जर कोणी एखादा बौद्ध देश आमच्या देशावर हल्ला करील, तर तो देश आमचा शत्रु होईल…डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संदेश तुपसुंदरे कार्यसंपादक
मुक्तीदाता विशेषांक
(प्रबुद्ध भारत दि. १४-६-१९७८ महापरिनिर्वाणानंतर प्रकाशित)
२६ जानेवारी १९५६ ला नव्या दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक समारंभ पाहण्यासाठी आग्राहून ३० कार्यकर्ते आले होते. जेव्हा त्यांना कळले की, आपले मार्गदर्शक बाबा दिल्लीत आहेत. तेव्हा त्यांचे मन तो सरकारी तमाशा पाहण्यास लागेना. ते सर्व २६ अलीपूर रोड येथे बाबा राहत होते. तेथे येउन पोहचले. बाबा आपल्या वाचनाच्या बोलीतून बाहेर येउन त्यांच्या मध्ये बसले. आपले मार्गदर्शक व उद्धारकर्ते आपल्यामध् ये येउन बसलेल, पाहून सर्वाना अतिशय आनंद झाला. बाबांनी सर्वाचे कुशल विचारले, आग्राची स्थिती कशी काय आहे.
आग्राची जनता आपल्या दर्शनकरिता फार व्याकूळ झालेली आहे. तेव्हा आपण एक वेळ देण्याची तसदी (त्रास) घ्यावी.
बाबा म्हणाले, माझ्या पायांना त्रास होत आहे. चालता फिरतांना त्रास होतो. आता मी भाषण करणे बंद केले आहे. माझे आयुष्य फार दिवस राहिलेले नाही. मलाही एक दिवस मरण येणारच. याकरिता माझी अशी इच्छा आहे की, मला जेवढे दिवस मिळतील तेवढ्याचा मी फायदा करु इच्छितो. मी माझा सारा वेळ पुस्तके लिहिण्यात घालवित आहे. कितीतरी पुस्तके लिहित आहे. माझी इच्छा आहे की, माझ्या मरणानंतर माझी पुस्तके माझ्या जनतेला मार्ग दाखवित राहावीत, यामध्ये सर्वात मोठे पुस्तक भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धर्म हा खिश्चनांच्या बायबल प्रमाणे होईल. याला बौद्ध बायबल म्हटले पाहिजे.
तेव्हा कार्यकर्ते म्हणाले, बाबा आम्ही असे ऐकले आहे की, बौद्ध धर्म कितीतरी विभागात वाटला गेला आहे. महायान, हीनयान, वज्रयान, तन्ययान इत्यादी विभागात तो दिसतो. जर आम्ही बौद्ध धर्म स्विकारला तर कोणत्या यान प्रमाणे चालावे?
तेंव्हा बाबा म्हणाले, भगवानाचा धम्म पवित्र धम्म आहे. त्यामध्ये काही भाग नाहीत. मी सर्वाचा गाढ अभ्यास केला आहे. माझ्या अध्यनाचे सार माझे पुस्तक बुद्धिष्ट बायबल मध्ये आहे. यामध्ये मी अशा सव गोष्टीचे विवेचन केले आहे. त्याचे पालन करा. मी ते लवकरच छापीत आहे. माझी अशी इच्छा आहे की मी बौद्ध धर्म स्विकारण्या पूर्वीच ते छापून तयार व्हावे. याची किंमत इतकी स्वस्त असेल की, आपण सर्व ते खरेदी करुन, वाचू शकाल.
कार्यकर्ते म्हाणाले, एक नवा धम्म आपण असा नाही कां चालवू शकत? यामुळे आपले अस्तिव वेगळे राहू शकेल, आपण धम्मप्रर्वतक बनाल. आणि आपले आम्ही गुनगान करीत राहू?
बाबा ह्या प्रश्नावर स्मित हास्य करीत बाबा म्हणाले नवा धम्म कशाकरिता, जर मी आपणास जुना धम्मच दिला तर तो तुम्ही सर्व स्विकाराल?
कार्यकर्ते म्हणाले, आपण जे सांगाल, ते आम्ही करु
बाबा म्हणाले, माझी जनता शतकानुशतका पासून ब्राम्हणवाद जातिभेदाची शिकार झाल्यामुळे ती आपला जुना इतिहास विसरली आहे. आमचे पूर्वज सर्वच बौद्ध होते. ब्राम्हणांच्या जातिभेदाला आमच्या पूर्वजांनीच मानले. त्यामुळे ब्राम्हणवादाच्या पोषकांनी कोट्यवधीस अस्पृश्य बनविले. यामुळेच त्यांनीच (ब्राम्हणांनी) यांच्या उन्नतीची सारी साध ाने काढून घेतली. आमचे जीवन गुलाम आणि कुत्र्यां-मांजरा पेक्षाही वाईट मानले जाउ लागले. बौद्ध धम्मात ब्राम्हणवाद नाही. इतकेच नव्हे तर ब्राम्हण किंवा क्षत्रिय यांचे प्रभुत्वही नाही. जातीभेदही नाही. ईश्वर व आत्मा यांचे भांडण नाही. ज्यामुळे गरिबी किंवा श्रीमंतीला इश्वराचे वरदान म्हटले जाते. अशा गोष्टी बौद्ध धम्मात नाहीत. यात समानतेची भावना आहे. मानव एक आहे. या धर्मात उत्साह आणि प्रेरणा या पवित्र भावना आहेत, हिंदू धर्म जातीभेदावर आधारलेला आहे. इतकेच नव्हे तर असामानता हा त्याचा आधार आहे. आणि यामुळेच हिंदू धर्माची प्रेरणा दोषयुक्त आहे. या उलट मी असे इच्छितो की, माझझी जनता या देशावर प्रेम करो, या देशावर प्रेम करण्याकरिता याच धर्माचा अवलंब केला पाहिजे, येथील संस्कृती ही भगवान बुद्धाची संस्कृती आहे. या संस्कृतीचा प्रचार सान्या जगात आहे. जर भगवान बुद्धाच्या संस्कृतीला काढून टाकले तर भारताची
रूवतःच अशी काही संपत्ती नाही.
