बाबासाहेबांना घडविणारे रामजीबाबां सारखे आपण झाले पाहिजे….यश भालेराव
हे वरील वाक्यच ईतके मोठे आहे की,आधी प्रत्येक जन म्हणणारच कि काय वेडा आहे..
बाबासाहेब व्हायचे …. किंवा बाबासाहेबांना घडवणारे रामजी बाबा झाले पाहिजे म्हणजे,…
( काय काही पण बोलतोय )
पण….पण
बाबासाहेब जर आज असते तर…
बाबासाहेबांना पण नक्की असे वाटले असते…
मी बाप असवा तर माझ्या बाबासारखा …
माझ्या रामजीबाबा सारखाच
आणि बाबासाहेबांनी पण आताच्या लेकरांच्या बापाला नक्कीच म्हटले असते..
माझ्या रामजीबाबा सारखा आचार विचार आणि कृती कर..
अर्थात रामजीबाबा हो..
पण आमची पहिलीच मानसिक तयारी नसते…
कि
बाबासाहेबांसारखा कोणी होऊच शकत नाही…
रामजीबाबा सारखा कोणी होऊच शकत नाही..
आणि मग सुरवात जर अशी असेल तर
बाबासाहेबांचे किंवा रामजीबाबांचे गुण तरी घेणार कसे. त्यांचे गुण आत्मसात करणार कसे.
(बाबासाहेब म्हटले असते का,. मी जसे समाजासाठी केले तसे कोणीच करु नये म्हणुन .)
पण आपणच आपल्याला बाबासाहेबांच्या विचारापासुन दुर जात असतो… असो
लहान असताना बाबासाहेबांची आईंचे निधन झाले,.
बाबासाहेबांना वाढविणे..
बाबासाहेबांवर अधिक चांगल्या प्रकारे संस्कार करणे. बाबासाहेबांनी त्यांच्या आयूष्यात जे काही शिक्षण घेतले..
ज्या पध्दतीने बाबासाहेबांची विचारधारा बनत गेली आणि बाबासाहेबांनी पुढील आयुष्यात समाजातील नागरिकांसाठी , देशासाठी जे काही केले ते रामजीबाबांचे संस्कार आणि वैचारिक जडणघडण योग्य पध्दतीने केल्यामुळे
आईविना लेकरु….घडविणे खरच खुप अवघड असते..
पण
रामजीबाबा होणे म्हणजे खुप मोठे काही आहे का ?
आजच आपल्यातील पालक आणि (मुले )
आपण खुप छान पध्दतीने बाबासाहेबांची किंवा माता रमाई किंवा महात्मा फुले किंवा रामजी बाबांचे उदाहरण देतो..पण त्यांच्या त्या कृतीतुन आपण काय शिकतो… आपण काय शिकणार हे महत्वाचे आहे.
आपण त्यांच्या ” त्या ” कृतीतुन काय शिकलो.किंवा काय शिकले पाहिजे ?
1) बाबासाहेबांची परिस्थीती नसताना ही बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतले.
2) लग्नानंतर ही बाबासाहेबांवर ज्या जबाबदारया होत्या त्या जबाबदारया असुन ही बाबासाहेबांनी शिक्षणात यशस्वीपणे पुर्ण केलेच
3) बाबासाहेबांना जर लहानपणी कधी रामजीबाबांनी पैसे दिले तर बाबासाहेब त्यांचे पुस्तके घेत
4) घर लहान असताना ही बाबासाहेब अभ्यास करत असताना रामजीबाबा जागे असत.
5) बाबासाहेबांना लहानपणापासुन वाचणाची आवड निर्माण करणारे रामजीबाबा
6) माता रमाईच्या जाऊ बाईं ( लक्ष्मी ) यांचे पती म्हणजेच बाबासाहेबांच्या भावाचे निधन झाले असताना ही माता रमाई आणि लक्ष्मी बाई या चांगल्या पध्दतीने राहिल्या..
7) धारवाड ला माता रमाई गेल्या असताना तेथील आश्रम शाळेतील मुलांना जेवणासाठी काही नसताना माता रमाई यांनी आपले मंगळसुत्र देऊन त्यांनी मुलांना जेवण आधी मग,..
8) महाड चवदार तळे सत्याग्रह केला एकाच वेळी सवर्णांचा विरोध आणि आंदोलनाची कायदेशीर मान्यता..
एकाच वेळी एक संकटाचा सामना.त्यामुळे आंदोलन यशस्वी झाले
(नाहीतर नामविस्ताराचे आंदोलनात नामविस्तार आणि त्यासाठी 240 भिमसैनिकाचा जीव 925 महिलांवर बलात्कार आणि 3400 घरे जाळली त्यानंतर नामविस्तार हे अंदोलन यशस्वी म्हणता येईल का ? )*
9) एक राजकीय .. बाबासाहेबांनी त्या वेळी काँग्रेस बरोबर सत्तेत सहभागी झाले होते..म्हणुन काँग्रेस च्या चिन्हावर लढले का ? किंवा आपला राजकीय पक्ष काँग्रेस मध्ये सामील केला का ?( आणि आज काल चे आपले नेते
बाबासाहेब विदेशात शिक्षण घेत आसताना बाबासाहेबांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी रमाई अगदी गौवरया विकुन बाबासाहेबांना थोडेफार पैसे पाठवत तसेच संसारासाठी खर्च करत ..
पण सध्याच्या,.परिस्थीतीत महिला,
असो या बरोबर अजुन खुप उदाहरण आहेत..
त्यातुन आपण काय शिकलो किंवा काय शिकणार हे खुप महत्वाचे आहे)
या बरोबरच
अशी बाबासाहेबांबरोबर ,माता रमाई किंवा रामजीबाबा यांच्या संबधित किंवा महात्मा फुले ,सावित्रीमाई किंवा अन्य महामानवांच्या विचारांशी संबधित त्यांचे विचार आणि कृतीतुन आपण काय शिकलो हे उदाहरण आणि त्यातुन आपण काय शिकले पाहिजे हे पाठवा नक्कीच
आज आपल्या बाबासाहेबांचे बाबा
सुभेदार रामजी बाबा यांचा ” स्मृतिदिन ” आहे
या स्मृतिदिना त्यांचे विचार आणि कृती तुन आपण काय घेतो हे माहत्वाचे आहे..स्मृतिदिनि अभिवादन किंवा हात जोडुन एखादी ईमोजी पाठवणे तर चालुच असते .पण..
बघा किमान या महापुरुषांच्या विचारातुन आणि कृतीतुन आपण काय घ्यायचे ते ठरवले पाहिजे
फक्त त्यांचे उदाहरण देऊन फक्त किंवा त्यांच्या विषयी भाषणे देऊन आपण कोणी तरी चांगले म्हणतील…
पण त्या उदाहरणातुन किंवा त्यांच्या त्या कृतीतुन आपण काय घेतो…आपण काय शिकलो हे खुप महत्वाचे आहे..
असो
आपलाच
यश भालेराव
9067047333
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत