मोदी खोटारडेपणाची फॅक्टरी; महाराष्ट्रात लीडर नाही, डिलर ! – तेजस्वी यादव.

काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा (Bharat JodoNyay Yatra) समारोप शिवाजी पार्कवरच्या जाहीर सभेने झाला. देशातील दिग्ग्ज नेत्यांनी मंजावर हजेरी लावली अन् भाजपविरुद्ध एल्गार केला. शिवाजी पार्कवर बोलताना तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी जोरदार भाषण केलं अन् भाजपवर हल्लाबोल केला. त्यावेळी त्यांनी भाजप नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.
महाराष्ट्रात लिडर नाहीत तर डीलर आहेत. घाबरलेलले लोक गेले त्याने काही फरक पडत नाही, असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात फक्त आमदार पळवून नेलंय, पण बिहारमध्ये आमच्या चाचाला पळवून नेलंय. माझे काका पुन्हा पलटणार नाहीत याची मोदींनी गॅरंटी द्यावी, असा घणाघात तेजस्वी यादव यांनी केला.
भाजपच्या लोकांना शेण पण हलवा म्हणून खायला घालतात. मोदी म्हणजे खोटारडेपणाची फॅक्टरी असल्याची टीका तेजस्वी यादव यांनी केली.
आम्ही राहुल गांधींचे आभार मानतो की त्यांनी देशभर प्रवास केला आणि आजच्या काळात अतिशय महत्त्वाचा संदेश देण्याचे काम केले. आज एकीकडे द्वेष पसरवला जात आहे, जिथे संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे. दुसरीकडे राहुल गांधींनी सर्व लोकांना एकत्र करण्यासाठी, संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी, द्वेषाचा पराभव करण्यासाठी भारत जोडो यात्रा काढली. मी त्यांचे आभार मानतो, असंही तेजस्वी यादव म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत