
महाराष्ट्रातील ४२ तालुक्यांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, केंद्र सरकारचे पथक १३ ते १४ डिसेंबरदरम्यान दुष्काळपाहणी करणार आहे.
दुष्काळाचा फटका बसलेल्या १५ जिल्ह्यांपैकी ८ जिल्ह्यांतील स्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा पथकाचा विचार आहे. पथकाचे नेतृत्व कृषी विभागाच्या केंद्रीय सचिव प्रिया रंजन करणार आहेत. पथकात निती आयोगाचे सदस्य आणि केंद्रातील विविध विभागांतील प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
राज्यात पावसाच्या खंडामुळे मूग, उडीद ही पिके घेताच आली नाहीत, तर कापसाची वाढ होऊ शकली नाही. छत्रपती संभाजीनगर, जालनासारख्या जिल्ह्यात मका पीक पूर्णत: वाळले. अनेक भागांत नोव्हेंबरमध्ये पिण्याच्या पाण्याचा टँकरने पुरवठा करावा लागला. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागांत जनावरांच्या चाऱ्याचे प्रश्नही गंभीर बनतील, असे चित्र आहे. त्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती निधीतून मदत करावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवला आहे. त्याची तपासणी करण्यासाठी केंद्रीय पथक १२ डिसेंबरला पुण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडबरोबरच धाराशिव, पुणे, सोलापूर आणि नाशिक, जळगाव या जिल्ह्यांत पथक पाहणी करणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत