भारतमुख्यपानराजकीय

गांधी यांना निवडणूक आयोगाकडून पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह टीका केल्याने दोन दिवसांत उत्तर देण्याची नोटीस

राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील निवडणूक प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘पनवती’, ‘खिसेकापू’ असा उल्लेख केल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत या नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याने भाजपने त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. एका ज्येष्ठ नेत्याने अशा प्रकारची भाषा वापरणे अशोभनीय आहे, असे या तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने गांधी यांना नोटीस पाठवली. ‘आदर्श आचारसंहिता नेत्यांना आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर असत्यापित आरोप करण्यात मनाई करते,’ असे या नोटिशीत म्हटले आहे. तसेच निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात त्यांनी ठासून सांगितले की, गेल्या नऊ वर्षांत उद्योगपतींना १४ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याचा आरोप तथ्यांवर आधारित नाही.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!