वैदिक काळात मंदिरं नव्हती. आपणास हे माहीती आहे काय ?

डॉ. शिरीष राजे मानसशास्रतज्ञ नाशिक
वैदिक काळात मंदिरं नव्हतीच, गौतम बुद्ध, महावीर यांनीही प्रार्थना स्थळांशिवायच उपदेश केला.
सम्राट अशोकाने स्तूप बांधले पण प्रार्थनास्थळं बांधली नाहीत.
(अर्थात ज्यांचे वाचन आणि अभ्यास असेल त्यांचेसाठीच… हं..! विचारशक्ती गमावलेल्या उथळ मंडळींनी हे नाही कळणार)
मात्र हिंदू राजांना देवळं बांधायला विशिष्ट समुदायाने बाध्य केलं. देवळं बांधली आणि देवळांभोवती त्यांनी स्वतःसाठीच एक स्वार्थी अर्थव्यवस्था उभारली त्यातून त्यांचं तर कल्याण झालचं, शिवाय पिढ्यानपिढ्या बसुन खायची सोय ही त्यांनी करून घेतली.
मुसलमान आक्रमकांनी अनेक मंदिरं लुटली, फोडली त्यात या ऐतखाऊंचच प्रचंड नुकसान झालं. त्यांची रोजीरोटी बंद झाली. म्हणुन परत जनसमुदायला देवदेवतांच्या प्रकोपाची व कर्मकांडाची भिती दाखवुन तर धर्म/संस्कृति लयास जाईल हिंदुत्व नष्ट होईल याचा बागुलबोवा उभा करून, त्यांचेकडुन उकळलेल्या दानातुन पुन्हश्चः मंदिरं उभारली. आणि कर्मकांड, नवस-सायास, पुजा-अर्चा, अभिषेक-महाभिषेक करण्याची दुकानदारी अबाधित ठेवली.
बहुजन समाजाच्या कबिरा पासुन तर थेट अलिकडच्या गाडगेबाबांपर्यंतच्या बहुतेक सर्व संतांनी (सगुण वा निर्गुण) मंदिरात देव नसतो, असते ते पुजाऱ्याचे पोट हे स्पष्टपणे सांगितलं.
तेव्हा त्या त्या काळात अशा संतांना याच ऐतखाऊ मंडळींनी धर्मदोषी ठरवुन त्यांचा अनन्वीत छळ केला. हा इतिहास असत्य आहे काय ? (संत तुकोबारायांचा खुन करून ते सदेह वैकुंठाला गेल्याची वंदता हे याचं उत्तम उदाहरण)
जेव्हा जमानसातली या संतांची प्रतिमा ते बिघडवु शकले नाहीत तेव्हा मात्र त्याच संताचा देव बनवून त्यांची ही मंदिरं उभारलीत. आणि त्यांना ही आपल्या उदरनिर्वाहाचे साधन बनवले.
देव देवळात नसतो हे मुसलमानांनी सिद्ध केलं, सर्व संतांनीही सांगितलं पण हिंदूंचा देवळांवरचा विश्वास या ऐतखाऊ मंडळीनी तसुभरही कमी होऊ दिला नाही.
पुढे हीच ऐतखाऊ जमात कर्मकांडांची सतत दहशत रहावी व त्यातुन स्वकल्याण साधावे यासाठी सातत्याने वेगवेगळे मार्ग शोधत राहीली.
उदाहरणार्थ मीनाक्षी मंदिरात सोन्याचा मुलामा देणारी कार अर्पण करण्याचं कर्मकांड पुरोहितांनी १९९० च्या सुमारास शोधलं. भक्ताने अशी कार अर्पण केली की या कार रुपी रथातून तिची मिरवणूक मंदिर परिसरात काढण्यात येते.
देव देवळात नसतो, देव नवसाला पावत नाही या साध्या बाबी या अंकीत व बहकवल्या गेलेल्या हिंदूंना आजही मान्य नाहीत.
बुद्धीवंत, शास्त्रज्ञ, भांडवलदार, आयटी प्रोफेशनल्स, अशी उत्तम शिक्षित मंडळी देखील अक्कल गहाण ठेवणाऱ्यांमधे आहेत..
