुणाला मॅनेज होते शरद पवारांना का एकनाथ शिंदे याना असा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने उपोषण समाप्ती शिवाय पर्याय उरला नसल्याने जारंगे दवाखान्यात एडमिट झाले
मनोज जारंगे यांच्या उपोषणामुळे मराठा विरुद्ध ओबीसी मराठा विरुद्ध ब्राह्मण वाद उसळून आला आहे त्या मुळे मराठा एकाकी पडून मराठे विरुद्ध मराठेत्तर आशा राजकीय संघर्ष उभा राहणार आहे
मराठा सधन आहे मुख्यमंत्री मंत्री खासदार आमदार कारखानदार जमीनदार
सहकार सम्राट शिक्षण सम्राट दारू सम्राट जरी मराठे असले तरी मराठे गरीब आहे गरिबीत मराठे आहे आत्महत्या करणारा शेतकरी मराठा आहे
तो गरीब मराठा प्रस्थापित मराठा विरोधात एकवटू लागला आहे ही जारंगे यांच्या उपोषणाची निष्पती आहे त्याच बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आहे ही एकनाथ शिंदे यांची नवी ओळख उभ्या महाराष्ट्राला जी मिळाली ती जारंगे यांच्या उपोषणा मुळेच
एकनाथ शिंदे कट्टर कडवट शिवसैनिक आहेत बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांचे एकनिषिठ सच्चे शिष्य आहे एकनाथ शिंदे ठाण्याचे आहे अशी त्यांची ओळख होती आता शिंदे मराठा मुख्यमंत्री आहे अशी ओळख झाली आहे त्या मुळे दहा टक्क्याचे आरक्षणकोर्टात टिकवणे ही त्यांची जबाबदारी आहे
तानसेन ननावरे
युनायटेड रिपब्लिकन पार्टी

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!