संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज लेख शृंखला- १२

गुरू रविदास जयंती निमित्त पुष्प 12 वे ….!
रविदास महाराज आपल्या या दोह्यात ‘सर्व सुखाय सर्व हिताय”चा संदेश देतात ..
मै रूखी सुखी खाऊं,औरन की भुख मिटाऊं!
कोई परे ना दुख की पासा, सब सुखी बसै रविदास!!
गुरू रविदास आपला उदर निर्वाह स्वकष्टार्जित धनाने करीत. आपल्या लोकांनाही सांगत कि,बंधूनो घरदार त्याग करून संन्यासी होऊन भिक्षा मागत भटकल्याने कोणाला राम मिळत नाही. “काम हाच राम आहे” . तो कष्ट करून करून घर चालवण्याने प्रसन्न होतो.बुवागिरी करत गावोगावी हिंडणारया आळशी,फुकट , ऐतखाऊ बूवाबाजीवर ते कठोर प्रहार करतात. तुमचे घर नेकीने चालवा . वृद्ध, अपंग,भुकेल्या गरजू लोकांना ही स्वकमाईतून जेऊ घाला.तुमच्याकडे साधी मीठ भाकर असू द्या पण ते कष्टाने कमवलेली असावी.” जगा आणि जगवा “…अश्या जगात सर्वाच्या सुखात मला सुख मिळते. गुरू रविदास व्यवसाय करताना आपला दाम सांगत नसत. जो जे देईल ते घेतअसत. भक्त भेटवस्तू त्यांच्या पाण्याच्या कुंडीत (कटौती) ठेवत असत. त्या कमाईतून ते काशीला येणारया जाणाऱ्या प्रवाश्यांना रोज मुक्त व मोफत जेवण घालत पाणी देत. पोटोबातल्या थकल्या भागल्या विठोबाला पळभर
विश्रांतीला जागा देत. ह्यालाच “लंगर ” असे म्हणतात. ह्या क्षुधा शांतीच्या चुलीची आग त्यांच्या हयातीत त्यानी कधीच विझू दिली नाही .अश्या सर्वांचे सुख पाहून सुखी होत असलेले गुरूजी म्हणतात…
कह रैदास खलास चमारा !
जो उस सहर सो मीत हमारा!!
अर्थात मी आता चर्मकार उरलो नाही.मी खलास झालो.या अश्या सुखी नगरीत माझा सख्याने ( रामाने) माझी सोबत केली…! किती पवित्र विचार आहेत.. हे.लंगर हा गुरू रविदासजीचा प्रसाद आहे.या काळात गुरूद्वारा, मंदिरामध्ये असलेला भंडारा आणि गाडगे महाराजानी दुष्काळात सुरू केलेले अन्नदान अन्नक्षेत्र हे त्या लंगराचे नवे रूप आहे…!!
जसे रविदासजींचे चांभारपण खलास झाले तसे तुम्हा आम्हां सर्वांचे ही शुद्रपण खलास होवो.ही रविदास चरणी प्रार्थना …!!
लेखक अँड. आनंद गवळी.
राष्ट्रीय उपाध्यक्ष,
राष्ट्रीय चर्मकार महासंघ
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत