महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंत रविदास महाराज

संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज लेख शृंखला- 10

गुरू रविदासजयंती निमित्त पुष्प १० वे…

संत रविदासाजीने मानवी जीवन कसे सफल होईल याबद्दल अतिशय मौल्यवान संदेश खालील दोह्यात दिलेले आहेत…

एक भरोसो राम को ,अरू भरोसौ सत्तकार !
सफल होइहू जीवना,रविदास विचार,!!

संत रविदासांचे तत्कालीन समाजातील धार्मिक
कर्मकांड,अंधविश्वास,आर्थिक,शोषण शैक्षणिक, विषमता
राजकिय ,सांस्कृतिक अन्याय अत्याचारग्रस्तांच्या दु:खमुक्तीचे ,परिवर्तनाचे जे मानवतादी ,विचार आहेत. ते विद्रोही विचार आहेत.ते रविदासी विचार जगातील कुठल्याही सहिष्णू विचारा पेक्षा श्रेष्ठ विचार आहेत.त्या विचाराने वागले तर जगांतील सर्वांचेच जीवन सफल होईल.यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. कारण स्वत: रविदासजीचा राम आणि सत्कर्मावर ठाम विश्वास आहे.गुरू रविदास संन्यास घेऊन वनात, गुहेत जाऊन, शरीराला तापव्याप देऊन , किंव्हा भिक्षा मागून निर्वाह करणारे पळपुटे गुरू नाहीत.ते उत्तम प्रपंच करून संकटा विरूद्ध लढणारे गूरू आहेत..

नेक कमाई जऊ करहि ,ग्रह तजि वन नही जाय!
रविदास हमारो राम ग्रह मंही मिलिहि आय!!

परमेश्वर प्राप्ती साठी हरिभक्तांना गृहप्रपंच,परित्याग करून जोगी फकीर होऊन,मसनात देवळात मंदिरात रहण्याची जरूरी नाही. तर कष्ट करून ईमानदारीने घरसंसार व्यवहार चालवत जीवन सफल करण्याची शिकवण गूरूजी देतात. श्रम हाच राम आहे.हाताने काम जिभेने नाम घ्यावे. तो राम स्वताच्या पायाने चालत तुमच्या घरी येईल.स्वताच्या सत्कर्मावर भरोसा ठेवा.
संसाररूपी सागर तरण्यास नामरूपी जहाज आधार आहे.नाम कुणीही कुठेही केंव्हाही कसेही घेऊ शकतो…! हे कर्म हेच धर्म आहे…कामाला लाजू नका. ..काम हेची पुजा आहे…साधना आहे …हीच ती सहज भक्ती आहे…. हाच तो कर्मयोग….! अशी कमाई वाया जात नाही.नष्ट होत नाही ..! नेक कमाई करणारा कधीच दु:खी होणार नाही तो नेहमी सुखीच राहील हा गुरू रविदासजीचा आशिर्वाद आहे. सत्य ,संतोष,आणि सदाचार हे जीवनाचे मुलाधार आहेत.भ्रष्टाचाराच्या कमाईचे परिणाम भोगणारया बेइमान धनिक,सत्ता मस्तवाल्यांनी किती ही सोने चांदी ,हिरे जवाहराती मंदिरातील मूर्तीला चढवले तरी असे दानी दूःखमुक्त होत नाहीत..

प्रानी वध नहि किजियही, जीवह ब्रम्ह समान!
रविदास पाप नंह छूटइ,करोर गउन करि दान!!

जगातील प्रत्येक जीव ब्रम्हसमान आहे.प्राणी वध करून मास खाऊ नये.हत्याचे पाप करोडो गायी दान देऊन फिटत नाही.हे विचाराने

पराधिनता पाप है,जान लेहू रे मीत!
रविदास दास प्राधीन सो, कौन करै है पीत !!

माणसाने आपला आचार विचार हा स्वतंत्र ठेवावा. कोणाचेही गुलाम होऊ नये .कुठल्याही पारतंत्र्यात राहू नये.हिनतेतून सुटका करून स्वाभिमानाच्या स्वाधीन असावे.दुसर्‍याच्या तंत्राने नाही आपल्या तत्राने चालावे. आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवावे. आपल्या पायावर स्वताचा डोलारा उभारावा त्याला पुरुषार्थ म्हणतात.

कटूक वचन नहि बोलिए, सब घट हरि कौ बास!
इहू ग्यानकौ दवार है कहै रविदास विचार!!

कोणालाही कटू बोलू नये.असत्य वागू नये .सर्वात हरिचा निवास आहे.हा विचार ज्ञान प्राप्तीचे द्वार आहे. जिभेने हरिचे सुनाम घ्यावे. सर्वांचे मनाने भले चिंतावे हेच ते सत्कर्म …!

दिन दूखी करि सेव महि,लागि रह्यौ रविदास!

दिन दुःखी लोकांची सेवा करण्याने देव भेटतो. त्या साठी बाहेर कुठे जाण्याची आवश्यकता नाही. घरच्या आजारी अपंग ,वृद्ध माता पित्यांची सेवा करावी.तीच गुरू सेवा इश सेवा आहे.भव बंधनाच्या मुक्तीचे द्वार आहे.इथे वरील काही थोडयाच दोह्याचे विश्लेषण विस्तार भयास्तव दिलेले आहेत. एका एका दोह्याचे विवेचन विस्तृतपणे केल्यास प्रत्येक दोह्यांचे मन्वंतर ग्रंथ निर्माण होतील.ते लिखाण इथे उचित नाही प्रत्येक दोहे हे विवेकसार आहेत…! रोज एक जरी दोहा अभ्यासला तर हमखास ज्ञानवृद्धी होईल.

जय रविदास…!

लेखक, अँड आनंद गवळी.
राष्ट्रीय उपाध्यक्ष,
राष्ट्रीय चर्मकार महासंघ

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!