जात हे राजकारणी शस्त्र

हंसराज कांबळे ✍️
8626021520
नागपूर.
संघ राजकारणी लोक कोणत्या वेळेस कोणता फंडा वापरतील ह्याचा मुळीच भरवसा ठेवता येणार नाही. *भारत हिंदू राष्ट्र बनवू या* असे लिहिणे हे *बेताल* पणाचे वक्तव्य आहे. जसे बुध्दाच्या मूळ शिकवणीत ब्राह्मण मनुवादी भिक्खुनी त्याच्या विचारात भेसळ करून ठेवली आहे तसेच आता राजकारणातील मनूवादी समर्थक पिलावळ, नेते असे उपरोक्त प्रमाणे बोलतानी दिसत आहे. त्याच लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात - *आपल्या जातीच्या हिताखातर हिंदूंनी देशद्रोह केला नाही काय*? असे जर ते म्हणत असतील तर खरंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे *भारत हिंदू राष्ट्राची संकल्पना करतील काय* ? हा कळीचा मुद्दा आहे. आणि आपण बौद्ध समाजाने ते समजून घेणे आजच्या घडीला संवेदनशील राहून जागृत राहणे अत्यावश्यक आहे. नाही तर येणारा पुढील काळ आपणासाठी आणि येणाऱ्या पुढील पिढी साठी घातक आहे.
*सत्ताधारी संघ हा नेहमीच सुधारकांचा छळ करण्यासाठी आणि सुधारणा नष्ट करण्यासाठी " जात " हेच त्यांचे मुख्य हत्यार असून त्याच भरवश्यावर ते सत्ता टिकवून आहेत* ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जाती व्यवस्थेमधील *हिंदू जात* याविषयी मार्मिकपणे लिखित स्वरूपात शब्दबद्ध करून लिहितात आणि म्हणतात -
*जातीने सामाजिक वृत्ती नष्ट केली आहे. जातीने सामाजिक दातृत्व भावनेचा नाश केला आहे. जातीने जन्मत अशक्य केले आहे. हिंदू साठी समाज म्हणजे त्यांची जात. त्याचे फक्त त्याच्या जातीशीच देणे घेणे असते. त्याची निष्ठा त्याच्या जातीपूर्तीच मर्यादित आहे. सदगुण जातीग्रस्त झालेला आहे आणि नैतिकता जातीबद्ध झालेली आहे.तिथे गरजू लोकांविषयी सहानुभूती नाही. तिथे गुणवंतांची कदर नाही. तिथे गरजवंतासाठी दातृत्व नाही. दुःखाला प्रतिसाद देण्याची तिथे गरज वाटत नाही. " तिथे दातृत्व आहे परंतु ते जातीपासून सुरू होते आणि जातीपाशी संपते. तिथे सहानुभूती आहे पण परजातीच्या व्यक्तीसाठी नव्हे. थोर आणि चांगल्या माणसाचे नेतृत्व मान्य करून हिंदू त्यांचे अनुसरण करेल काय*?
पुढे ते म्हणतात -
ब्राह्मण लोक केवळ नेता ब्राह्मण असला तरच त्याचे नेतृत्व स्वीकारतील , कायस्थ कायस्थाचेच नेतृत्व स्वीकारतील आणि त्याचप्रमाणे इतर जाती ही करतील. स्वतःपेक्षा वेगळ्या जातीतील माणसाच्या गुणवत्तेची कदर करण्याची क्षमता हिंदू मध्ये नाही. सदगुणांना किंमत आहे परंतु ती आपल्या जातीतील माणूस असला तरच. सगळे नैतिकता टोळी समाजा एवढी वाईट आहे
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे.पृष्ठ. क्रं.39 पैरा – पहिला. प्रकरण – तेरा.पुस्तक – जातिव्यवस्थेचे निर्मूलन. महात्मा गांधींना दिलेल्या उत्तरासह. लेखक – डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
उपरोक्त संदर्भानुसार संघ ब्राह्मण हिंदूंना मंदिराच्या नावावर देव - देवाता आधार घेऊन भक्तांना भावनिक बनवून सत्तापिपासू बनले आहेत. बुद्धाने ब्राह्मणी व्यवस्थेच्या यज्ञयागाच्या आणि विषमतेच्या विरोधात क्रांती केली तेव्हापासूनच प्रतिक्रांतीला सुरुवात झाली. परंतु प्रथम रक्तरंजित प्रतिक्रांती ही पुष्पमित्र शृंगने केली. ब्राह्मण वैश्य कधीही शांत बसत नाही. त्यांच्या डोक्यात इर्षा आणि देशाचा किडा निरंतर वळवळ करीत असतोच तीच ही मनुवादी पिलावळ विकृत बुद्धीचा वारसा चालवीत आहेत. हिंदू जाती बद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते पहा -
*खरे म्हटले असता हिंदू म्हणजे जगातले मोठ्यातले मोठे पाप आहे. ज्या हिंदू जातीने अनेक प्रकारचे कठोर निर्बंध घालून माणसाच्या माणुसकीची पहरनिश विटंबना चालविली आहे ती जात जगातून नाहीशी झाली तर तिच्यासाठी कोण अश्रू गाळील ? हिंदू जात आपले पाप आपल्या प्रांतातच ठेवील तरी बरे पण नाही. जिकडे जाईल ती आपल्या पापाची पेरणी केल्याशिवाय राहणार नाही. इतकी ही हिंदू जात उपद्रवी आहे. सिंध प्रांतात जावो अथवा साउथ आफ्रिकेत जावो हिंदू जात आपले पाप जिथे जाईल तिथे पसरविल्या शिवाय स्वस्त बसणार नाही. कुठेही जावो जगाच्या स्वच्छ जीवनाच्या झऱ्यात आपले पातकी जीवन मिसळून ती अशुद्ध करणार नाही असे होणे नाही. या पतित जातीला जगती तलावर थारा देणे ही मानव जातीच्या हिताच्या दृष्टीने मोठी आपत्ती आहे. मनुष्य मात्र तिच्या सानिध्यात राहावे लागणे हेच आधी मोठे दुर्भाग्य आहे. तिच्यात समावेश करून घेणे आणि तिच्या सत्तेखाली वागणे म्हणजे तर जिवंतपणीच नरक यातना भोगण्यासारखे आहे. अशा हिंदू जातीशी संबंध ठेवण्यास कोण तयार होईल ? तिचा संसर्ग न व्हावा म्हणून अलग होणे यातच खरे हित आहे. आणि म्हणूनच तो मार्ग वास्तुशांच्या प्रतिनिधींनी स्वीकारला आहे*
संदर्भ – खंड.19 पृष्ठ.358
उपरोक्त संदर्भानुसार जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी हिंदू जातीबद्दल एवढे समर्पक आणि मौलिकपणे लिखित स्वरूपात आपणास मार्गदर्शन केले असेल तर हे बेताल वक्तव्य करणारे राजकारणी लोक धर्मनिरपेक्षता ही संकल्पना असतानी *भारत हिंदु राष्ट्र बनवू या* कोणत्या आधारावर आपल्या बौद्ध समाजातील आणि इतर समाजातील लोकांना उपदेशून म्हणत असतील तर ह्याचा सदविवेक बुद्धीने जागृत होऊन चिंतन , मनन करणे गरजेचे आहे.
दि.11 मे 24
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत