मुख्यपान

संसदेत मंजूर करण्यात आलेल्या तीन विधेयकांबाबतची सर्व संगणकीकरण कामे डिसेंबर २०२४ पर्यंत केली जातील – केंद्रीय गृहमंत्री

फौजदारी गुन्हेविषयक तीन विधेयकांमुळे देशातील न्यायव्यवस्थेत क्रांती येईल,असे शहा यांनी नमूद केले.या विधेयकांपूर्वीच देशातील १६ हजार ७५५ पोलिस ठाणी एका प्रणालीनं जोडण्याचं काम मोदी सरकारनं केल्याची माहिती त्यांनी दिली.देशातील २२ हजार न्यायालयं ई-न्यायालयं बनली असून दोन कोटी कैद्यांचा डेटा ऑनलाइन उपलब्ध असल्याचंही त्यांनी नमूद केलं. संसदेत नुकत्याच मंजूर करण्यात आलेल्या तीन विधेयकांबाबत सर्व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पायाभूत सुविधा,संगणक प्रणाली,कर्मचारी प्रशिक्षण आणि न्यायालयांचं संपूर्ण संगणकीकरण ही कामं डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण केली जातील, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल चंडीगडमध्ये दिली.सायबर सुरक्षा आणि सुरक्षा केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे न्यायव्यवस्था जगभरातील गुन्हेगारीविषयक अत्याधुनिक न्यायव्यवस्थेच्या बरोबरीला येईल असं त्यांनी नमूद केलं. न्यायविषयक यंत्रणा एकविसाव्या शतकापर्यंत उडी मारायला सज्ज झाली असल्याचं ते म्हणाले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!