देशदेश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

काय हवे? बुद्ध की युद्ध?

युद्ध हे कोणालाच ना जिंकता येते, ना हारता येते. युद्ध हे जाणिव थांबवावे लागते. शस्त्रसंधी करावीच लागते, तह घडवून आणावा लागतो.
तरच युद्ध थांबते. शांतता निर्माण होते आणि जेथे शांतता निर्माण होते, तथेच खर्या अर्थाने सार्वजनिक विकास साधला जातो.

जेथे युद्ध हारल्या जाते किंवा जिंकल्या जाते.तेथे अशांतता निर्माण
असते, हारलेल्या मनात, जिंकलेल्यांची जीरवायाची खुमखुमी असते, तो शक्यतो बदला घेण्याच्या भुमिकेत असतो आणि केव्हाही कुरापत काढु शकतो. तर जींकलेल्या आजुनही जींकतच राहावसे वाटते. आणि तेही तेवढेच खतरनाक असते, जेवढे खुरापती काढण्याचा नेम नसते. म्हणूनच, युद्धाची भाषा ही अयोग्य च असते.
नव्हे, युद्धाची पार्श्वभूमी निर्माण होणार च नाही, याची क्षणोक्षणी खबरदारी घेणे जीवनात अत्यंत महत्त्वाचे असते.

कमजोरावर युद्ध लादणे सोपे असते, तेवढेच बलवत्तरां सोबत युद्ध छेडणे तेवढेच कठीण असते.
युद्धामध्ये जर ऐक बाजू कमजोर असेल आणि दुसरी बाजू भरभक्कम असेल तर त्यास निश्चित च युद्ध म्हणता येत नाही. युद्ध हे बरोबरींच्या मध्ये होत असते, तेव्हा तेच खर्या अर्थाने युद्ध असते.

म्हणूनच, तथागत बुद्धाने, युद्धाला किंवा युद्ध पार्श्वभूमीवला विरोध केलेला आहे. पाण्याच्या प्रश्नावरून सर्व प्रथम बुद्धाने, सिद्धार्थ गौतमाने
युद्धाला विरोध केलेला होता.
त्यांचे मते, युद्धाने युद्ध कधीच संपत नाही, तर अयुद्धाने, मैत्रिभावानेच युद्ध संपविता येते.

दोन जीवात, दोन समुहात, दोन प्रदेशात युद्धजन्य पार्श्वभूमी निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची गरज लक्षात घेऊन च, मन आहे तेथे
तृष्णाही जीवंत असतात. आणि तृष्णा कारणास्तव मनात द्वंद, द्वेष, लोभ, अंहकार उपलब्ध असतो. अशा अ आनंदीमय जीवनात न्याय दुरापास्त होत राहत असतो. आणि अन्यायाचे राज्य प्रस्तापित होत राहत असते. जेथे जेथे अन्यायाची पार्श्वभूमी तयार होते, तेथे अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद केला जातो आणि अशा पार्श्वभूमीवर पुन्हा युद्धाचे ढग दाटून येत राहत असतात. असे मानवी जीवनात कदापिही होऊ नये, सर्व दुर मानवतेचे,शांततेचे, विकासाचे राज्य निर्माण व्हावे, म्हणून च भगवान बुद्धाने धम्म/धर्माचे महत्त्व आणि उद्देश सांगितलेला आहे. आणि त्यावर धम्माचा मार्ग, उपाय सुद्धा सांगितलेला आहे की, मानवा मानवा मध्ये धंद निर्माण होऊ नये , म्हणूनच
तथागत बुद्धाने धम्म जगापुढे ठेवतांना,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मते, सामाजिक समतेचा संदेश दिलेला आहे.जो पर्यंत सामान्य सामाजिक समता प्रस्थापित होत नाही. तो पर्यंत
युद्धजन्य परिस्थितीला पूर्णविराम मिळत नाही. आणि जेथे सामाजिक समता प्रस्थापित असते, तेथेच खर्या अर्थाने स्वातंत्र्य सुखा समाधानाने नांदत असते. धम्म, धर्माचे जसे समता, स्वातंत्र्य, पैलू आहेत,अशा सामाजिक प्रवाहात बंधुत्वाचा जन्म होत असतो. ऐकदाचा दोन जीवात बंधुभाव निर्माण झाला की, तेथे प्रेम भावना उत्पन्न होत राहते, दोन जीवात किंवा दोन जीव सामाजिक समुहात किंवा दोन जीव राष्ट्रा, राष्ट्रात बंधुभाव, मैत्रीभाव उत्पन्न असतो, तेथे कधीच युद्धाची पार्श्वभूमी निर्माण होत नाही.
आणि जेथे जेथे युद्ध पार्श्वभूमी चे समुळ उच्चाटन असते, तेथे तेथेच
बुद्ध असतो.

समता, स्वातंत्र्य, बंधुत्व
व न्याय हा बुद्ध तत्वज्ञानाचा पाया होय. म्हणूनच, मानवी मनात न्यायाची लंगोट कसूर बांधलेली असावी, न्याय भूमिकेतून च,मैत्री करूणेची भावना वृद्धिंगत होत राहून
आणि जेथे जेथे करूणा उत्पन्न होते, तेथे तेथे मनातुन युद्ध संपलेले असते. आणि जो पर्यंत मनात युद्ध
द्वंद असते, तो पर्यंत युद्ध कधीच संपत नाही. म्हणूनच सर्व प्रथम मनातील युद्ध द्वंद संपविणे आवश्यक आहे. बुद्धाने जो धम्म सांगितलेला आहे, त्याचा मुळ उद्देश च मनातील द्वंदाचे समुळ उच्चाटन करणे होय.

सुसभ्य माणसांची निर्मिती तेव्हाच शक्य आहे, जेव्हा मनातील अधम, अधम्म, अधर्म कृत्य प्रवृत्तीचा नाश होतो. आणि मानवी मनात उत्पन्न अधम, अधर्म, अधम्म कृत्य प्रवृत्तीचे समुळ उच्चाटन हे सुसंस्कारित शिक्षणानेच शक्य आहे. बुद्धाने सांगितलेला धम्म
हा, बुद्ध वचनांचा समुह होय. सुसांस्कृतिक शिक्षणाचा धम्म/धर्म ग्रंथ होय. जो अयुद्धाचे शिक्षण देत,
असतांना च ,अन्याया विरुद्ध लढण्याचे प्रशिक्षण सुद्धा देतो.
अर्थात, जेथे अन्याय संपतो तेथे युद्ध
संपते. आणि जेथे युद्ध संपते, तेथेच
धम्म, धर्म, नैतिक वर्तन जीवंत होते.
जे कर्मकांड, पुजापाठ, जातीवाद दैववाद व सत्तावाद
फैलावून कधीच शक्य नसते. हे सर्व पृथ्वीवरील अमानवीय असल्यानेच जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे.

बुद्ध विसराल तर
युद्ध
आणि
युद्ध विसरायचे असेल तर बुद्ध!
जगापुढे दोनच पर्याय आहे.
काय हवे?
बुद्ध की युद्ध?

युद्धाने जीवन र्हास होतो,
तर
बुद्ध जीवन दान देतो,
काय हवे?
……..

🙏🏾
प्रा.मुकुंद दखणे.
यवतमाळ 9373011954.
जयभीम🙏🏾 जयभारत

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!