महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसामाजिक / सांस्कृतिक

” बूरा ना मानो होली है..!” असं चालणार नाही – रेल्वे आणि बेस्ट प्रशासनाचा निर्णय.

होळीचा सण राज्यात अनेक ठिकाणी विविध प्रकारे साजरा केला जातो. वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत. अती उत्साहात सर्वसामान्यांना नाहक त्रास देण्याचे प्रकार सुध्दा घडत असतात परंतु ” बुरा ना मानो होळी है !” अस म्हणत सर्व सहन केले जाते.

होळीच्या दिवशी होणारी रंगांची उधळण आणि अनेकदा घणारे अप्रिय प्रसंग, त्यामुळं उत्सवाला लागणारं गालबोट अशी परिस्थिती ओढावू नये यासाठी मध्य रेल्वे आणि बेस्ट प्रशासनासह पोलीस यंत्रणाही सज्ज आहेत. 

होळीसह रंगपंचमीच्या दिवशी लोकल ट्रेनवर रंग किंवा पाण्यानं भरलेले फुगे मारल्यास ते प्रवाशांना लागून त्यामुळं त्यांना इजा होण्याचा धोका असतो. त्यामुळं अशी कृत्य न करण्याची ताकिद अतिउत्साहींना देण्यात आली आहे. फक्त रेल्वेच नव्हे, तर मुंबईतील बेस्ट बसवरही रंगाचे फुगे मारल्यास हे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करत त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात येईल. 

रंगपंचमीपूर्वी दोन – तीन दिवस आधीपासूनच अशा घटना घडण्यास सुरुवात होते. रेल्वे झोप़डपट्टी किंवा दाटीवाटीनं असणाऱ्या वस्तीतून पुढं जाताना अशा घटना घडतात, ज्यामुळं प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळं असा कोणताही प्रकार घडू नये यासाठी आता रेल्वे प्रशासन कायद्याचीच मदत घेताना दिसत आहे. 
आपल्या परंपरा जपताना माणुसकी दुखावली जाईल असं कृत्य करू नये अन्यथा सनातील आनंदा पेक्षा पश्र्चाताप जास्त होतो.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!