महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

वर्तमानातील दुःखदायक गोष्ट

 तुम्ही तुमच्या परंपरागत श्रद्धा व भक्तीचे खूप प्रदर्शन करा, अद्भुत, चमत्कारिक कल्पनाविलासात रममाण होत रहा. असे भारतीय जनतेला सांगण्याची गरजच नाही. कारण भारतीय जनता कुणीही न सांगता हे सारे करतेच.

    तुम्ही बुद्धिवादी, विज्ञानवादी, सत्यनिष्ठ, वस्तुनिष्ठ व चिकित्सक बना असे भारतीय जनतेला वारंवार सांगण्याची गरज आहे. या गोष्टी सांगण्याचे काम वर्तमान सरकार करताना दिसत नाही. पण अद्भुत, चमत्कारिक कल्पनाविलासात, आंधळ्या भक्तीभावात रममाण होण्यासाठी मात्र फार मोठे प्रोत्साहन देत आहे.

 अशा प्रोत्साहनामुळे गरीब बिचारी जनता धर्म, श्रद्धा इत्यादी नशेच्या धुंदीचा आनंद उपभोगत राहते. धनिक, भांडवलदारांकडून होणारे तिचे शोषण तिच्या लक्षातच येत नाही. ते येऊच नये यासाठी तर हे षडयंत्र असते. दारिद्र्य, बेकारी, सर्वांसाठी उत्तम आरोग्य सुविधा, महागाई, सर्वांसाठी सकस शिक्षण हे प्रश्न धर्म धुंदीमुळे आज अडगळीत पडले आहेत. तुम्ही तुमच्या वास्तव जीवनातल्या प्रश्नावर चर्चा करा, ते प्रश्न सोडवण्यासाठी शासनकर्त्यांकडे आग्रह धरा असे म्हणणाऱ्यांना आजचे धर्मधुंद लोक मूर्ख व आपला विरोधक ठरवतात, ही वर्तमानातील दुःखदायक गोष्ट आहे.

डॉ.अनंत दा. राऊत

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!