भारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिकसामान्य ज्ञान

जगायचं कुणी- डॉ. दिलीपकुमार कसबे

डॉ. दिलीपकुमार कसबे
स.गा.म.कॉलेज,कराड

अलिकडे महाराष्ट्रातील अनेक अभयारण्यातील वन्यजीव पोटाची भूख मिटविण्यासाठी मानवी वस्तीकडे येताना दिसत आहेत. वन्यजीव संरक्षण विभागाच्या समोर ही एक प्रकारे हा चिंतेचा विषय आहे की नेमके काय करायचे. या विभागाकडे लोक तक्रारी करतात. वन्यप्राण्यांच्या मुळे आम्ही नेमकी भूमिका कोणती व कशी घ्यायची. वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी वन्यजीव संरक्षण विभागाची असल्यामुळे माणसांना सरक्षण द्यायचे की वन्यजीवांना.अनेक वेळा ज्या ज्या भागात शेतपीके,गायी,म्हैसी,शेळ्या,मेंढ्या, पाळीव कुत्री,बकरी यांच्यावर खासकरून बिबट्या,वाघ,अस्वले,तरस,लांडगे अशा प्राण्यांकडून जीवांना धोखा होतोय . जीव घेणा हल्ला होतोय.रानडुकरे,रानगवा,हरणे वनगायी,माकडे,असे प्राणी शेतीच्या पीकांचे नुकसान करतात.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. लोकांच्यामध्ये भीतीचे वातावरण ही निर्माण होतांना दिसते आहे. ज्या लोकांना अद्याप या जंगली,मांसाहारी प्राण्यांचे जवळून रस्ता ओलांडताना दर्शन झालेले नाही. ते सांगतात तसं काही या प्राण्यांना घाबरण्याचे कारण नाही. ते रस्ता ओलांडून जात असतात. परंतु ज्या लोकांनी या प्राण्यांना आपल्या शेतात, शेताच्या बांधावरून,उसाच्या सरीमधून पळताना पाहिलेले आहे.किंवा त्यांच्या पायाचे ठसे जवळून पाहिलेले आहेत. किंवा शेतामध्ये उभे असताना दिसले आहेत अशा लोकांच्या मनामध्ये या प्राण्यांच्या बाबतीत भीती निर्माण झालेली आहे. ते या प्राण्यांना सध्या खूप घाबरत आहेत.त्यातच उस शेतीचे वाढते क्षेत्रफळ, जवळच ओढा,नाली,नदी,पाण्याची तळी असे असल्यामुळे अलिकडे जंगली प्राणी त्या ठिकाणी अजूबाजूला दिसत आहेत.त्यातच पर्यावरणाचा होणारा नाश जंगल तोड,छोट्या जंगली प्राण्यांचा होणारा र्हास

