शालेय पोषण आहारात आज पासून विद्यार्थ्यांना मिळणार अंडी व केळी.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांना (जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित शाळा) पत्रव्यवहार केला आहे.
शालेय पोषण आहारात आता आज पासून (ता. २२) विद्यार्थ्यांना अंडी, पुलाव किंवा अंडा बिर्याणी मिळणार आहे. अंडी न खाणाऱ्यांसाठी केळी, चिकू, पेरी यापैकी एक फळ दिले जाणार आहे. आठवड्यातील बुधवार किंवा शुक्रवार या पैकी कोणत्याही एका दिवशी प्रतिविद्यार्थी पाच रुपयांप्रमाणे हा खर्च केला जाणार आहे.
स्थानिक बाजारातून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी अंडी व फळे विकत घ्यायची आहेत. त्यासाठी पहिल्या सहा आठवड्यांच्या खर्चापोटी प्रत्येक विद्यार्थ्याला ३० रुपये, याप्रमाणे अग्रिम दिला जाणार आहे.आठवड्यातील बुधवारी किंवा शुक्रवारी विद्यार्थ्यांना नवीन बदलानुसार आहार मिळेल, यादृष्टीने पोषण आहाराच्या योजनेसाठी पात्र चार हजार ९५ शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात अंडी व फळांची खरेदी करायची आहे.
अंडी खाणाऱ्या व न खाणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना अंडी व फळे द्यायची आहेत. दिवाळी सुटीनंतर बुधवारपासून शाळा सुरु होणार असून विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी किंवा या आठवड्यातील शुक्रवारी नवीन बदलानुसार आहार मिळेल. शालेय पोषण आहाराचे लेखाधिकारी डॉ. वैभव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यासंबंधीची कार्यवाही सुरु आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत