राज्यातील 5 जिल्ह्यांत आज यलो अलर्ट

अग्नेय राजस्थान व लगतच्या पश्चिम मध्य प्रदेश भागावर चक्रीय वाऱ्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नैऋत्य अरबी समुद्रावरही एक चक्रीय परिस्थिती आहे. यामुळे पश्चिम व उत्तर भागातील आद्रता वाढली असल्यामुळे राज्यात अजून दोन ते तीन दिवस हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरु आहे. ज्यातील अनेक भागात आज देखील पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात आज दिवसभर विजांसह पावसाची शक्यता आहे. नाशिक, नगर, पुणे , छत्रपती संभाजीनगरसह बीड जिल्ह्याला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
हवामान खात्याने मराठवाड्याला यलो अलर्ट दिला आहे. जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जायकवाडी धरणाची पाणी पातळी पोहोचली 40 टक्क्यांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत जायकवाडीत संभाजीनगर आणि जालन्याला तीन महिने पुरेल इतके पाणी पोहोचले आहे. जायकवाडीत पाणी 26 हजार क्यूसेकने पाणी येत आहे. अवकाळी पावसामुळे देखील जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत होतेय वाढ. जळगावात २२ वर्षांत प्रथमच गारठा निर्माण झाला आहे. नोव्हेंबरात दिवसाचे तापमान २२ अंशावर आले आहे. भारतातील मान्सूनचा पॅटर्न बदलला असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत