नळदुर्ग येथील बोरी धरणावरील पाणी प्रश्न पेटला पाणी साठा कमी आसताना चक्क पाणी चोरी

प्रशासनाची धडाकेबाज कारवाई पाणी चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले
पाण्याचा काटकसरीने वापर करावा : – लक्ष्मण कुंभार
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
मानवाच्या जीवनामध्ये पाणी हे अनमोल निसर्गाची देण आहे प्रत्येक क्षेत्रासाठी पाणी खूप महत्त्वाचा घटक असल्याने पाणी काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज ओळखून पाण्या साठी प्रत्येक मानवाने प्रबोधन करण्याची गरज आहे
परंतु नळदुर्ग येथील बोरी धरणावरती काही असंतुष्ठ नागरिक चक्क मोटार लावुन शेताला द्यायचे दिसून आल्याने संबधीत विभागाला गोपनिय माहिती मिळताच नळदुर्ग येथील मंडल अधिकारी जयंत गायकवाड तलाठी विश्वास वायचाळ पाटबंधारे विभागाचे कर्मचारी एन एम पवार , एम एन गायकवाड , महावितरणचे कर्मचारी महेश जाधव , व दत्तात्रय सर्जे यांनी बोरीधरणा वर जाऊन अचानक धाड घालून त्या पाणी चोरणाऱ्या नागरीकाची मोटर जप्त केली असून संबंधितावर कारवाई करण्यात आली आहे .
तुळजापूर तालुक्याला पाणी प्रश्न भेडसावत असताना पाण्यावर डल्ला मारणाऱ्याचे धाबे मात्र दणाणले आहेत पाणी हे एक नैसर्गिक संसाधन आहे पाणी मानवाच्या जीवनातील खुप महत्वाचा मुलभूत घटक आहे , सजीव प्राण्याचे मानवाचे अस्तित्व जीवन हे पाण्यावर अवलंबून आहे . काही असंतुष्ट माणसे पाणी जपून वापरत नसल्याने आशा मानसावर सुद्धा नगर प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला पाहिजे पाणी काटकसरीने वापरण्याची आजच्या काळाची गरज आहे आणि प्रत्येकांची जबाबदारी सुद्धा आहे .
बोरी धरणातील पाणीसाठा केवळ ६% असून या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होऊ नये यासाठी प्रत्येक मानवाने प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा , पाणी वाया घालवू नये , प्रत्येकाने आपल्या नळाला तोटी बसवून घ्यावी आणि पाण्याचा संभाळ करावा आसे प्रतिपादन नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार व मंडल अधिकारी जयंत गायकवाड यांनी व्यक्त केले आहे
यांची सर्व जबाबदारी पाठबंधारे विभागाची आसुन पण या गोष्टीकडे पाटबंधारे विभागाची डोळेझाक होत आहे .संबंधित विभागाने पाणी प्रश्नाकडे काना डोळा न करता असे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून पाणी चोरणाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे जीवनाचा सर्वात अत्यावश्यक प्रश्न पाणी मानला जातो यासाठी पाण्याला खूप महत्त्व आहे आणि आजच्या काळाची गरज ही आहे केवळ बोरिधरणामध्ये ६% पाणीसाठा असल्याने हे पाहण्यासाठी पुढील दोन-तीन महिने जाणे गरजेचे आहे तर संबंधित अधिकाऱ्याने पाटबंधारे महावितरण आणि नगरपालिका आणि महसूल प्रशासनाने या सर्व बाबी लक्षात घेऊन बोरी धरणाच्या पाण्यावरती लक्ष ठेवून पाणी कोण चोरत असेल तर पाणी चोरी करणाऱ्या शेतकऱ्यावर नागरिकावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे .
बोरी धरणावर पकडलेले मोटर हे संबंधित पाटबंधारे विभागाच्या ताब्यात दिले असून आता पाटबंधारे विभाग या नागरिकांवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत