रोम जळत होते,निरो व्हायोलीन वाजवत होता.

शिवराम पाटील
जामनेरला शेतकरी रडत होते, महाजन जळगावला नाचत होते.१९फेब्रुवारी २०२४.
दिल्ली मिझोराम, महाराष्ट्र जळत होता .मोदी अरबी समुद्रात खुबा खेळत होते.२७फेब्रुवारी २०२४. इतिहासाची पुनरावृत्ती होते.झाली.एक आधी झाली युरोपमधे.आता आमच्या समोर झाली जळगाव मधे.याला कारण एक व्यक्ती नाही.याला कारण आहे,सत्ता.चांगला माणूस दिर्घकाळ सत्तेवर असला तर त्याला जनतेप्रती आस्था उरत नाही.तो दिर्घकाळ विनासायास किंवा वारसा हक्काने सत्तेवर असला तर त्याचा गैरसमज होतो.मी यासाठीच जन्माला आलो आहे.आणि जनता त्यासाठीच जन्माला येते.खाते पिते रडते आणि मरते.काय फरक पडतो?आणि आपण मस्त नाच गाणे करायचे. राजाची,सुलतानाची,पेशवाची औलाद आपोआप सत्तेवर येत होती.दोन तीन पिढ्या नंतर ती एकतर ख्याली , बदफैली बनली किंवा निकृष्ट निघाली.म्हणून कोणत्याही घराण्याची सत्ता कधीच कायम टिकली नाही.म्हणून आपण लोकशाही राज्यपद्धती अवलंबली.राजपुत्र बिघडेल, मौजमस्ती करील,जुलूम अत्याचार करील.मग आपण किंवा कोणीतरी त्याला सत्तेवरून डच्चू देऊ.इतका संयम आता राहिला नाही.आता हा दोष घालवण्यासाठी लोकशाही राज्य पद्धतीमधे दर पांच वर्षांनी राजपुत्र मागे पुढे सरकवता येतो.उद्देश खूप चांगला आहे.नियमित पांच वर्षात सत्तांतर घडवून आणणे.
जामनेर तालुक्यातील शेतकरी भुमिअभिलेख कार्यालयात हेरझारा घालत आहेत.अर्ज फाटे करूनही लांच देत आहेत.लांच देणे,घेणे आता लज्जास्पद राहिले नाही.ते लाजिरवाणे झाले आहे.म्हणून मी जामनेर भुमिअभिलेख कार्यालयात चक्क म्हणालो,अरे आम्ही शेत मोजणीची फी भरली आहे.वरून पंधरा हजार जास्त दिले आहेत.जर आमचे माळपिंप्री चे शेत मोजून दिले तर आणखी पांच हजार लांच देणार आहोत.हो!लांच.बोललो.त्या कार्यालयातील सीसीटीव्ही कैमेरासमोर.सहा कर्मचारी, पांच शेतकरी आणि एक कैमेरामन पत्रकार समोर असतांना. कोणी पुढारी, आमदार, खासदार, मंत्री,आधिकारी, पोलिस, वकिल, न्यायाधीश मधे साहस धाडस असेल तर दखल तर घेतलीच पाहिजे.कोणता कायदा लांच मागण्यास उद्युक्त करतो.कोणता कायदा लांच देण्यास मजबूर करतो.तो कायदा जाणण्याची बुद्धी तर असली पाहिजे.तो कायदा लावण्याचे नैतिक बळ तर असले पाहिजे.मी लांच देण्याचे जाहीर केले.जर मीच म्हणतो तर सिद्ध करण्याचे कष्ट पडणार नाहीत तुम्हाला.पण तुम्हाला लाज वाटली पाहिजे कि,एक शेतकरी आपले शेत मोजणी करण्यासाठी लांच देतो,लांच कबूल करतो.हे पाप किती काळ लपवणार आहात? जर कुंटणखाना चालवत आहात तर संस्कृती विकृती चा विचार कसा करणार?लांच घेऊन देऊन काम करीत असाल शासन कसे चालवणार? तरीही शिंदे जळगाव ला येऊन बोलून गेले, शासन आपल्या दारी.कोणाला खरे वाटते का?
शिंदे,फडणवीस, पवार,ठाकरे, मोदी, शाहा आपण या देशाची ही अवस्था करून ठेवली आहे.कि,लांच दिल्याशिवाय तुमचे सरकारी नोकर काम करीत नाहीत.लांच दिली तरीही काम करीत नाहीत.आणि अबकी बार चारशे पार च्या वल्गना करीत आहात.तुम्हाला नसेल वाटत तर आम्ही जनतेला, आम्ही मतदारांना लाज वाटते या सरकारी नोकरांची आणि तुमची सुद्धा! तरीही आम्ही तुमच्या भुलथापांना बळी पडून तुम्हाला पुन्हा निवडून द्यायचे का?
रोज उठसूठ मोदी टिव्हीवर येतात.म्हणतात,ये मोदीकी गॅरंटी है.कशाची गॅरंटी?पुर्ण शासन प्रशासन नासवून टाकण्याची? यासाठी आम्ही मोदीवर विश्वास ठेवायचा का? आमचीच मते घेऊन सत्तेवर येणे आणि आमच्याच नरडीवर पाय ठेवून म्हणणे,ये मोदीकी गॅरंटी है.
आतापर्यंत जे घडले,घडवले ते पाहून आम्हाला मोदींची गॅरंटी झालेली आहे.हे पुन्हा सत्तेवर आले तर काय करू शकतात? दिल्ली, मिझोराम, महाराष्ट्र मधे आग लागली आहे आणि हे मोदी साहेब अरबी समुद्रात खुबा खेळत आहेत.आता खरे पटले,रोम जळत होता आणि निरो व्हायोलिन वाजत होता.मिझोराम जळत होता आणि मोदी खुबा खेळत होते.शेतकरी जामनेर ला रडत होते आणि महाजन जळगाव ला नाचत होते.
…. शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत