महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

तुम्ही 70 वर्षाचा हिशोब मागताय आम्ही 10 वर्षाचा हिशोब करू– नितिन बोदे यवतमाळ

गेली 10 वर्ष भारतात सत्तेत असलेला पक्ष जेव्हा आपली भूमिका मांडतो तेव्हा तेव्हा तुम्ही 70 वर्ष काय दिल हेच बोलतो परंतु आता ही संधी आपल्याला आहे की तुम्ही 10 वर्षात काय दिवस दाखवले.

2014 साली देशात सत्तारूढ झालेल सरकार ज्यांच्या नेत्यांनी आम्हाला एक मोठ स्वप्न दाखवत देशाची सत्ता हस्तगत केली. परंतु गेली 10 वर्षात या सत्ताधारी पार्टीत देशाची बरबादी, भ्रष्टाचार शिवाय काहीच करता आलेल नाही.

या 10 वर्षात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे.
राफेल पासुन नोटबंदी पर्यंत भ्रष्टाचार
कोरोणा पॅकेजच्या नावावर भ्रष्टाचार
नफ्यात सुरु असलेल्या सरकारी कंपन्या, ऊदयोग कवडीमोल भावात विकून केलेला भ्रष्टाचार
न्यायालयही यावर कधी काही बोलले नाहीत.
विरोधकांना धमकावन, खोट्या गुन्ह्यात जेलमधे टाकणे, ब्लॅकमेल करणे, पक्ष बदलुन तिच व्यक्ती सत्ताधारी पक्षांत गेली कि तिचा ऊदो ऊदो करणे,
टपोरी लोकांनी हाताशी धरुन विरोधकांची निंदानालस्ती करणे,
धमक्या देने, धडधडीत खोटे बोलने.
असल्या असंख्य विकृतींनी 10 वर्षातले सतताधारी राजकारण बरबटले आहे.

एकप्रकारचा माज सत्ताधाऱ्यांच्या कृतीतून दिसत आहे. खोटा ईतिहास खोटे पुरावे, देव-धर्म असल्या भाकड गोष्टीत देशाला गुंतून ठेवण्याचे षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी 10 वर्षात राबवले.

धर्म,जात, भाषा,प्रांतवाद, नकली राष्ट्रवाद या दुष्टचक्रात आपन कळतनकळत फसलो आहोत. माकडांच्या आरत्या गायला लागलो आहोत, त्यांनाच आपले भाग्यविधाते समजायला लागलो आहोत.
म्हनुनच आपन आराजकतेच्या दारात ऊभे आहोत.
आपन कोणत्याही जाती धर्माचे असा,कोणत्याही राजकीय पक्षाचे असा परंतु द्वेष हा आपल्या जगण्याचा आधार असुच शकत नाही.
गेली 10 वर्षात मानसा मानतात हा द्वेष निर्माण करण्यात सत्ताधारी मात्र यशस्वी झाले आहेत.

आज आपन विनाशाच्या दारात येऊन पोहचलो आहोत,तरी वेळ अजुन गेलेली नाही स्वताच्या मनाला सावरा, स्वच्छ मनाने विचार करा एकमेकांशी संवाद साधा, सत्य जाणुन घ्या झालेल्या चुका मान्य करा.

माणुस जगला तरच देश जगेल,धर्म जगेल आणि तुम्हीही जगाल याच भान ठेवून तुमच्या पुढच्या पिढ्यांची राखरांगोळी करायची दुर्बुद्धी ज्या नेत्यांच्या हलकटपना मुळे तुम्हाला झाली त्याची भक्ती करणे आता बंद करा. सैतानाचे अंधभक्त बनुन तुम्ही आज संपुर्ण जगात सर्वोच्च सर्वात जास्त सोईस्कर अशा संविधानावर घाला घातला आहे.

सत्ताधाऱ्यांकडे पैसा आहे,गुंडांच्या टोळ्या आहेत,त्याच्याच बाजूने न्यायालये त्याच्याच बाजुने मिडिया आहे. आणि सेना,पोलीस त्यांच्याच जवळ आहे आणि आम्ही कोणालाही चिरडून टाकु शकतो अशा भ्रमात ते आहेत. परंतु जयजयकार छरनारे जे कालपर्यंत आपल्या सोबत आहेत तेच लोक यांना कुत्र्यासारखे हाल करून मारतील याला ईतिहास साक्षी आहे.

गेली 10 वर्षात हा देश आता दुरुस्तीच्या पलीकडे गेला आहे. या मतापर्यंत आपन पोहचलो आहोत.
गगनाला भिडलेली महागाई, महिलांवरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या ऊचचांक बेरोजगारी, वाढते कर्ज, चिन सारख्या शञु देशाने केलेले अतिक्रमण या सर्व गोष्टी सोडून देशातील जनतेला जर त्यांचा धर्म(तो कोणतीही असो) खतरेमे वाटत असेल तर असा देश दुरुस्तीच्या टप्प्यात आहे हे तरी कसे मानायचे.

काळ पुढे सरकेल तसे ईतिहासात गाडले गेलेले मुडदे ऊकरले जात आहेत आणि जनतेच्या फुकाच्या असमितांना खतपाणी घालुन देशातील सत्ताधारी पक्षाकडून देश मातीत घालण्याचा प्रयत्न गेली 10 वर्षात झाला.
रामलला प्रकटले म्हणत देशातल्या तरूणाईला नादाला लाऊन एक अख्खी पिढी धर्मांध बनवुन नासवली गेली आहे.
हा संपुर्ण क्रम जर जनतेच्या वेळेतच लक्षात आला तरच बदल घडवून आनु शकतो.

राजकीय विरोधकांना शञु समजुन, विरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवुन आणी ईतर पक्षांच्या नेत्यांना साम,दाम, दंड,भेद आपल्याकडे वळवून सत्ताधारी पक्षाने देशाचे कोणते भले केले.

देश वाचवण्याची शेवटची संधी आता आपल्या जवळ आहे. 70 वर्षाचा हिशोब मागनारयांचा 10 वर्षातला हिशोब तपासून सत्ताधारी विकृत विचारधारेचा अंत आता करायचा आहे.

अच्छे दिनच्या नावाखाली देशात एका राजकीय सत्ताधारी पक्षांने केलेली लुट थांबवायची आहे. देशाला पुन्हा एकदा समृद्ध भारत बनवायचा आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!