महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

लोककल्याणकारी राज्याची कल्पना संविधानाच्या उद्देशिकेत !

१४ मार्च २०२४

भारत हा नेमका कसा असावा, लोकशाही कशासाठी असावी ?याचा थोडक्यात धांडोळा घेतला गेला आहे तो म्हणजे संविधानाच्या उद्देशपत्रिकेत कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी ती का करावी याचा उद्देश नक्कीच असतो. अगदी आपण चालत असताना देखील डाव्या किंवा उजव्या बाजूला चालतो. भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा झाली खरी पण एवढ्या मोठ्या देशाचा राज्यकारभार चालायचा कसा? कारण, अनेक वसाहती होत्या, संस्थानं होती तर कितीतरी भाषा, जात, पंथ होते. पण यापुढे भारताने मान तुकविली नाही. या सगळ्यांना सन्मान देत भारतीय राज्यकारभारासाठी घटना समीती स्थापन करण्यात आली. जवळजवळ बावीस समित्या स्थापन करण्यात आल्या. पण, संविधान निर्मितीचे कार्य मसुदा समितीचे होते. जिचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणून नव्हे तर संपूर्ण संविधान निर्मितीचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिलया पेलले म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. संविधान कशासाठी ? संविधानाला अपेक्षित काय ? या प्रश्नांची उत्तरे आपणास संबिधानाच्या उद्देशपत्रिकेतून मिळतील. त्यामुळे संबिधान केवळ कायद्याचा दस्तऐवज आहे असे नाही, हे आपणास उद्देशपत्रिकेतून लक्षात येईल. संविधानात धर्मनिरपेक्ष राज्याची कल्पना केली आहे. मुळात हेच आपण डोक्यात घेऊन संविधानातील धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्माला धक्का निर्माण होईल आणि त्याची प्रचिती आणण्यासाठी संविधानातील धर्मनिरपेक्षप शब्दाचे काही जणांना वावडे आहे. बरं धर्मनिरपेक्ष शब्द संविधान दुरुस्ती करून सामाविष्ट केला असला तरी तो कोणत्याही धर्माला विरोध करीत नाही. ही बाब स्पष्ट मग तो शब्द आता आला काय किंवा कसे? या प्रश्नाचे उत्तर गौण आहे. कारण, संविधान प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्य देते. पण, सार्वजनिक ठिकाणी धर्माला आणता

संविधान

कामा नये, असेही सांगते, मग बिघडते कुठे? समकालीन भारतातील धर्म स्वातंत्य हा देशाच्या घटनेच्या कलम २५ अंतर्गत हमी मिळालेला मूलभूत हक्क आहे. त्यानुसार, भारतातील प्रत्येक नागरिकास स्वतःच्या धर्मावर श्रद्धा ठेवण्याचा, आचरण करण्याचा आणि प्रसार करण्याचा हक्क आहे. जर प्रत्येक धर्म सार्वजनिक ठिकाणी आणला गेला तर भारतात विविध जाती-धर्माचे लोक राहतात त्यांच्यामध्ये जुंपणार नाही असे कशावरून, मग संविधानाच्या उद्देशपत्रिकेतील धर्मनिरपेक्षतेचे काय?पण, अशामुळे दंगली पेटतील हे सांगावे असे वाटत नाही. कारण, गेल्या काही वर्षांत रस्त्यावर धर्म आणून सर्वसामान्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. कधी नव्हे ते देवदेवतांच्या मिरवणुकीची चुरस पहायला मिळाली. याचा फायदा राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी झाला. पण संविधानाला अपेक्षित राज्याचे काय? संबिधान लोककल्याणकारी राज्य बनविण्यासाठी आहे. मग, यात आहे का लोककल्याण ? असा प्रश्न आपसूकच उपस्थित होतो. १८ डिसेंबर १९७६ साली ४२ व्या घटनादुरुस्तीत समाजवादी, धर्मनिरपेक्ष, राष्ट्राची एकात्मता हे तीन शब्द सामाविष्ट करण्यात आले. पण या तिन्ही शब्दांचा बोलबाला नेहमी भाजपेयी करताना दिसतात. हे तिन्ही शब्द संविधानाचा उद्देश स्पष्ट

करतात हे विसरता येणार नाही, त्यामुळे या शब्दाचा नको तेवढा बोलबाला करणारे महाशय या शब्दाचा वापर कृतीत करून ते शब्द भारतातील लोकांच्या लोककल्याणासाठी आवश्यक नाहीत याची खात्री करतील ? संविधान हे भारतीय नागरिकांनी स्वतः साठी बनविले आहे आणि स्वतः प्रत अर्पण केले आहे. त्यामुळे कुणा शासकाचे राज्य नाही तर हे लोकांचे राज्य आहे. हे आपण विसरलोय? भारत हा कोणत्याही राज्याच्या किंवा वसाहतींच्या अंमलाखाली नाही तर ते २६ जानेवारी १९५० रोजी सार्वभौम आणि जनतेची सत्ता असलेले राज्य आहे. ज्याद्वारे दर पाच वर्षांनी लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी जनता लोकप्रतिनिधींना मतदानाद्वारे निवडून देते. ज्याचा सर्वोच्च शासक राष्ट्रपती हा अप्रत्यक्ष आपण निवडतो, म्हणजेच लोकानुचतीं शासन संविधान देते आणि त्यासाठी लोकांमधून राज्याचे शासन चालविण्यासाठी मतदानाद्वारे लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात. पण, त्यासाठी उद्देशिकेतील संविधानाचा उद्देश सफल करण्यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजवादी, धर्मनिरपेक्ष यावर आधारित लोककल्याणकारी राज्य बनविण्यासाठी तशी शासक व्यवस्था लोकशाही मागनि सत्तेवर आली तर शक्य आहे. पण, ती जबाबदारी संविधानाने संपूर्णपणे जनतेच्या हाती दिली आहे. त्यामुळे दर पाच वर्षांनी येणारी संधी बाया जाऊ नये असे लोकानुनयी शासन निवडूण दिले पाहिजे. तर लोकशाही, संविधानाला अपेक्षित लोककल्याणकारी राज्य निर्माण होईल. अन्यथा उद्देश पत्रिकेतील उद्देश केवळ शाळेत मुलांना घोकंपट्टी करण्यासाठी आणि भिंतीवर लावून ठेवण्यापुरती मर्यादित राहील.

पद्माकर उखळीकर 9975188912

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!