खाजगीकरण बहुजन समाज उध्वस्त करण्याचे षढयंत्र…
नुकतच महाराष्ट्र शासनाने सरकारी कर्मचारी व अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठीं ९ ठेकेदार कंपन्या मार्फत भरती प्रक्रिया सुरू करणारा आदेश जारी करण्यात आला आहे. शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी व महाराष्ट्र सरकार मधील शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्या साक्षीने पारित केला. मंडळी आरएसएस चे प्रचारक ब्राह्मणी विचारांचे हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी रोज एक एक आदेश काढत आहेत या पाठीमागे फार मोठा कट कारस्थान चा डाव आहे. सामान्य माणूस हा आरएसएस प्रणित भाजपा सरकार चे मनसुबे लक्षात घेऊ शकत नाही. या पुढील काळात बहुजन समाजातील प्रत्येक जात समूहाला, अठरा पगड जातींच्या लोकांना सरकारी कर्मचारी म्हणून काम करता येणार नाही याची काळजी आरएसएस प्रणित भाजपा सरकार ने घेतली आहे. मतदान करताना अठरा पगड जातींच्या लोकांना हिंदु म्हणून, गोंजराले जाते. मात्र हिंदू असणाऱ्या मराठा कुणबी समाज यांच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून शांततेत आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर पोलिसा मार्फत अमानुष मारहाण करण्याचा आदेश दिला जातो. धनगर समाज हिंदू म्हणून ओढला जातो. परंतु त्यांचा मागणी साठी वकिलाची फौज उभा करून त्यांना कायद्याच्या चौकटीत बसत नाही असे सांगून त्यांचे अधिकार हिरावून घेतले जातात. अठरा पगड जातींच्या लोकांना देव, धर्म च्या नादी लावून त्याच्या श्रध्देचा बाजार केला जातो. हा बामणी कावा इथल्या हिंदू म्हणून घेणाऱ्या अठरा पगड जातींच्या लोकांच्या लक्षात येऊ दिले जात नाही. आत्ता सरकारी नोकरीत जाणाऱ्या अठरा पगड जातींच्या लोकांना लोकांना कॉर्पोरेट कंपन्या मार्फत मज्जाव केला जाणार आहे.
या कंपन्या आरएसएस च्या हस्तक असतील, मराठा, माळी, कोळी, सुतार , लोहार, कुंभार, धनगर, महार, मांग , चांभार, वडारी धनगर, वंजारी समाजाचे तरुण कॉन्ट्रॅक्ट बेस वर नेमले जातील. त्यांच्या नोकरीची कोणतीही गॅरंटी नाही मनमानी कारभार असेल,( पगार, कामाचे तास , सुरक्षितता) असणार नाही. याबाबत अनभिज्ञ ठेवले जाते. मुळात हा समाज जास्त शिकत नाही. काही प्रमाणात शिक्षण घेतलेले अठरा पगड जातींच्या मुलांना अश्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या नोकऱ्या , शिक्षक, पोलिस, तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार, बँक कर्मचऱ्यांची, महसूल अधिकारी, कर्मचारी म्हणून कराव्या लागणाऱ आहेत. बेकार असणारे तरुण या नोकऱ्या नाईलाजास्तव करणारच कारण उत्पन्न चा दुसरा पर्याय त्यांच्या कडे नाहीं , ब्रहमनाची मुले विना सायास वरिष्ठ अधिकारी म्हणून निवडले जातील यात काही शंका नाही. मराठा सह बहुजन समाजातील विविध जाती जमाती च्या मुलाना जातीय व धर्मिक दंगलीत ओढण्यासाठी मनोहर कुलकर्णी ( भिडे) सारखे लोक नागपूरच्या रेशीम बागेतील कारखान्यातून तयार केलेले असतात. फडवणीस त्यांना गुरुजी मानून दंडवत घालतात.
मंत्रीमंडळात असणारे मराठा सह बहुजन समाजातील मंत्री हे कोणत्याही जातीचे असेल तरी त्यांना आपल्या समाजाच्या हितासाठी पुढाकार घेता येत नाही, बोलता पण येत नाही कारण ते आरएसएस प्रणित भाजपा सरकार चे मिंधे असतात त्यांना बोलण्याची संधी आरएसएस देत नाही ( जर कुणी तसा प्रयत्न केला तर त्याचा राजीनामा किंवा इडीची सीबीआय भीती केंद्रातील आरएसएस प्रणित भाजपा सरकार) घातली जाते एकूणच काय तर, संपूर्ण देशात ब्रहामनी विचारधारा पेरली गेली आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. संविधानाचा शेवट होतो आहे. नागरिकांचे मूलभूत अधिकार हिराऊन घेतली जात आहे.
भारताच्या संविधानाने दिलेल्या अधिकाराचे पायमल्ली केली जात आहे. ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व शक्तीचे शिक्षण देण्याचा अधिकार संपविण्यासाठी महाराष्ट्रातील ६५ हजार प्राथमिक शाळा कॉर्पोरेट कंपन्या ना चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात बहुजन समाजातील मुलांना ब्राह्मणी वर्चस्व स्विकरावे लागणार आहे, कॉर्पोरेट कंपन्या नफा कमविण्यासाठी उद्योग उभा करतात. शाळातून नफा कमविण्यासाठी पालकांना वेठीस धरणार आहेत, इंग्रजी माध्यमाच्या शाळा त्याचे साधे उदाहरण आहे. अनेक शिक्षण सम्राट बहुजन समाजातील मुलांना ब्राह्मणी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतील . मनुस्मृती लागू झाली आहे हे अजून लोकांच्या लक्ष्यात येत नाही हे या देशाचे दुर्दैव आहे. प्रा. डी.बी. धावारे..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत