कमंडल विरुद्ध मंडल ने च रचला ब्राह्मणवाद विरोधी इतिहास:जागे झाले ओबीसी आणि हादरले मनुवादी

लेखकः डॉ लता प्रतिभा मधुकर
अध्यक्ष, ओबीसी राजकीय महिला आघाडी.
मंडल आयोगाने 1990 मध्ये पहिल्यांदा देशातील ओबीसी जातींचा एक सर्वेक्षण आधारित आकडा जाहीर केला. ओबीसी म्हणजे एकूण 3743 जाती. महाराष्ट्रात त्यातील 348 जाती. यात भटके विमुक्त आणि ट्रान्स जेंडेर यांचा समावेश. ओबीसी म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 69 टक्के. तामिळनाडू सरकारने तेथे जाती आधारित जनगणना करून 69 टक्के आरक्षण दिले.
आता एकीकडे आपल्याला अख्खा भारत बौद्धमय करायचा आहे. 69 टक्के लोक कसे होणार बौद्ध? त्यांच्यावर टीका करून की त्यांच्यापर्यंत पोचून?
जर त्यांच्यासाठी भारत बौद्धमय करणाऱ्यांचे कार्य कमी पडत असेल तर सर्व हिंदुत्व वाद विरोधी फुले , शाहू , पेरियार, नारायण गुरू, आय्यंकाली, आंबेडकर यांचे विचार पेरावे लागतील. मंडल आयोगामध्ये या महानायकांचा अतिशय आदरपूर्वक उल्लेख आयोगाचे अध्यक्ष बी. पी. मंडल करतात.आता प्रश्न असा आहे की शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव होऊ नये म्हणून ब्राह्मण वादी लोकांनी ज्या युक्त्या केल्या त्यात त्यांना धार्मिक रीती रिवाजात च नाही तर अशा बेड्या पायात टाकल्या की त्यांचे अस्तित्व येथील देवी देवतांशी जोडले.
उदा. आज एस सी प्रवर्गात येणारा वाल्मिकी समाज.
वाल्मिकी समाज आज ही स्वतः ला वाल्मिकी च म्हणतात. त्यांना जय श्रीराम म्हणणे हे त्यांचे धार्मिक कर्तव्य आणि निष्ठा वाटते.
आज ही त्यांची manual scavenging पासून सुटका नाही. त्यांना आज ही हे काम करावे लागत आहे. त्यांना हळूहळू पटत आहे. ते आपल्या पोटासाठी पारंपरिक कामे करत आहेत. पण ते सर्व अजून बौद्ध झाले नाहीत. याचा अर्थ ते बदलू बघत नाहीत असा लावता येईल का,? सर्व एस सी जाती ज्या संख्येने ओबीसी पेक्षा खूपच कमी आहेत त्या सुद्धा अजून बुद्धमय झाल्या नाहीत म्हणून आपण सरसकट (एक जात सोडली तर )सर्वच एस सी हे राम मंदिराच्या वारी ला गेलेत असे सरसकट विधान करणे बरोबर आहे का?
मंडल ही कमंडलू ला शह देणारी 1990 मधली सर्वात मोठी घटना आहे. त्यानंतर या देशात ओबीसी चळवळीने ब्राह्मण वाद आणि आरेसेस च्या राजकारणाला आव्हान उभे केले. या देशात शरद यादव, मुलायम सिंह यादव , लालू यादव, कर्पुरी ठाकूर पासून ते झोया हसन, अली अन्वर, इत्यादी पासून आता अगदी लक्ष्मण यादव, संदीप यादव, अमित यादव, नवलकिशोर, या सारख्या ओबीसी चळवळीने अतिशय मोठी मजल मारली आहे. महाराष्ट्रात 1990 पासून जनार्दन पाटील, जगन्नाथ कोठेकर, कृष्णकांत कुदळे, बाबा आढाव, शरद पाटील, भारत पाटणकर, इंदूताई पाटणकर, हनुमंत उपरे, शब्बीर अन्सारी, फकृद्दिन बेन्नुर, जावेद पाशा,विलास सोनवणे, धनाजी गुरव, इब्राहिम भाई (शोधन), नागेश चौधरी, श्रावण देवरे, कपिल पाटील, प्रदीप ढोबळे, प्रवीण देशमुख, नितीन चौधरी, बबन तायवाडे, भारत पाटणकर, ज्ञानेश्वर गोबरे, विलास काळे , राजाराम पाटील, धनराज वंजारी,प्रभाकर गायकवाड, संजय गायकवाड, हरी नरके, संजय सोनवणी, अशोक चोपडे, बालक इत्यादी अनेक नावं मला तुम्हाला सांगता येतील. तरुण मुलांमध्ये, राम वाडीभस्मे, संतोष आंबेकर, यशवंत झगडे, संदीप देवरे इत्यादी प्रातिनिधिक नावे आवर्जून सांगता येतील, जे चळवळीत झोकून देऊन काम करत आहेत. ओबीसी चळवळीत मंडल आयोग आल्यावर सातत्याने कार्य करणाऱ्या काही स्त्रियांची नावे मी येथे देत आहे.
