क्रिकेटभारतमुख्यपान

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारताने न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव.

हिमाचल प्रदेशात धर्मशाला इथं झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा संघ पन्नास षटकांत २७३ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास आलेली भारताची सलामी जोडी कर्णधार रोहीत शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात केली. रोहीत ४६, शुभमन २६, श्रेयस अय्यर ३३ तर के एल राहुल २७, धावांवर तंबूत परतले. विराट कोहलीने ९५ धावा करून भारताचा विजय दृष्टिपथात आणला. रवींद्र जडेजाने चौकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केलं. सर्वाधिक पाच बळी घेणारा मोहम्मद शमी सामनावीर ठरला. भारताचा या स्पर्धेतला हा पाचवा विजय असल्याने, दहा गुणांसह भारत गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!