O.B.C. बांधवासाठी अत्यंत महत्वाची माहिती.
- विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
माहीत करुन घ्या. आणि शक्य तितकी शेअर करा ….
वाचा…
(अ) एस् सी.- SC (scedulde caste) अर्थात-
अनुसुचित जाती
निकष……
१)सामाजिक दृष्ट्या मागास
२)शैक्षणिक द्रृस्टया मागास
३)आर्थिक दृष्ट्या मागास
४)ज्यांचा स्पर्श पुर्वि “मनुस्मृतिनुसार” विटाळ मानला
जात होता यांचा एक प्रवर्ग बनविण्यात आला आणि
त्यांना SC संबोधीत केले गेले .
(ब) ST (scedulde Tribes)
अर्थात अनुसुचीत जमाती
निकष….
१)सामाजिक दृष्ट्या मागास
२)शैक्षणिक दृष्ट्या मागास
३)आर्थिक दृष्ट्या मागास
४) ज्यांच्या मधे भटकंती चे गुण दिसतात आणि भटकंतीचे जीने जगावे लागते. यांचा एक प्रवर्ग बनविण्यात आला आणि त्यांना ST संबोधीत केले गेले .
बाबासाहेबांनी SC,ST बांधंवांना काय दिले ? जनावराचे जीने सोडून माणसाचे जीवन आणि स्वाभिमानाने जगण्याचा आधिकार…….
ज्यांच्या बापजाद्यांना स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते की आमच्या येणा-या पिढ्यांमधे कोणी IAS, IPS ,IRS, IFS डाँक्टर, इंजिनियर , प्राध्यापक होईल , त्यांच्या स्वप्नांच्याही पलीकडे त्यांना बाबासाहेब देऊन गेलेत….
(क) ओबीसी – OBC -(Other Backward Class )
इतर मागासवर्ग निकष…..
१)सामाजिक दृष्ट्या मागास
२)शैक्षणिक दृष्ट्या मागास
३)आर्थिक दृष्ट्या मागास
४)ज्यांचा स्पर्श विटाळ मानला जात नव्हता….
यांचा एक प्रवर्ग बनविण्यात आला आणि त्यांना OBC संबोधीत केले गेले .
OBC बांधवांचा स्पर्श विटाळ का मानला जात नव्हता ?
…. कारण “मनुस्मृती” ही भारताची संविधाना पुर्वीची ब्राम्हणांची राज्यघटना होती. आणि “मनुस्मृती” नुसार OBC शुद्र होते. ब्राम्हणांची सेवा करण्यासाठी त्यांना बिनपगारी चाकरांची आवश्यकता होती.
आणि सेवा करवुन घेण्यासाठी OBC बांधवांचा स्पर्श होणे अटळ होते. म्हणून OBC बांधवांकडून सेवा करून घेण्यासाठी स्पर्श न करण्याची आटकळ ठेवली नाही..
गंमत वाचा..
-म्हणजे ब्राम्हणाला आरामदायी बसण्यासाठी खुर्ची पलंग सुतार (OBC) बांधवांनी तयार करून द्यायची…
-न्हावी (OBC) बांधवांनी ब्राम्हणांची हजामत करून द्यायची….
-कुणबी (OBC) मराठा बांधवांनी शेतमाल आणि धान्य पिकवुन द्यायचे….
-माळी (OBC) बांधवांनी भाजीपाला पिकवुन द्यायचा..
-तेली (OBC) बाधवांनी तेल तयार करून द्यायचे .
-कंभार (OBC) बांधवानी पाण्याचे मडके तयार करुन द्यायचे.
आणि
हे सर्व ब्राम्हणांसाठी विनामोबदला केले जायचे, कारण ही सेवा होती.
आणि सेवा केलेल्या गोष्टीचा मोबदला मागायचा नसतो.
ओबीसी बांधवांचा गैरसमज —
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केले ??
उत्तर– मनुस्मृती ने ओबीसी बांधवांना शिक्षण घेण्यास मनाई केली होती…
बाबासाहेबांनी संविधानामधे
(भारतीय राज्य घटनेत) शिक्षण घेण्याचा आधिकार दिला….
मनुस्मृतीच्या कायद्यानुसार मुलाला वडीलांचा पिढीजात व्यवसाय करावा लागत होता…
म्हणजे …..
कुणब्याचा मुलगा कुणबी…
सुताराचा मुलगा सुतार…
न्हाव्याचा मुलगा न्हावी…
कुंभाराचा मुलगा कुंभारच व्हायचा..
आता ओबीसी बांधवांची मुले डाॅ. बाबासाहेबांनी दिलेल्या (संविधानिक ) घटनेच्या आधिकांमुळे IAS, IPS , IRS, IFS डाॅक्टर, इंजिनियर, शिक्षक, प्राध्यापक बनु शकले…
मराठा बांधवांचा नेहमीचा प्रश्न —
आम्ही अभ्यास केला, हुशार होतो. मार्क्स पाडले म्हणून शिकलो..?
उत्तर ……
अरे राजा, तु हुशार होतास हे मान्य आहे. पण तूला तुझी हुशारी दाखवण्याची “संधी” कोणी दिली ?
तुझे आजोबा, पंजोबा सुद्धा हुशारच होते. पण तरीही ते IAS, IPS , IRS, IFS डाॅक्टर, इंजिनियर , प्राध्यापक बनु शकले नाहीत. कारण त्यांना हुशारी दाखवायची संधीच मिळाली नाही…
तुझ्या घराण्यात काय तुच एकटा आधिकारी होण्यासाठी लायक होतास आणि तुझे आजोबा पंजोबा काय लायक नव्हते काय ?
मुळनिवासी लोक जेव्हा तुलना करतील की आमच्या पुर्वजांचे जीवन उकीरड्यावरच्या जनावरासारखे होते, मग आमचे जीवन सोन्यासारखे कसे झाले ?
तेंव्हा लोक खरा इतिहास वाचतील आणि त्यांना समजेल की हे फक्त डाॅ. बाबासाहेब
आंबेडकरामुळे शक्य झालय…!!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत