महाराष्ट्रमुख्यपानविदर्भसामाजिक / सांस्कृतिक

बुध्दाचे खरे तत्त्वज्ञान आणि भेसळ

हंसराज कांबळे ✍️
8626021520
नागपूर.

बुद्धाचे खरे तत्त्वज्ञान संदर्भ देऊन आपण सांगितले आहे.शेवटचा परिच्छेद मधील जेणेकरून बौद्ध उपासक – उपासिका यांना नेहमीच चांगले विचार आणि चांगल्या गोष्टींचाच विचार करण्याच्या सवयीपासून परावृत्त करण्यासाठी तात्पुरती नकारात्मक स्थिती निर्माण करणाऱ्या समाधीचे धडे देत असते हे शतप्रतिशत सत्य आहे.

भगवान बुद्धाच्या मूळ शिकवणीचा उपदेश आणि ब्राह्मण भट भिक्षु ह्यांनी त्यांच्या विचारात केलेली भेसळ पुढे पुढे तेच भेसळयुक्त विचार बौद्ध भिक्कू, थेरो - महाथेरो, बौद्धाचार्य हे बौद्ध धर्मातील उपासक-उपासिकांना आपल्या धम्मदेशनेतून देत असतात.
चौथ्या शतकात ब्राह्मणांनी बौद्ध धर्माचे मूळ पाली भाषेत जे त्रिपिटक ग्रंथ होते त्या ग्रंथातील बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचे " ब्राह्मणी धर्माला पोषक आणि बौद्ध धम्माला घातक " अशा स्वरूपात ब्राह्मणीकरण केले. याप्रमाणे ब्राह्मणांनी बुद्धांच्या मूळ तत्त्वज्ञानात भेसळ केली अथवा त्याचे प्रक्षीतीकरण केले. या प्रक्षिप्तिकरणाचे स्वरूप दर्शविताना आचार्य धर्मानंद कोसंबी म्हणतात - " मंग या सर्व अद्भुत गोष्टी बोधिसत्वाच्या चरित्रात आल्या कुठून ? महापदा सूत्तातुन. यात पूर्व युगीन सहा व या युगातील गौतम बुद्ध मिळून सात बुद्धांची चरित्रे आरंभी संक्षेपाने देऊन मग विपस्सी बुद्धाचे चरित्र विस्ताराने वर्णिले आहे. तो एक नमुना असून त्याचप्रमाणे इतर बुद्धांची चरित्रे  वर्णावी , असे अट्ठठ कथाकार म्हणतात - या वर्णनातील बहुतेक भाग हे सूत्त रचण्यापूर्वी किंवा नंतर गौतम बुद्धाच्या चरित्रात दाखल करण्यात आले. ( भगवान बुद्ध पृष्ठ. क्रं.82 ) 

संदर्भ – बुद्धांनी विपश्यना सांगितली का ? लेखक – आद. एन. जी. कांबळे सर, नागपूर. पृष्ठ. क्रं.11. पैरा – पहिला.

 या कपोलकल्पितरित्या तयार केलेल्या दंतकथा ब्राह्मणांनी बुद्धाच्या चरित्रात घुसडविल्या. आणि त्याला बौद्ध धम्माचे अंग बनवून बनविण्याचा धूर्तपणे प्रयत्न केला. हीच त्यांची चतुराई आहे. हे ओळखणे गरजेचे आहे.
 शेवटी एवढेच म्हणता येईल की, जसे हिंदू धर्मातील लोकांना देवभोळेपणात गुंतवून ठेवून त्यांच्यावर अधिराज्य करून भावनिक बनवितात तसेंच ब्राम्हण भिक्षु ह्यांनी बुद्धाच्या निर्वाणानंतर त्यांच्या मूळ शिकवणुकीत आरपार असे भेसळयुक्त विचार लिखित स्वरूपात टाकून हिंदू धर्मासारखेच बौद्ध धर्मीय भन्ते उपासक-उपासिकांना शिकवण देत असतात. मग असं म्हणता येईल " हिंदू धर्मात जसे तसेंच बौद्ध धर्मात ही शिकवण आहे असे सांगून प्रचार - प्रसार करीत असतात"
म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास तुलनात्मक अभ्यास करावा लागेल असे म्हणून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यात परिचय मध्ये बौद्ध धर्मातील लोकांनी यावर जास्तीत जास्त प्रकाश टाकावा आणि ग्रंथात ज्या त्रुटी, उणीवा आहेत, दूषित पाणी आत येत आहे त्याची छिद्रे बुजविण्याचे मी काम करणार आहे असे कां बरे म्हटले असेल ?  ह्याचे चिंतन, मनन करून विवेकबुद्धीने व जिज्ञासु वृत्तीने समजून घेणे गरजेचे आहे.हीच खरी धम्म समजून घेण्याची कसोटी आहे.

दि.19 मार्च 24.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!