धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दहिवडीत धम्ममेळावा..’समाजात आदर्श बौद्ध संस्कृती रूजवण्याचा बौद्धबांधवांचा संकल्प’

सिद्धार्थ सरतापे:वरकुटे-मलवडी….
प्रस्थापित जुलमी व्यवस्थेशी प्रखर संघर्ष करून,सत्ता,संपत्ती,प्रतिष्ठा आणि ज्ञानापासून शतकानुशतके वंचित ठेवलेल्या अस्पृश्य समाजाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अशोका विजयादशमीच्या दिवशी बौद्धधम्म घेऊन,दिनदलीतांच्या सर्वांगीण मुक्तिचा मार्ग खुला केला असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत घोरपडे यांनी केले.
दहिवडी ता माण येथील सिद्धनाथ मंगल कार्यालयात माण तालुका बौद्ध संघटना,व भारतीय बौद्ध महासभा यांनी ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘धम्ममेळाव्यात ते बोलत होते.याप्रसंगी
भंन्ते जीवक,भंन्ते उदक,भंन्ते तन्वय,धम्ममेळाव्याच्या अध्यक्षा सुवर्णा जीवन बनसोडे,डॉ.सुधिर वाघमारे,अँड बाळासाहेब सावंत,माजी सभापती बाळासाहेब रणपिसे,सातारा शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष विजय बनसोडे,नगरसेवक शैलेश खरात,दादासाहेब कांबळे,नंदकुमार शिंदे,संदिप खरात,कुमार सरतापे,सिद्धार्थ बनसोडे आदी मान्यवर धम्मपिठावर उपस्थित होते.याप्रसंगी कामिनी शीलवंत म्हणाल्या की,माणसाला माणसात आणण्यासाठी सम्राट अशोकांनी युद्ध सोडले महात्मा ज्योतिबा फुले यांनी घरदार सोडले,तथागत गौतम बुद्धांनी राज्य सोडले आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म सोडला.सम्राट अशोकाच्या काळात बुद्ध धम्माला राजाश्रय मिळाला त्यानंतर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचे उदात्तीकरण करून संपूर्ण भारत बौद्धमय करण्यासाठी प्रयत्न केले.असे सांगून डॉ सुधिर वाघमारे यांनी बौद्ध धम्माचा इतिहास सर्वांसमोर मांडला.बाळासाहेब रणपिसे म्हणाले की,माण तालुक्यातील खेडोपाड्यात विस्तारलेला बौद्ध समाज एकसंघ आणि संघटीत करण्यासाठी विजयादशमीदिवशी हा धम्ममेळावा आयोजित केल्याचे सांगितले.अँड.प्रियांका रणपिसे यांनी धम्मचक्र प्रवर्तनदिन का साजरा केला जातो याबाबत ऐतिहासिक माहिती सांगून,धर्म हा माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नसल्याचे स्पष्ट केले.याप्रसंगी उपस्थित सर्वांनी त्रिसरण पंचशील ग्रहण करून २२ प्रतिज्ञांची शपथ घेतली.धम्म चळवळीचे प्रणेते सुधाकर शिलवंत यांना विशेष सत्काराने सन्मानित करण्यात आले.सामाजिक कार्यकर्त्यांसह यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.दरम्यान हिंगणीच्या सिद्धार्थ गायन पार्टीने भीमगितांचा बहारदार कार्यक्रम सादर केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड.बाळासाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन उमेश गायकवाड व राजेश तोरणे यांनी केले.याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशी देठे,बाबासाहेब भोसले यांच्यासह बहुसंख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते….
फोटो: समता दलाच्या जवानांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करतांना मान्यवर…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत