कसबे तडवळ्यात पुढील महार मांग वतनदार परिषदेला श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा साजरा करू.. ! – आमदार कैलास पाटिल


उस्मानाबाद : दि 22 फेब्रुवारी 2024, उस्मानाबाद तालुक्यातील मौजे कसबे तडवळा येथे संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक अशी महार मांग वतनदार परिषद घेण्याच्या ऐतिहासिक क्षणाला आज 83 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे आज दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी दरवर्षीप्रमाणे यंदाही कसबे तडवळा येथे फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने महार मांग वतनदार परिषदेच्या 83 व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने 22 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी भव्य अशा शोभा मिरवणुक, “सत्य” विचार संग्रह भाग 1 पेटलेली चिता या पुस्तकाचे प्रकाशन, समाज रत्न पुरस्कार वितरण अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील आणि संस्थेचे अध्यक्ष जयशील अच्युत भालेराव, संजय पाटील दुधगावकर, उद्योजक देवदत्त मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक विजयकुमार गायकवाड, प्राचार्य सुरज ननवारे, सामाजिक कार्यकर्ते कानिफनाथ देवकुळे, विशाल जमाले, भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष विजयमाला धावारे कोषाध्यक्ष राजश्री कदम, लेखक विजय अशोक बनसोडे, गणेश करंजकर, राजाभाऊ लोंढे, गणेश जमाले, संग्राम देशमुख,
यांची मंचकावर प्रमुख उपस्थिती होती.
महार मांग वतनदार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वे स्टेशन कसबे तडवळा ते वैशाली बुद्ध विहारा पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्कामी असलेल्या जि.प.शाळेमध्ये सामूहिक अभिवादन करण्यात येऊन भव्य शोभायात्रा वैशाली बुद्ध विहार भिमनगर येथे विसर्जित करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आले.
या प्रसंगी विजय अशोक बनसोडे लिखित,”सत्य” विचार संग्रह भाग – 01 पेटलेली चिता या प्रबोधन ग्रंथाचे प्रकाशन आमदार कैलास पाटील, चंद्रकांत शिंदे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी झुंज वादळाशी या ग्रंथाच्या लेखिका आशादेवी मुरलीधर लष्करे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी चंद्रकांत शिंदे, संजय पाटील दुधगावकर, कानिफनाथ देवकुळे, दिलीप करंजकर, विजयमाला ताई धावारे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बी.डी शिंदे, तानाजी जमाले, भीमआर्मीचे अशोक कसबे यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन आपली मनोगते व्यक्त केली. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना आमदार पाटील म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणीसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे त्याचबरोबर भारतीय संविधान आणि भारतीय लोकशाहीची पायमल्ली करून बहुजन समाजाला पुन्हा एकदा गुलाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी आपण एकजुटीने काम करणं गरजेचे आहे. तसेच पुढील महार मांग वतनदार परिषदला आपण श्रद्धेय. प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा साजरा करू असे प्रतिपादन केले.
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अध्यक्षीय समारोप करताना जयशील भालेराव म्हणाले की, आपण सर्वजण गावकरी म्हणून आपल्या गावाला जागतिक दर्जाची ओळख निर्माण व्हावी, त्याच बरोबर गावचा महसूल वाढावा, गावची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक लवकरात लवकर उभारावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक तथा लेखक विजय अशोक बनसोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार चंदु भालेराव यांनी मानले.
तसेच वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष संभाजी कांबळे, ता.संस्कार सचिव आदिनाथ सरवदे, किरण युवा मंचचे किरण कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका संघटक राजाराम बनसोडे, बापू जावळे, बाबासाहेब कांबळे, भारतीय भारतीय बौद्ध महासभा पर्यटन प्रमुख विश्वास भाऊ पांडागळे, जिल्हा हिशोब तपासणी देवीदास कदम, मातंग समन्वय समितीचे युवराज पौळ, आळणी ग्रामपंचायत सदस्य अक्षय कदम, दलित पॅंथर चे जिल्हाध्यक्ष मिलिंद गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव बाळासाहेब भोरे, खरात गटाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ माने, कल्याणभाऊ माने, पत्रकार श्रीकांत मटकीवाले यांची प्रमुख उपस्थिती होती. तर या महार मांग वतनदार परिषदेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास चंदू भालेराव, बाबासाहेब भालेराव, प्रसेनजीत सोनवणे, वामन सोनवणे, संताजी निकाळजे, युवराज भालेराव, सुधाकर निकाळजे, ईश्वर निकाळजे, विलास भालेराव, रोहिदास भालेराव, अच्युत भालेराव, अनिल भालेराव, बाळासाहेब सोनवणे, जगन्नाथ भालेराव, धनंजय भालेराव, सोमनाथ गायकवाड,मुकेश मोठे, बाबासाहेब कांबळे, संदीप अंकुश, समाधान सरवदे, राजाभाऊ गायकवाड कळंब यांच्यासह फुले शाहू आंबेडकर सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि वैशाली बुद्ध विहाराचे सर्व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत
जय भीम ????????
कसबे तडवळे येथे झालेली महार मांग वतनदार परिषद ही आंबेडकरी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे.
परंतु स्थानिक मतभेद, शाळा पुनर्वसन, प्रशासकीय दिरंगाई यामुळे या महत्त्वाच्या कामाला उशीर होत आहे.
या कामी प्रामाणिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे समाजाने उभे राहण्याची गरज आहे.
अगदी बरोबर. सर्व समाजाने आपापल्या परीने शक्य ते प्रयत्न करणे गरजेचे आहे. कांहीं नाहीं तर किमान अडथळा तरी आणू नये. ????