भारताच्या स्वतंत्र्यानंतर १९४८ मध्ये कॉन्स्टीट्यूशन असेम्ब्लीमध्ये भारताच्या झेंड्यांच्या निशाणीसाठी भारतीय संस्कृतीचा शोध केला. त्यामध्ये मी सर्वाना सम्राट अशोकाचा धम्म चकाला राजचिन्हाचा रुपात स्वीकारण्याबद्दल आग्रह धरला, ते मानले
गेले. राम आणि कृष्णाचे कोणतेही चिन्ह मानले गेले नाही. कारण राम आणि कृष्ण यांचा धर्म भारतीय संस्कृतीत नाही. ती परदेशी भावना आहे. जी ब्राम्हणांनी जातीभेदाच्या रुपाने जोर जबरदस्तीने बौद्ध जनतेवर लादली. या देशाबद्दल भक्ती उत्पन्न करण्याकरिता बौद्ध धम्मच श्रेष्ठ धम्म आहे. याच्या स्विकारामुळे आम्ही सर्व आशीयाच्या जनतेचे जेथे भगवान बुद्धाचा प्रचार आहे. त्यांचे मित्र होउ, या देशाचा मोठेपणा कायम ठेवू शकू! चालू युगात एकमेंकांचे सर्व हितचिंतक आहेत, प्रत्येक देश आपला हितचिंतक शोधतो आहे. या देशात राहणा-या कोट्यावधी अस्पृश्यांचे हितचिंतक कोणीच नाही. ब्राम्हण धर्माच्या अनुयायांचे न या देशावर प्रेम आहे, न येथील जनतेवर, त्यांचे प्रेम फक्त स्वार्थावर आहे. जातीभेदाने त्यांना असे तयार केले आहे की, प्रत्येक ब्राम्हण, क्षत्रिय किंवा वैश्य यांना आपल्या मोठेपणाचा आणि भारतील कोट्यावधी लोक कशाप्रकारे हीन स्थितीत ठेवता येतील. त्यांना याचा विचार पडलेला असतो. याकरिता मी असे इच्छितो की, माझ्या जनतेचेही कोणीना कोणी हितचिंतक असावे. ते हितचिंतक बौद्ध धर्माच्या पालनाने मिळतील. भगवान तथागताची जन्मभूमी या भारतातच असल्यामुळे हा देश कोट्यावधी बौद्धांना पूजनीय तीर्थस्थान आहे.
या धम्मामुळे यांच्याशी भ्रातृत्व संबंध जोडले जाउ शकतील. जेव्हा असे होईल, तेव्हा आमच्या सुख दुःखासंबंधी विचार होईल. जो पर्यत या देशात भगवान बद्धाचे नाव घेतले जात होते, तो पर्यंत हा देश गुलामी पासून दूर होता. आणि जेव्हा येथील जनतेवरच जाती भेद ब्राम्हणवाद लादला गेला, त्या दिवसापासून हा देश गुलाम बनला. जेथपर्यत आमचा बौद्ध धम्माचा संबंध असेल तेथपर्यत आम्ही बंधुत्वाचे नाते जोडून ठेवू. जर कोणी एखादा बौद्ध देश आमच्या देशावर हल्ला करील, तर तो देश आमचा शत्रु होईल, त्यांच्याशी आम्ही लढू. देशाचे संरक्षण करणे हे सर्वाचे कर्तव्य आहे. जर देश राहीला नाही तर आम्ही काय करु शकतो? जर देश जीवंत राहील, तर येथील बौद्ध किंवा इतर सर्व धर्मवाले जीवंत राहू शकतील.
शेवटी बाबासाहेबांनी कबूल केले की, ते १८ मार्च १९५६ ला आगयऱ्याला जरुर येतिल. बाबांच्या या कबूलीमुळे कार्यकर्त्यामध्य एक नवीनच उत्साह निर्माण झाला. सर्व अगदी
आनंदाने आग-यात परत आले…
संदेश तुपसुंदरे कार्यसंपादक
मुक्तीदाता विशेषांक
(प्रबुद्ध भारत दि. १४-६-१९७८ महापरिनिर्वाणानंतर प्रकाशित)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत