देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

महापुरुषांच्या विचारांचे वारसदार की पराभव करणारे नतद्रष्ठ


लेखन :- अशोक नागकीर्ति
दिनांक :- १९/८/२०२५
मोबाईल :- 7039120462
भाग — २९
समता ; स्वातंत्र्य ; बंधुत्व व न्याय
तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे ती अशी की; केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये.आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायलाच हवे.राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तो एक जीवन मार्ग आहे.जो स्वातंत्र्य; समता आणि बंधुता यांना जीवनतत्वे म्हणून मान्यता देतो.स्वातंत्र्य ; समता आणि बंधुता ह्या तत्वांचा एका त्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही.ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात.ते या अर्थाने की; त्यापैकी एकाची दुसऱ्यापासुन फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय. समतेपासुन स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही.समता स्वातंत्र्यापासून वेगळी करता येत नाही.तसेच स्वातंत्र्य आणि समता ही बंधुभावा पासून वेगळी करता येत नाहीत.समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय. स्वातंत्र्याशीवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल.बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वाभाविकरित्या अस्तित्वात राहणार नाहीत.त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणेची गरज भासेल.
भारतीय समाजात दोन बाबींचा पूर्णतः अभाव आहे.ही वस्तुस्थिती मान्य करूनच आपण सुरुवात केली पाहिजे.त्यापैकी एक समता आहे. सामाजिक क्षेत्रात आपला भारतीय समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्वावर आधारित आहे.याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावर असतात तर बाकीचे निकृष्ट अवस्थेत असतात.आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात कांहींजवळ गडगंज संपत्ती आहे.तर अनेक लोक घृणास्पद दारिद्र्यात जगतात. २६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगती युक्त जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारित राहाणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहाणार आहोत? आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण आणखी किती काळ समता नाकारणार आहोत? आपण जर ती अधिक काळ पर्यंत नाकारत राहीलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहाणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे.अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाहीची संरचना उध्वस्त करतील.
आपल्यात उणीव असलेली दुसरी बाब म्हणजे बंधुत्वाचे तत्व मान्य करणे ही होय.बंधुत्व म्हणजे काय? जर भारतीय लोक एक असतील तर सर्व भारतीयांमध्ये बंधुत्वाची समान भावना असणे हे होय.हे तत्व सामाजिक जीवनाला एकता आणि एकजिनसीपणा प्राप्त करून देते. ही बाब प्राप्त करणे कठीण आहे.
उर्वरित भाग पुढे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!