यामुळे हे प्राणी डोंगर उतार,नदीशेजारील गावे,उस शेती अशा ठिकाणी वास्तव्य करून उपजीविकेचे साधन शोधत असतात. खेडोपाड्यात शेती हेच ज्यांचे उत्पन्नाचे साधन आहे त्यांना जगण्यासाठी शेती करावी लागते.शेतीमधून निघालेला ओला चारा,सुखा चारा,गवत ,उसाचा पाला,ज्वारी, हायब्रीड, गहू,भात यामधून पाळीव जनावरांना चारा मिळत असतो.जनावरांपासून मानव उत्पन्न मिळवित असतात. कोबंडी,बकरी,गायी,म्हैसी या पासून ही पैसा उभा होत असतो.प्रामुख्याने ग्रामीण भागात लोक दूध विक्री करतात, अंडी बकरी,कोंबडी यापासून यांच्या विक्रीतून आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पैसा उभा करत असतात व जगत असतात. स्वतः कष्ट केले तरच आपण पोट भरू शकतो. हे मात्र सत्य .पाळीव प्राण्यांच्या शेणापासून, लेंड्यापासून शेताला सेंद्रिय खत मिळत असते त्यामुळे शेत उत्पादनात वाढ होत असते .असे हे परस्परपूरक असतात. याशिवाय शेतकऱ्यांकडे पैसा मिळविण्याचे दुसरे कोणतेही साधन नाही. त्यातच अवेळी पडणारा पाऊस म्हणजे शेती हा एक प्रकारचा जुगार आहे.पाऊस हा शेतीतील पीक भरभराटीस आले,भुईमूग,द्राक्षे, डाळींब काढण्याच्या योग्य मोसमात आले की वरूण राजा ढासळतो वातावरण बदलते,आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे करतो.शेतीचे उत्पन्न चांगले आले की बाजारात दर ढासळतो.मग शेतकऱ्यांच्या पीकाला योग्य भाव मिळत नाही. आणि नेते सांगतात आपल्या मालाला दीडपट भाव आम्ही मिळवून देणार आहोत. घातलेला खर्च आणि उत्पन्न यांचा मेळ कधीच बसत नाही. त्यातच या जंगली प्राण्यांच्या पासून,शेतीच्या पिकांचे व पाळीव प्राण्यांचे जीव घेणे हल्ले.म्हणजेच मनात भीती,व शेतीचे ही नुकसान आणि पाळीव प्राण्यांचे ही नुकसान. जंगली प्राण्यांना मारता येत नाही. मारले तर वनविभागाचा ससेमिरा मागे लागतो.त्यांचे काम वन्यजीवांचे रक्षण करणे त्यांना वाचविणे.आणि शेतकऱ्यांचे काम स्वतः चा जीव मुठीत घेऊन शेतीला पाणी पाजणे,खुरपणी करणे,व स्वतः व कुटुंबाचे पोट भरणे,पाळीव प्राण्यांचे,पोट भरणे,त्यांचे जीव वाचविणे. आता वन्यप्राणी पाटण,कराड,म्हणजेच

महाराष्ट्राच्या दर्या खोर्यात वसलेली जी गावे,जिल्हे,तालुके सांगली,सातारा,पुणे,कोल्हापूर,सोलापूर नाशिक अशा ठिकाणी निदर्शनास आले आहेत. त्या ठिकाणी आसपास त्यांचे वास्तव्य वाढलेले आहे. पाण्यासाठी, चार्यासाठी ,शिकारीसाठी मग जेथे शिकारीचा वास, गंध येईल त्या बाजूला ते जातात घराच्या बाजूला शेड,सपार,झोपडी की ज्या ठिकाणी कुत्री,पाळीव प्राणी बकरी,शेळी,मेंढी,म्हैस,रेडकू, गाय,वासरू कोंबडी असेल तेथे जाऊन त्यांची शिकार कशी करता येईल हे बघतात.कारण मग त्यांच्या पोटाला काय मिळणार शिकार करून खाण्यात जो आनंद आहे.तो आयते खाण्यात नसतो म्हणून हे शिकारीच्या शोधात असतात.प्राणी,चित्रात,सिनेमात, टिव्हीत पहाण्यास बरे वाटतात परंतु समोर आल्यानंतर रक्त गोठून जाते,अंगाला कापरे फुटते,रोमांच फुलतो.ह्रदयात धडधड सुरू होते.आपल्या जनावरावर हल्ला करत असताना त्याला मारता येत नाही नाही जर मारला तर गुन्हा नोंद होतो.वनविभाग गुन्हा नोंदवितात.जरी त्या प्राण्याने मानवावर हल्ला केला किंवा पिकाचे नुकसान करताना दिसला तरी त्याला मारता येत नाही .त्या प्राण्यापासून जीव वाचविण्यासाठी ही त्याला मारता येत नाही.त्याला मारले तर तो कायदेशीर गुन्हा आहे. मग नेमके जगायचे कुणी त्या जंगली,रानटी प्राण्यांनी की माणसांनी.
ज्या ज्या गावात हे प्राणी दिसलेत तेथे तेथे रेड अलर्ट, सांयकाळी, पहाटे रात्री बाहेर पडायचे नाही.शेतीला पाणी पाजायचे नाही.एकटे शेतात जायचे नाही. मग वेळेवर शेती होत नाही. उत्पन्न मिळत नाही.आता जगायचे कोणी प्राण्यांनी की माणसानी .असा प्रश्न आहे.वनविभागाने शांतपणे विचार करावा व निर्णय द्यावा असे लोक म्हणतात.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!