मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

त्या पारधी कुटुंबास अखेर न्याय; तीव्र आंदोलन, आंबेडकरी चळवळीचा रेटा व ह्युमन राईट्स च्या मध्यस्तीने अखेर गुन्हा नोंद.

व्यवस्थे विरूध्द केलेल्या तीव्र आंदोलनामुळे, ह्युमन राईट्स च्या मध्यस्थीने व आंबेडकरी चळवळीच्या रेट्यामुळे अखेर गुन्हा नोंद.

उस्मानाबाद . दि . 17. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 13 मार्च 2024 पासून एक पीडित पारधी समाजाचे कुटुंब त्यांच्या मागणीसाठी अमरण उपोषणास बसले होते. बलात्काराचा प्रयत्न असा गंभीर आरोप असतानाही पोलीस प्रशासन गुन्हा नोंद करून घेत नव्हते. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी विविध सामाजिक संघटना, जिल्ह्यातील विशेषतः धाराशिव येथील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते. अखेर काल दिनांक. १७ मार्च २०२४ रोजी या सर्वांच्या प्रयत्नाला यश आले व पीडिता पल्लवी विजय भोसले यांच्या फिर्यादीवरून लक्ष्मण कदम व विलास कदम रा. कानेगाव ता. लोहारा यांच्याविरूध्द लोहारा पोलीस स्टेशन येथे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत कलम 3(1 ) व 3(2) अन्वये तसेच भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत कलम 254, 354A, 353, 323, 504, 506, 427, 34 या कलमा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, प्रकरणाची माहिती मिळताच दिनांक 13 मार्च पासून 16 मार्च पर्यंत आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते विविध सोशल माध्यमांचे पत्रकार आणि सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी त्यांची भेट देऊन चौकशी केल्या असता असे निदर्शनास आले की पल्लवी विजय भोसले या महिलेवर कानेगाव येथील दोन सवर्ण जातीच्या लोकांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.त्याची फिर्याद घेऊन लोहारा पोलीस स्टेशन येथे गेले असता त्यांची तक्रार नोंद करून घेतली नाही त्यांना या घटनेचे पुरावे मागण्यात आले त्यामुळे सदर महिला तिचे पती सासू व चार महिन्याचे लहान बाळ यासह 13 मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणासाठी बसले होते प्रशासनाकडून योग्य ती दखल न घेतल्याने व लहान बाळाचे हाल होत असल्याने सदर कुटुंब रस्त्यावर बसणे वाहने अडवणे असे वर्तन करणे चालू होते.

यावेळी पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रयत्न करून उभयतांना शांत केले. मात्र रात्री आठ ते नऊच्या दरम्यान पीडित पती आत्महत्येचा प्रयत्न करणार असल्याचे समजल्यावर पुन्हा त्यांची भेट घेतली व त्यांना समजून सांगून शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु परिस्थिती हाता बोहर जात आहे हे लक्षात घेता परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेऊन तात्काळ माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांची भेट घेऊन प्रकरण निकाली काढले व रात्रीच सदर कुटुंबाला लोहारा पोलीस स्टेशनची गाडी मागून त्यांचे फिर्याद त्यांच्या मागणीप्रमाणे नोंद झाली.

भोसले यांच्या या गंभीर विषयाला हात घालून तो मार्गी लावण्यासाठी सहकार्य करणाऱ्या विविध आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, विविध सोशल माध्यमांचे पत्रकार, ह्युमन राईट्सचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचे ही सर्व स्तरातून कौतुक होत आहे.मात्र न्याय मिळण्याचा मूलभूत संविधानिक अधिकार असतानाही १४ दिवस एक कुटुंब रस्त्यावर बसले आहे हे माहीत असुनही दुर्लक्ष किंवा योग्य ती दखल व कारवाई न करणाऱ्या प्रशासनाबद्दल सुद्धा सामान्य जनतेतून राग सुध्धा व्यक्त होत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!