महात्मा जोतिबा फुले यांचे सहकार चळवळीतले योगदान अतिशय महत्त्वाचे – राज ठाकरे

आज रायगड जिल्ह्यातल्या कर्जत इथे सहकार परिषदेत बोलत होते. देशात सर्वाधिक सहकारी संस्था महाराष्ट्रात असून, महात्मा जोतिबा फुले यांचे सहकार चळवळीतले योगदान अतिशय महत्त्वाचे आहे असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले. साखर करखान्यांसाठी पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या भगत उसाचे पीक घेतले जाते. त्यामुळे सतत पाण्याचा उपसा होऊन भूजल पातळी कमी होत आहे. ही स्थिती अशीच राहिली तर काही वर्षात मराठवाड्याचे वाळवंट होईल,अशी भीती त्यांनी व्यक्त केली. राज्यात येणारे प्रकल्प हिसकावले जात असून,हजारो एकर जमिनी गिळंकृत केल्याजात आहेत. महाराष्ट्रात जाती-जातीत भेद निर्माण करण्याचं षडयंत्र सुरु असून,महाराष्ट्र एकसंध राहू नये म्हणून हा प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आरमार उभं केले, त्यांच्या नावाने राजकारण केले जाते मात्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या कोकण किनारपट्टीला सांभाळायचं नाही अशी टीका त्यांनी केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत