महाराष्ट्रमुख्यपानवातावरणसामाजिक / सांस्कृतिक

अमरावती जिल्ह्यातील पाथरी या गावचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचा वाद…

शांततेत चाललेल्या आंदोलन स्थळी विरोधकांनी समोरासमोर येत घोषणाबाजी व दगडफेक करत वातावरण बिघडविले.

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचा वाद चिघळला असून 7 मार्चपासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंबेडकरी समुदायाचे शांततेत चालू असलेले ठिय्या आंदोलन सोमवारी विरोधी गटाने दगडफेक करून हिंसक बनवले आहे.

महापुरुषांच्या कमानीला विरोध करणारे व समर्थक असे दोन्ही गट समोरासमोर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि यामध्ये बरेच कार्यकर्ते तसेच काही पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे.

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या तसेच पाण्याचा मारा केला आज परिसरात शांतता असून सर्वांनी शांतता राखावी असे आवाहन अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे श्रद्येय बाळासाहेब आंबेडकर हे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जखमी कार्यकर्त्यांची विचारपूस करण्यासाठी तसेच परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी बाळासाहेब आंबेडकर सध्या अमरावतीच्या दौऱ्यावरती आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!