महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

बौद्धानी गनिमीकाव्याने युद्धनीती राबवावी


बौद्धानी गनिमीकाव्याने युद्धनीती राबवावी.अन्यथा ते मारले जातील,कापले जातील, जाळले जातील. भले तुम्ही स्वीकारलेला मार्ग सम्यक सत्याचा आहे. तुम्ही जोरजोरात भाषणे करून ज्या समाजाला जागृत करण्यासाठी जीवाचे रान करता, तोच समाज ब्राह्मणी व्यवस्थेचा मिंदे झालेला आहे. आज ब्राह्मणी व्यवस्थेसमोर सर्वजण हतबल झालेले आहे

अशा अवस्थेत तुम्ही ब्राह्मणी व्यवस्थेला तोडू शकत नाही. म्हणून बौद्ध लोकांनी मारामारीवर उतरू नये. हिंदु विषयी मनात राग ठेवून त्यांच्या देवी देवातांची आई बहीण काढू नये. शिव्या-गाळी करण्यापेक्षा मैत्री करावी. सर्वांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे. संविधानवादी होऊन, संविधानाचे सैनिक होऊन सर्वसमावेशक भूमिका जर घेतली तर सामाजिक क्रांती होईल ? विचार करा.

तुम्ही स्वतःचे बघायला हवे , हिंदुना सुधारण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा या देशात संविधानाने दिलेल्या हक्क अधिकाराचा फायदा घ्या आणि पुढे जा. बौद्ध वस्ती उभ्या करा. ज्या ज्या गावात जातीयवादी लोक तुम्हाला त्रास देतात. ते गाव सोडून द्या. विकून टाका आणि जिथे सुरक्षित वाटत असेल अशा बौद्ध वस्तीत स्थिर स्थावर व्हा.

मी या देशातील सर्वसामान्य लोकांना एक माणुसकीचा धर्म दिला आहे. ( ज्यांना धर्म नाही अशाना ) आणि एकसंघ भारतीयत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व टिकविण्यासाठी संविधानवादी चळवळ दिलेली आहे. संविधानाचे सैनिक घरा-घरात निर्माण कारण्याचे कार्य आम्ही सारे करीत आहोत.

मित्रांनो ह्या ब्राह्मणवादी वर्चस्ववादी मानसिकतेला बरोबर ठाऊक आहे की नेमके बौद्ध आता कोणती रणनीती अंगीकारणार आहेत? आणि त्याचा पाडाव कसा करायचा? त्यामुळे बौद्ध तरुणानी गैरसमज करून घेऊ नये की ते सर्वश्रेष्ठ झालेले आहेत. त्यांना कोणी टारगेट करीत नाही आहे ?

मित्रांनो तुम्हाला नष्ट करण्यासाठी अगदी 25-30 वर्षापासून पूर्णतः षडयंत्र सुरू आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमचे व्यवसाय जाळले जातील, तुम्हाला कामावरून काढले जाईल, प्रावेट नोकऱ्यांमधून तुम्हाला काहीतरी कारण सांगून काढून टाकले जाईल आणि काहीतरी उचापती उकरून तुम्हाला जेलची हवा सुद्धा खावी लागणार आहे. जे जे बौद्ध समाज डॉक्टर आहेत. वकिल आहेत. इंजिनियर आहेत. मोठे मोठे उद्योजक आहेत. त्यांनी समजून जा की तुमचे आयुष्य फक्त पाच वर्षाचे आहे.

या पाच वर्षांमध्ये जर तुम्ही संविधानवादी चळवळ राबवली नाही. घराघरांमध्ये संविधानाचे सैनिक तयार केले नाहीत. एससी एसटी ओबीसी मध्ये जाऊन जागृती करून त्यांना संविधानवादी सैनिक तयार करीत नाही. तो पर्यंत तुमचं जीवन सुरक्षित राहणार नाही .

ब्राह्मणी वर्चस्ववादी मानसिकतेने आपल्याच समाजातील शूद्र भावंडांना म्हणजेच एससी एसटी ओबीसी कुणबी मराठ्यांना आपापसामध्ये लढवायला भाग पाडले आहे. दोन हजार वर्षापासून ब्राह्मणी व्यवस्थेने आम्हा बहुजनांना मानसिक गुलाम करून स्वतःचे आणि स्वतःच्या समाजाचे भले करून घेतले आहे.

तुम्ही एकत्र या. ठीक ठिकाणच्या आपल्याच मराठा भावांना एकत्र करा. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण भावना ठेवा. त्यांच्या आई बहिणींचा देव देवतांना वाईट लेखू नका. त्यांच्याशी वाद घालू नका. दुश्मनी करू नका. वैयक्तिक वैमनस्यांमध्ये समाजाला गुंतवू नका. रागाने उगीचच ऍकट्रॉसिटी लावू नका.

त्यांना माहिती आहे की बौद्ध लोक लगेच रिऍक्ट होतात. ते तुम्हाला मुद्दाम भडकवतील. तुमच्या नावाचे खोटे अक्काऊंट ओपन करून त्यांच्या देवी-देवतांच्या अपमान कारक पोस्ट टाकतील. त्याचा खामीयाजा उगीचच सर्व गरीब बौद्ध समाजाला भोगावा लागेल म्हणून सोशल मेडीयावर लक्ष ठेवा, कुठे काय चाललंय ? लक्ष ठेवा. तुमचा कोणी द्वेष करतील,असे वागू नका. बोलू नका.

स्वतःच्या विकासाची चिंता करा. समाज कसा पुढे जाईल? ते पहा.बौद्धानी गनिमीकाव्याने युद्धनीती राबवावी आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून देशावर राज्य करावे.

राजकारण आणि धर्मकारण समजून घ्या. या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध आहेत. आपण अल्पसंख्यांक देखील आहोत. म्हणून बहुसंख्याक लोकांना सोबत घेऊनच राजकारण करावे लागेल. तुमचा धर्म घरापूरता मर्यादीत ठेवा आणि राजकारण करायला शिका. अनाठायी आपण कापले जाऊ नये, मारले जाऊ नये याची काळजी घेऊया… एवढंच!

जय संविधान

लेखक : संविधान सैनिक

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!