सामाजिक / सांस्कृतिक

केंद्र सरकारचे राज्यातील दीड कोटी निरक्षर शोधण्याचे लक्ष्य; शिक्षकांवर नवा ताण

मुंबई/पुणे : केंद्र सरकारने पाठवलेल्या निरक्षरांच्या संख्येनुसार गावागणिक निरक्षरांची ठराविक संख्या शोधण्याची उलट गंगा सध्या शिक्षण विभागात वाहते आहे. राज्यात एकूण एक कोटी ६३ लाख निरक्षर नागरिक असल्याची गावनिहाय आकडेवारी केंद्राने पाठवली आहे. त्यानुसार आता प्रत्येक गावातील निरक्षरांचा शोध घ्या, असे फर्मान स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी शाळांसाठी काढले आहे.

पुढील चार वर्षांत पाच कोटी नागरिकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. त्यापैकी १२ लाख ४० हजार नागरिकांना साक्षर करण्याचे लक्ष्य महाराष्ट्राला दिले आहे.  राज्यस्तरावर अगदी दीड कोटी नाही, पण १२ लाख ४० हजारांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तेवढे निरक्षर शोधण्याचे काम शिक्षण विभागाला करावे लागणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!