मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

धाराशिव जिल्हा रुग्णालयाचा कारभार राम-भरोसे,जिल्हा रुग्णालयास अद्यापही जिल्हा शल्य चिकित्सक नाहीत !

विजय अशोक बनसोडे
लेखक,8600210090
भिमनगर (नागेशनगरी) उस्मानाबाद

राज्य आरोग्य संसाधन यंत्रणा केंद्र,पुणे यांच्या मार्फत राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक तसेच महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या आरोग्य संस्थांमध्ये विविध आरोग्य कार्यक्रम राबवले जातात.या कार्यक्रमाचे निर्देशांक दरमहा जाहीर केले जातात. या निर्देशांकामध्ये माहे जानेवारी 2023 च्या अहवालानुसार आरोग्य निर्देशांकामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याची नोंद आहे. उस्मानाबाद जिल्हा शल्य चिकित्सक यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला होता.माता बाल आरोग्य व कुटुंब कल्याण कार्यक्रम,संसर्गजन्य आजार,राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम,कायाकल्प,पोर्टल लसीकरण,रुग्णसेवा,टेलीमेडिसिन, हिपॅटायटिस बी नियंत्रण कार्यक्रम,आर.के. एस,किशोरवयीन स्वास्थ्य,राष्ट्रीय क्षयरोग दिन कार्यक्रम, कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम,एकात्मिक साथ रोग सर्वेक्षण,इत्यादी उपक्रमात आणि सामाजिक उपक्रमामध्ये कामानुसार गुणांकन करण्यात येत असते.या सर्व शासकीय उपक्रमामध्ये जिल्हा धाराशिव रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी, आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी चांगले करून राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला होता.त्याचबरोबर ज्यावेळी भारतच नव्हे तर संबंध विश्व कोरोणाशी लढत होता,अशा भयान संकटाच्या कोरोना काळातही जिल्हा शल्य चिकित्सक श्री.गलांडे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय धाराशिव मध्ये प्रचंड उल्लेखनीय कामगिरी केली.जसे उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आशिया Subject पहिला फिरता दवाखाना म्हणजे मोबाईल व्हॅन(फिरता दवाखाना) उभा करण्याची संकल्पना असेल किंवा कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हस्तांतरित न झालेली भव्य इमारत कोरोना रुग्णांसाठी स्वतःच्या जिम्मेदारीवर उपलब्ध करून घेतली.त्याच बरोबर आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे आणि परंडा तालुक्यामध्ये आशिया खंडातील क्रमांक एकचे भव्य शिबिर घेतले.या शिबिरामध्ये जवळपास सात लाख रुग्णांनी काय या बाबी विसरण्यासारख्या आहेत का ? त्यामुळे खरंतर एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांवर “उपटसुंभ” पत्रकारामुळे कारवाई करणे कितपत योग्य आहे.त्याची सुद्धा शहानिशा वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे असतं.

बरं असो…धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठे रुग्णालय असलेला धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयास मागच्या तीन महिन्यापासून जिल्हा शल्य चिकित्सकाची खुर्ची रिकामीच आहे.या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे थोडे सुद्धा लक्ष असलेले दिसून येत नाही.ही बाब अतिशय चिंताजनक आणि खेदजनक सुद्धा आहे.

वास्तविक पाहता धाराशिव जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व प्रकारचं कामकाज व्यवस्थित चालू असताना,त्याच बरोबर वार्षिक अहवालामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी राज्यामध्ये क्रमांक एक पटकविला असताना सुद्धा केवळ “उंटावरून शेळ्या राखणाऱ्या पत्रकारांमुळे” जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कामकाजात खिळ बसल्याचे आता स्पष्ट होत आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हाधिकारी धाराशिव यांनी लवकरात लवकर धाराशिव जिल्हा रुग्णालयास जिल्हा शल्य चिकित्सकांची पूर्तता करावी. अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.या मागणीची गांभीर्याने दखल घेणं हे जिल्हा प्रशासनाचे काम आहे.

त्याच बरोबर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचा वावर असलेल्या कोणत्याही कार्यालयातील अधिकाऱ्यांवरती कारवाई करताना अधिकाऱ्याच्या ग्राउंड लेव्हल वरील कामाची चौकशी सुद्धा नीट करून कारवाईचा भडगाव उभारावा असं ही आवर्जून नमूद करावसं वाटतं.कारण जानेवारी 2023 मध्ये जो आवाहन प्राप्त झाला त्या अहवालानुसार धाराशिव जिल्हा रुग्णालयाने आरोग्य खात्याच्या सर्व योजना आणि कामकाज व्यवस्थित पार पडल्यामुळे डॉ.गलांडे राजाभाऊ यांना राज्यातील पहिले जिल्हा असलेल्या चिकित्सक म्हणून बहुमान दिला होता. ही बाब आपण विसरून विसरता कामा नये.

धाराशिव जिल्हा हा मुळातच मागास आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो.अशा परिस्थितीत धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जिल्हा रुग्णालया मध्ये तीन महिन्यापासून जिल्हा शल्य चिकित्सक नसणे,ही बाब अत्यंत दुर्दैवाची आहे.एवढ्या मोठ्या जिल्हा शासकीय रुग्णालयावर ही अवस्था येते ? यास कारणीभूत असलेलं राजकारण,वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची लॉबिंग,पोटभरून पत्रकारांचा सुळसुळाट,अशा अनेक बाबी कारणीभूत आहेत.खरंतर जिल्हा शासकीय रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची वरद-दायिनी आहे.याचा विचार राजकारणी,पोटभर पत्रकार आणि लॉबिंग करणाऱ्या वरिष्ठांनी करायला पाहिजे.याचा परिणाम म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयात येणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांची प्रचंड मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असते. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये अत्यावश्यक असणारी कामे सुद्धा खोळंबली जातात.ज्याचा परिणाम इथे येणाऱ्या गोर-गरीब जिल्हाभरातील रुग्णांवर होतो.याचे थोडे सुद्धा भान आपल्या सारख्या वरिष्ठ म्हणून घेणाऱ्या राजकारणी आणि पत्रकार म्हणून घेणाऱ्याला राहत नाही.ही बाब उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी दुर्दैवाचीच म्हणावी लागेल.

त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन डॉ.राजाभाऊ गलांडे यांच्यासारखा कर्तव्यदक्ष अधिकारी धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयावर नियुक्त करणे अत्यंत गरजेचा आहे. गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर कारवा कार्यवाही होणे अपेक्षित आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!