प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपान

टेंभू योजनेच्या विस्तारासाठी आठ टीएमसी वळविण्याचा प्रस्ताव.

टेंभू योजनेच्या विस्तारासाठी आठ टीएमसी वळविण्याचा प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास भविष्यात पुणे शहर आणि जिल्ह्याला फटका बसणार आहे. खडकवासला, भाटघर, वीर, नीरा देवधर आणि पवना या धरणांमधील अतिरिक्त आठ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यासाठीच्या विस्तारित टेंभू योजनेसाठी देण्याच्या निर्णयाचा घाट घालण्यात येत आहे. पाणी पळविण्याच्या या प्रकारास उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेते पुण्याचे मान्यता देणार का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

टेंभू विस्तारित पाणी योजनेला मंजुरी देण्यासाठी सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नेत्यांनी नुकताच उपोषणाचे हत्यार उपसले होते. प्रत्यक्षात जे पाणी देता येणेच शक्य नाही, अशा भीमा खोऱ्यातील पाणी कागदोपत्री या योजनेसाठी देण्याचा घाट निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घालण्यात आला आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनस्तरावर या पाणीवाटपाला मंजुरी देण्यात आली असून, केवळ मंत्रिमंडळाच्या बैठकीची औपचारिकता बाकी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह स्थानिक आमदारांनी वेळीच लक्ष घातले नाही; तर पुणे जिल्ह्याला या निर्णयाची मोठी किंमत चुकवावी लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!