म्हणुन अशा तथाकथीत विद्वान हिंदूंना देवापेक्षा देवळं आणि नवस प्यारे असतात. म्हणुनच गावागावात मंदिरांचे जिर्णोद्धार होतात.
शाळा, आरोग्यकेंद्र, इस्पितळं यासाठी हिंदू लोक अपवादानेच एकत्र येतात. पण, शाळा, आरोग्य केंद्र वा इस्पितळ उभारलं की त्यामध्ये देवाची स्थापना मात्र आवर्जुन करतात.
या देशात ३०-४० लाख प्रार्थनास्थळं असतील, त्याशिवाय छोटी-मोठी मंदिरं करोडोंच्या संख्येने असतील. १.३ अब्ज लोकसंख्येच्या देशात इस्पितळं मात्र काही हजार आहेत. शाळा आणि महाविद्यालयं प्रार्थनास्थळांच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी आहेत.
सुशिक्षितांमध्ये बापु, बुवा, बाबा, साधू, तथाकथीत आचार्य, स्वयंघोषीत पिठाचार्य, महंत, महामंडलेश्वर, साध्वी यांचेच सर्वाधिक आकर्षण आहे.
सुशिक्षित मंडळी इंग्लड वा अमेरिकेत परदेशी गेल्यावर तिथे ही देवळेच बांधतात, शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं यांची उभारणी मात्र करीत नाहीत.
या देशात राजर्षी शाहु महाराज, क्रांतीसुर्य म. फुले, क्रांतीज्याती सावित्रीमाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांतिकारी विचार मांडले. ते विचार ते जगलेत, त्यासाठी आटापिटा करीत, हाल अपेष्टा सोसत सारं सहन करीत राहीलेत परंतु दुर्दैवाने आज त्यांचे अनुयायी म्हणवुन घेणारे शिक्षित, अशिक्षित पण, वैचारीक दृष्ट्या अपंग ठार अज्ञानी मंडळी त्यांचे विचार पायदळी तुडवतांना बघीतले की मनस्वी वेदना होतात.
आज हा इतिहास हीच मला फिक्शन वा कल्पनारम्यता वाटते. शाळा असो की महाविद्यालय वा विद्यापीठ वा रस्ता वा अन्य काही यांना या महापुरुषांची नावं देणं त्यासाठी आंदोलन करणं, प्रचार करणं आणि आपली मागणी पूर्ण झाली की आनंद साजरा करणं, हा या देशातला पुरोगामी कार्यक्रम मानला जातो.
या देशात सर्वाधिक लांगूलचालन हिंदूंचं होतं ही साधी वस्तुस्थितीही हिंदूंना मान्य नसते. या देशात ८० टक्के हिंदू असूनही त्यांना तुम्ही सुरक्षित नाही असे जाणुनबुजुन बिंबवले जाते आणि बावळट हिंदु हे सत्य मानुन स्वतःला असुरक्षित मानतात. ही किती मोठी गमतीशीर बाब आहे नाही ?
मी हिंदू आहे. परंतु हिंदु धर्मातच मला जन्माला घालावे यासाठी मी कोणतेही अर्ज फाटे विनंत्या वैश्विक शक्तीकडे केलेल्या नव्हत्या.
आजकालचे हिंदु धर्माचे रक्षण कर्ते तथा ठेकेदारांसारखी तत्सम मंडळी वैश्विक शक्तीकडे असंख्य अर्जफाटे, विनंत्या उपोषणे करून महत्प्रयासाने हिंदु घर्मरक्षणासाठी हिंदु धर्मात जन्माला आली आहेत हे कदाचीत कोणालाच माहिती नसावे
यदाकदाचीत त्यांचे दुर्दैवाने, जर का त्यांना मुसलमान, ख्रिश्चन किंवा बौध्द धर्मात वैश्विक शक्तीने जन्माला घातले असते तर ? किती उत्पात झाला असता ? याची कल्पना सुध्दा न केलेली बरी
अशा बेबुनियाद हिंदूंबाबत मी बिल्कुल देखील आशावादी नाही.
अपघाताने हिंदु धर्मात मी जन्माला आलो असलो तरी, प्रथम माझा धर्म फक्त “मानवता” आहे. असे निक्षुन सांगायला मला जरा देखील लाज तर वाटत नाहीच पण याउलट मी गर्व मेहसुस करतो
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत