भाजपा च्या फुग्यातील हवा कमी; झटक्यात ७० जागा गायब

भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेचा परिणाम.
मुंबई : शनिवारी मुंबई पार पडलेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या सभेवरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये शाब्दिक वाद सुरु असतानाच ठाकरे गटाने या सभेवरुन विधानं करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सुनावलं आहे. ही सभा पाहून भाजपाचा लंगोट सुटला आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला असून कठोर शब्दांमध्ये या सभेवरुन भाजपावर निशाणा साधला आहे. मुंबई येथे समारोप झालेल्या सभेचा प्रभाव इतका पडला की भाजपा चा आत्मविश्वास ढासळला आहे. मोदी म्हणतात, या वेळी 370 जिंकू, पण अमित शहांनी आता सांगितले 300 जिंकू. म्हणजे मुंबईतील एका सभेनेच हुकूमशहांच्या 70 जागा कमी केल्या,” असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत