क्रिकेटभारत

वर्ल्डकपसाठी आज अंतिम मुकाबला ; 20 वर्षानंतर भारताला हिशोब चुकता करण्याची संधी.

आता वर्ल्ड कप 2023 मधील अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने भिडणार आहेत.टीम इंडियाने बुधवारी 15 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडवर 70 धावांनी मात केली. टीम इंडिया यासह फायनलमध्ये पोहचली. तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये धडक मारली. आता टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात 20 वर्षांनी पुन्हा एकदा वनडे वर्ल्ड कपमधील अंतिम सामना होणार आहे. टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात 2003 वनडे वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामना झाला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 125 धावांनी विजय मिळवला होता.त्यामुळे टीम इंडियाकडे ऑस्ट्रेलियाला अंतिम सान्यात पराभूत करुन 20 वर्षांचा जुना हिशोब चुकता करण्याची संधी आहे.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड कप फायनल सामना हा रविवारी 19 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये अर्थात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळे आता साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष हे या अंतिम सामन्याकडे लागून राहिलं आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!