महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

सरकारला २ महिने मुदत देत उपोषण मागे घेण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणार असेल, तर सरकारला वेळ वाढवून देण्याची तयारी मनोज जरांगे यांनी दाखवली आहे. सरकारतर्फे आंतरवाली सराटी इथं उपोषणस्थळी जरांगे यांच्याशी चर्चा करायला गेलेल्या शिष्टमंडळानं मराठा आरक्षणासंदर्भात विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा करण्याचं आश्वासन त्यांना दिलं. हे अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ८ डिसेंबरला मराठा आऱक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल, असं शिष्टमंडळानं जरांगे यांना सांगितलं. त्यावर २४ डिसेंबरर्यंत आपण वेळ देत असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. उपोषण सोडावं, अशी विनंती शिष्टमंडळानं त्यांना केली. उपोषण मागं घेऊ, पण साखळी उपोषण सुरु राहील, असं जरांगे यांनी सांगितलं.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारतर्फे वेळकाढूपणा नसून तो प्रक्रियेचा भाग असल्याचं जरांगे पाटील यांना आज समाजावून सांगण्याचा प्रयत्न या शिष्टमंडळात सामील असलेले न्यायमुर्ती सचदेव आणि न्यायमुर्ती एम जी गायकवाड या दोन माजी न्यायाधिशांनी केला. या शिष्टमंडळात उदय सामंत, अतुल सावे, धनंजय मुंडे. संदिपान भुमरे, नारायण कुचे यांचा समावेश होता.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!