सुशीला मोराळे, झेबुंनिसा शेख, तैमूर बानो मुल्ला, ऐन्युल अत्तार, कुमुद पावडे, नलिनी सोमकुंवर, सीमा साखरे, प्रतिमा परदेशी, लता प्रतिभा मधुकर, संध्या नरे पवार, वंदना महाजन, नूतन माळवी, सुनीता काळे, अरुणा सबाने, माया गोबरे, प्रतिभा शिंदे, सुषमा भड, समीक्षा गणेशे, शरयू तायवाडे, वंदना वानकर, संध्या सराटकर, संध्या राजूरकर, पल्लवी रेणके, वैशाली भांडवलकर, दीपा पवार, अशा तडफदार नेतृत्वाने ओबीसी चळवळीची धुरा सांभाळली आहे. त्यांनी आपल्या कृतीतून, संघर्षातून आणि वेळोवेळी भूमिका घेऊन प्रबोधन पर कार्य करत दाखवून दिले आहे. जर ही मंडलोत्तर काळातील ही जी नावं मी इथे टाकली आहेत, त्यातील अनेक जण आज जिवंत नाहीत.
पण ओबीसी चळवळीने आज एक वेगळे वळण घेतले आहे. ती ओबीसी जात जनगणना मुख्य मुद्दा करत हिंदुत्व वादी, ब्रह्मन वादी धर्मांध लोकांना आव्हान करत फुले आंबेडकरी विचारधारा रूजवत पुढे जात आहे. खरे तर लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की ही सर्व माणसं आज बौद्ध धम्म वाटेवर ओबीसी समाज यावा आणि त्यांचे पारंपरिक कौशल्य यशस्वी उद्योजक म्हणून आज च्या अर्थव्यवस्थेत फोर्ड, बाटा,टाटा, महिंद्र, अशा कंपन्यांच्या तोडी चे उद्योग उभे करून मंदिरा भोवतीची अर्थव्यवस्था तोडून नवी स्वप्न पेरत आहेत.
ओबीसी ची आज ची लढाई ख्रिस्तोफी जॅफ्रेलोट म्हणतो तशी आज पुन्हा मोठ्या प्रमाणावर होत असलेली silent revolution आहे. मी त्यात आघाडीवर ची कार्यकर्ता, संशोधक, अभ्यासक आणि नेतृत्वापैकी एक आहे. मी अपवाद नाही. मी या चळवळीतील एक प्रतिनिधी आहे. म्हणून उठ सूट आता ओबीसी बरा मिळतो जोडे मारायला, म्हणून कृपया ओबीसी ना जोडे मारले तर अख्खा भारत बौद्धमय करेन ही एवढी मोठी जबाबदारी बाबासाहेब सोपवून गेलेत त्याचे भान ठेवा. आणि ओबीसी चळवळीची संभावना करण्यापेक्षा लगेच धर्मांध शक्ती पासून , भाजपा पासून आपल्याला देश वाचवायचा असेल तर ओबीसी चळवळीतील सर्वांचे फुले आंबेडकरी विचारधारेतील मैत्र म्हणून स्वीकार करावा, असे आवाहन करते.
© डॉ लता प्रतिभा मधुकर
अध्यक्ष, ओबीसी राजकीय आघाडी अंतर्गत “ओबीसी महिला राजकीय आघाडी”
संपर्कः 99223 20338
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत