येराड गावचे सुपुत्र भागवत जगन्नाथ कांबळे (आण्णा) यांचे निधन..

येराड गावचे सुपुत्र भागवत जगन्नाथ कांबळे (आण्णा) यांचे आज दुपारी ठाणे येथे हृदयविकाराने निधन झाले.मामा कांबळे यांचे ते जेष्ठ बंधु आहेत व आयुनी चारुशीला सचिन कांबळे हिचे वडील आहेत.कॅनरा बँकेतून मॅनेजर म्हणून निवृत्त झाले.कळवा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्म चळवळ जागृत ठेवण्यासाठी व तरुण पिढीला आदर्श वाटेल असे ते अध्यक्ष म्हणून काम करीत होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भव्यदिव्य जयंती व वर्षावास मालिका त्यांच्या नियोजनबद्ध पद्धतीने साजरी होत असे. तथागतभगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर त्यांचे प्रचंड वाचन व प्रेम होते हे त्यांच्या बोलण्यातून नेहमी जाणवत असे. असे हे आण्णा आज आपल्यात नाहीत हे मनाला न पटणारे व मन सुन्न करणारी घटना आहे.
कॅनरा बँकेत नोकरी करीत असताना त्यांनी आपल्या लोकांनी शिक्षण घेऊन प्रमोशन घेतले पाहिजे व त्याचा उपयोग समाजाच्या चळवळीकरिता केला पाहिजे. असे समाजप्रिय आण्णा यांनी कॅनरा बँकेतदेखील कामाचा आदर्श निर्माण केला. प्रत्येक माणसाला माणुसकीचा आधार देणारा आज आधारवड हरपला.
*आण्णा हे स्वभावाने विनयशील होते. आज माणुसकी जपणारा सुशील व सुंस्कृत धम्मधरोधर हरपला. आण्णांना चन्ने परिवार तसेच दैनिक जागृत भारत भावपूर्ण आदरांजली ..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत