भारतमुख्यपान

पुरामुळे तमिळनाडूमध्ये ४० लाखांहून अधिक लोक विस्थापित

१८७१ नंतर इतक्या मोठ्या प्रमाणावरील ऐतिहासिक पुरामुळं ४० लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. पाऊस कमी झाल्यानं तामिळनाडू सरकारनं मदतकार्य करण्यासाठी विशेष पथकं स्थापन केली आहेत. मुख्यमंत्री एमकेस्टॅलिन यांनी पुरामुळं प्रभावित क्षेत्रात जास्तीत जास्त प्रमाणात हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना लिहिलेल्या पत्रात अधिकप्रमाणात हेलिकॉप्टर पुरवण्याचं आवाहन केलं आहे. भारतीय तटरक्षक दलानं दक्षिण तामिळनाडूच्या पूरग्रस्त भागातआपली जहाजं, विमानं आणि आपत्तीनिवारण पथकं तैनात केली आहेत. रेल्वेस्थानकं जलमय झाली असून वाहनं आणि घरं पाण्याखाली अथवा वाहून गेलीअसल्यानं बचाव तसंच मदतीसाठी लोकांचा आक्रोश सुरू आहे. पुरात अडकलेल्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी बचाव नौकांच्या फेऱ्या सुरु आहेत. तटरक्षक दलाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार तुतीकोरीन आणि लगतच्या भागात पुराच्या पाण्यात अडकलेल्या २०० लोकांचे जीव वाचवण्यात आलं आहे. या भागात अडकलेल्या स्थानिक लोकांच्या मदतीसाठी बचाव नौका आणि आवश्यक मदतीसह सहा आपत्ती निवारण पथकं तैनात करण्यात आल्याचं तटरक्षक दलानं म्हंटलं आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!