मुख्यपान

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि चॅट-जीपीटी ही प्रसारमाध्यमांसमोरची मोठी आव्हानं असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं प्रतिपादन.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि चॅट-जीपीटी ही प्रसारमाध्यमांसमोरची मोठी आव्हानं असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात आज ते बोलत होते. या साधनांचा वापर जबाबदारीने केला पाहिजे असं ते म्हणाले.  माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर कार्यक्रमाला उपस्थित होते. संपादकांचा अनुभव, अभ्यास आणि संवेदना यांची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता कधीही घेऊ शकणार नाही असं ते आपल्या भाषणात म्हणाले.प्रेस कौन्सिलची स्थापना झाली तो हा दिवस मुक्त आणि निःपक्षपाती पत्रकारितेचं महत्त्व अधेरेखित करण्यासाठी राष्ट्रीय पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला  जातो. 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!