महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणराजकीय

तर 2026 मध्ये हा देश कर्जात बुडालेला असेल.. -ॲड. प्रकाश आंबेडकर.

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या सभेमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जागावाटप, २०२४ ची निवडणूक, सध्याची राजकीय परिस्थिती यावर सविस्तर भाष्य केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या धोरणांवरून भाजपाला खडे बोल सुनावले.

प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका स्पष्ट करताना आपण धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे असून आता असेच सरकार येणार असल्याचं मतदारांनी ठरवल्याचं ते म्हणाले. आमचा कुठल्याही धर्माला विरोध नसला तरी धर्माच्या राजकारणाला मात्र विरोध आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. विद्यमान सरकारवर निशाणा साधताना प्रकाश आंबेडकरांनी, सध्या चांगल्या प्रशासनाची हमी देणाऱ्या या सरकारकडून मागील 10 वर्षांपासून रोजगारीची हमी दिली जात असली तरी बेरोजगारी वाढली आहे, असं म्हटलं. मनोज जरांगे पाटलांना आरक्षण देतो असं सांगून त्यांना निराश होऊनच परत जावं लागलं. हे सरकार फसवणुकीची हमी देतं, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला.

आर्थिक धोरणांवरुनही प्रकाश आंबेडकरांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. “मागील 10 वर्षांमध्ये मोदी सरकारच्या कारभारामुळे आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावरचं कर्ज वाढलं आहे. मोदी आणि आरएसएसला परत निवडून दिल्यास 2026 मध्ये हा देश कर्जात डुबलेला असेल. जगण्यासाठी दारुडा जसा भांडी, फर्निचर विकतो आणि मग शेवटी घर विकून रस्त्यावर येतो. भाजपाकडे सत्ता गेल्यास अशीच वेळ येऊ शकते,” असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी भाजपावर निशाणा साधला.

“मी खोटं बोलत असेल तर मला खोडून दाखवा असं माझं भाजपाला आव्हान आहे,” असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. “तुम्हाला कर्जात डुबायचं नसेल तर तुम्ही भाजपाविरोधात मत दिलं पाहिजे. मोदी सत्तेत येण्यापूर्वी देशातील प्रत्येकाच्या डोक्यावर 24 रुपयांचे कर्ज होते. मागील 10 वर्षाच्या कालावधीत दरडोई कर्जाचा आकडा 84 रुपयांवर पोहोचला आहे,” असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी आपल्या भाषणात केला.

प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदी हे गुजरात धार्जीण आहेत असं म्हणत टीका केली आहे. महाराष्ट्राबाहेर गेलेल्या उद्योगांचा संदर्भ देत त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य करताना मोदींचा एकेरी उल्लेख करत टीका केली. “मोदींकडून गुजरातच्या माणसांना एक आणि इतरांना वेगळी वागणूक दिली जाते. तुम्ही मोदींना पुन्हा सत्तेत आणल्यास पुढील 5 वर्षांमध्ये सर्वच कारखाने गुजरातला गेलेच म्हणून समजा,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. “तुम्हाला ही गोष्ट पचवणे कठीण आहे, याची मला कल्पना आहे. मात्र इथले कारखाने पळवले की नाही? तसेच उद्या ते पुन्हा पळवले जातील. मताच्या रुपाने तुम्ही मोदींना त्या गोष्टीचा परवानाच द्याल. म्हणूनच भाजपाला मतदान करु नका,” असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी समर्थकांना केलं.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!