महाराष्ट्र

चक्रीवादळ महाराष्ट्राच्या नाही, तर ओमानच्या दिशेने; ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत अवकाळी पावसाची शक्यता नाही

मुंबई: गिरण्यांच्या जमिनीवरील घरांच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हाडाकडे जमा झालेल्या १ लाख ५० हजार ४८४ अर्जदारांच्या अर्जांची छाननी करत पात्रता निश्चिती करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत अंदाजे ५३ हजार कामगारांनी कागदपत्रे जमा केली असून अजूनही लाखभर कामगारांकडून कागदपत्रे जमा करून घेणे बाकी आहे. म्हाडाने ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने कागदपत्रे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर ऑनलाईन पद्धतीने हि प्रक्रिया पार करणे कामगारांसाठी सर्व दृष्टीने सोयीस्कर असताना कामगार ऑफलाईन पद्धतीने कागदपत्रे जमा करण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. त्यामुळे कामगारांनी ऑनलाईन कागदपत्रे जमा करावीत असे आवाहन म्हाडाकडून करण्यात येत आहे.

सोडतीआधीच कामगारांची पात्रता निश्चिती करण्याची मागणी काही कामगार संघटनांची होती. त्यानुसार म्हाडाच्या मुंबई मंडळाने १ लाख ५० हजार ४८४ कामगारांच्या अर्जांची छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यासाठी कामगारांकडून कागदपत्रे जमा करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे जमा करता येत असताना अनेक कामगार ऑफलाईन पद्धतीने कागदपत्रे जमा करून घेण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळेच वांद्रे येथील समाज मंदिर सभागृह या ऑफलाईन केंद्रावर कामगार मोठया संख्येने गर्दी करत आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!